शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

राष्ट्रीयीकृत बँका महिन्यात कापताहेत थेट तीन महिन्यांचे कर्जाचे हप्ते : कर्जदार संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 20:52 IST

Moratorium, Bank Harrasment, Nagpur news कोरोना महामारीनंतर रिझर्व्ह बँकेने एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत तब्बल सहा महिने व्यावसायिक आणि नोकरदार कर्जदारांना दिलासा देण्यासाठी मोरॅटोरिअमची सुविधा अर्थात कर्ज भरण्यास स्थगिती दिली. त्यानंतरही अनेक राष्ट्रीयीकृत बँका कर्जदारांना न कळविता त्यांच्या खात्यातून एकाच महिन्यात कर्जाचे तीन हप्ते कापत आहेत. त्यामुळे कर्जदार संकटात आले असून बँकांनी रिझर्व्ह बँकेच्या घोषणेला हरताळ फासल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देरिझर्व्ह बँकेच्या मोरॅटोरिअमच्या घोषणेला हरताळ

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : कोरोना महामारीनंतर रिझर्व्ह बँकेने एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत तब्बल सहा महिने व्यावसायिक आणि नोकरदार कर्जदारांना दिलासा देण्यासाठी मोरॅटोरिअमची सुविधा अर्थात कर्ज भरण्यास स्थगिती दिली. त्यानंतरही अनेक राष्ट्रीयीकृत बँका कर्जदारांना न कळविता त्यांच्या खात्यातून एकाच महिन्यात कर्जाचे तीन हप्ते कापत आहेत. त्यामुळे कर्जदार संकटात आले असून बँकांनी रिझर्व्ह बँकेच्या घोषणेला हरताळ फासल्याचे चित्र आहे.

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात कर्जाचे तीन हप्ते कापल्याची कर्जदारांची तक्रार आहे. हा प्रकार बँक ऑफ इंडियाच्या सर्वच शाखांमध्ये अनेक कर्जदारांसोबत घडत असल्याची तक्रार लोकमतकडे आली आहे. याची शहानिशा केली असता एका नोकरदार कर्जदाराने हप्ते कापल्याचे स्टेटमेंट दाखविले. या स्टेटमेंटमध्ये कर्जदाराच्या खात्यात असलेली रक्कम बँकेने वळती केली आहे. आता त्यांच्या खात्यात शून्य रुपये बॅलेन्स दाखवत आहे. हातात पैसा नसल्याने महिन्याचा खर्च कसा चालवायचा, हा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

स्टेटमेंटनुसार कर्जदाराने जून २०१२ मध्ये बँक ऑफ इंडियाच्या सीताबर्डी शाखेतून गृहकर्ज घेतले आहे. तो कर्जाचे हप्ते नियमित फेडत आहे. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी मोरॅटोरिअमची घोषणा करताना सप्टेंबरपर्यंत हप्ते कापण्यात येणार नाही, असे म्हटले होते. त्यानंतरही कर्जदाराच्या खात्यातून ११ सप्टेंबरला १०,०१८ रुपयांचा हप्ता कापण्यात आला. एवढेच नव्हे तर ३० सप्टेंबरला पुन्हा ८,०१८ रुपयांचा दुसरा हप्ता कापला. त्यानंतर सप्टेंबरच्या पगाराची रक्कम खात्यात जमा होताच ९ ऑक्टोबरला ११,९४५ रुपये, १२ ऑक्टोबरला १,२२०, १३ ऑक्टोबरला ७०० रुपये आणि १६ ऑक्टोबरला २,१७० रुपये असे एकूण कर्जाच्या दोन हप्त्याचे १६,०३५ रुपये बँकेने वळते केले. दोन हप्त्यानंतर बँकेने पुन्हा तिसरा हप्ता कापण्याची तयारी केली आणि १९ ऑक्टोबरला १,७९५ रुपये बँकेने वळते केले. आता खात्यात शून्य रक्कम दाखवित आहे. खात्यात जशी जशी रक्कम जमा होईल, तशी वळती करण्याची बँकेची तयारी आहे. बँकेने रक्कम वळती केल्याचा मेसेज पहाटे ४ वाजता येतो. बँकेच्या अशा प्रकाराने कर्जदार त्रस्त आहेत. अशी घटना अनेक कर्जदारांसोबत घडत आहे.

काही बँकांनी मोरॅटोरिअमनंतर कर्जाचा कालावधी वाढविला आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास एखाद्याला ६० महिने कर्जाचे हप्ते फेडायचे असतील तर रिझर्व्ह बँकेच्या मोरॅटाेरिअमच्या घोषणेनंतर कर्ज फेडण्याची मुदत ६६ महिन्यांवर गेली आहे. पण बँक ऑफ इंडिया रिझर्व्ह बँकेच्या घोषणेची अवहेलना करताना दिसून येत आहे.

मोरॅटोरिअमनंतर कर्जदारांना हप्ते कापण्यासाठी ‘एस आणि नो’चा पर्याय दिला होता. त्यानुसारच बँक हप्ते कापत आहे. ज्यांना नियमित पगार मिळत आहे, त्यांच्याच कर्जाचे हप्ते कापण्यात येत आहे आणि ज्यांना नियमित पगार मिळत नाही, अशांचे हप्ते कापण्यात येत नाहीत.

- विलास पराते, उपमहाव्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया.

टॅग्स :bankबँकnagpurनागपूर