शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
2
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
3
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
4
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
5
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
6
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
7
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
8
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
9
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
11
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
12
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
13
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
14
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
15
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
16
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
17
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
18
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
19
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
20
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!

राष्ट्रीयीकृत बँका महिन्यात कापताहेत थेट तीन महिन्यांचे कर्जाचे हप्ते : कर्जदार संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 20:52 IST

Moratorium, Bank Harrasment, Nagpur news कोरोना महामारीनंतर रिझर्व्ह बँकेने एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत तब्बल सहा महिने व्यावसायिक आणि नोकरदार कर्जदारांना दिलासा देण्यासाठी मोरॅटोरिअमची सुविधा अर्थात कर्ज भरण्यास स्थगिती दिली. त्यानंतरही अनेक राष्ट्रीयीकृत बँका कर्जदारांना न कळविता त्यांच्या खात्यातून एकाच महिन्यात कर्जाचे तीन हप्ते कापत आहेत. त्यामुळे कर्जदार संकटात आले असून बँकांनी रिझर्व्ह बँकेच्या घोषणेला हरताळ फासल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देरिझर्व्ह बँकेच्या मोरॅटोरिअमच्या घोषणेला हरताळ

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : कोरोना महामारीनंतर रिझर्व्ह बँकेने एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत तब्बल सहा महिने व्यावसायिक आणि नोकरदार कर्जदारांना दिलासा देण्यासाठी मोरॅटोरिअमची सुविधा अर्थात कर्ज भरण्यास स्थगिती दिली. त्यानंतरही अनेक राष्ट्रीयीकृत बँका कर्जदारांना न कळविता त्यांच्या खात्यातून एकाच महिन्यात कर्जाचे तीन हप्ते कापत आहेत. त्यामुळे कर्जदार संकटात आले असून बँकांनी रिझर्व्ह बँकेच्या घोषणेला हरताळ फासल्याचे चित्र आहे.

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात कर्जाचे तीन हप्ते कापल्याची कर्जदारांची तक्रार आहे. हा प्रकार बँक ऑफ इंडियाच्या सर्वच शाखांमध्ये अनेक कर्जदारांसोबत घडत असल्याची तक्रार लोकमतकडे आली आहे. याची शहानिशा केली असता एका नोकरदार कर्जदाराने हप्ते कापल्याचे स्टेटमेंट दाखविले. या स्टेटमेंटमध्ये कर्जदाराच्या खात्यात असलेली रक्कम बँकेने वळती केली आहे. आता त्यांच्या खात्यात शून्य रुपये बॅलेन्स दाखवत आहे. हातात पैसा नसल्याने महिन्याचा खर्च कसा चालवायचा, हा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

स्टेटमेंटनुसार कर्जदाराने जून २०१२ मध्ये बँक ऑफ इंडियाच्या सीताबर्डी शाखेतून गृहकर्ज घेतले आहे. तो कर्जाचे हप्ते नियमित फेडत आहे. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी मोरॅटोरिअमची घोषणा करताना सप्टेंबरपर्यंत हप्ते कापण्यात येणार नाही, असे म्हटले होते. त्यानंतरही कर्जदाराच्या खात्यातून ११ सप्टेंबरला १०,०१८ रुपयांचा हप्ता कापण्यात आला. एवढेच नव्हे तर ३० सप्टेंबरला पुन्हा ८,०१८ रुपयांचा दुसरा हप्ता कापला. त्यानंतर सप्टेंबरच्या पगाराची रक्कम खात्यात जमा होताच ९ ऑक्टोबरला ११,९४५ रुपये, १२ ऑक्टोबरला १,२२०, १३ ऑक्टोबरला ७०० रुपये आणि १६ ऑक्टोबरला २,१७० रुपये असे एकूण कर्जाच्या दोन हप्त्याचे १६,०३५ रुपये बँकेने वळते केले. दोन हप्त्यानंतर बँकेने पुन्हा तिसरा हप्ता कापण्याची तयारी केली आणि १९ ऑक्टोबरला १,७९५ रुपये बँकेने वळते केले. आता खात्यात शून्य रक्कम दाखवित आहे. खात्यात जशी जशी रक्कम जमा होईल, तशी वळती करण्याची बँकेची तयारी आहे. बँकेने रक्कम वळती केल्याचा मेसेज पहाटे ४ वाजता येतो. बँकेच्या अशा प्रकाराने कर्जदार त्रस्त आहेत. अशी घटना अनेक कर्जदारांसोबत घडत आहे.

काही बँकांनी मोरॅटोरिअमनंतर कर्जाचा कालावधी वाढविला आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास एखाद्याला ६० महिने कर्जाचे हप्ते फेडायचे असतील तर रिझर्व्ह बँकेच्या मोरॅटाेरिअमच्या घोषणेनंतर कर्ज फेडण्याची मुदत ६६ महिन्यांवर गेली आहे. पण बँक ऑफ इंडिया रिझर्व्ह बँकेच्या घोषणेची अवहेलना करताना दिसून येत आहे.

मोरॅटोरिअमनंतर कर्जदारांना हप्ते कापण्यासाठी ‘एस आणि नो’चा पर्याय दिला होता. त्यानुसारच बँक हप्ते कापत आहे. ज्यांना नियमित पगार मिळत आहे, त्यांच्याच कर्जाचे हप्ते कापण्यात येत आहे आणि ज्यांना नियमित पगार मिळत नाही, अशांचे हप्ते कापण्यात येत नाहीत.

- विलास पराते, उपमहाव्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया.

टॅग्स :bankबँकnagpurनागपूर