शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

राष्ट्रीय महामार्ग अंधारात : पथदिवे लागले, मात्र उजेड पडेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 00:45 IST

राष्ट्रीय महामार्गावरील विद्यापीठ कॅम्पस ते वाडी दरम्यान प्रशासनाने दिवाबत्तीची सोय केली, पण दोन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही प्रकाश काही पडला नाही. परिणामी वाहनचालकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

ठळक मुद्देचालकांची सुरक्षा धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी सरकार धडपडते आहे. रस्त्यांचा विस्तार केला जात आहे. उपाययोजना करण्यात येत आहे. पण काही महामार्गावर सोयी सुविधा करूनही प्रशासनाकडून खरचं हलगर्जीपणा होताना दिसतोय. राष्ट्रीय महामार्गावरील विद्यापीठ कॅम्पस ते वाडी दरम्यानचा रस्त्यावर याचे उदाहरण बघायला मिळते. या रस्त्यावर प्रशासनाने दिवाबत्तीची सोय केली, पण दोन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही प्रकाश काही पडला नाही. परिणामी वाहनचालकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर प्रवास करणाऱ्या प्रवाश्याना सरकारी काम महिनोंमहिने थांब याचाच प्रत्यय येतो आहे. राष्ट्रीय महामार्गाचा विद्यापीठ केम्पस ते वाडी दरम्यानचा रस्ता गेल्या वर्षी अत्यंत निकृष्ट झाला होता. त्यावर अनेक अपघात होऊन काही वाहनचालकांचा जीवही गेला होता. नागरिकांच्या अनेक तक्रारीनंतर महापालिकेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासोबत बोलणं करून रस्त्याचे डांबरीकरण केले. मात्र, शहराच्या हद्दीत असूनही रात्रीच्या वेळी या महामार्गावर दिवाबत्तीची सोय नव्हती. विद्यापीठ कॅम्पसपासून काचीमेट, कमलानगर, दाभा आणि वाडीच्या दिशेने जाणाऱ्या हजारो वाहनचालकांना अत्यंत धोकादायक स्थितीत वाहन चालवावे लागत होते. नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि नागपूर महापालिकेकडे या मार्गावर दिवाबत्तीची सोय करण्याची मागणी केली. पहिले तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महापालिकेकडे आणि महापालिकेने प्राधिकरणाकडे बोट दाखवत हे आमचे काम नाही असेच धोरण ठेवले. मात्र, रात्रीच्या वेळी हा मार्ग अत्यंत धोकादायक असल्याचे लक्षात आल्यावर सामोपचाराने निधीची तरतूद करण्यात आली आणि अनेक महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर या वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला विद्यापीठ कॅम्पस ते दहा नंबर नाका दरम्यान रस्ते दुभाजकावर वीजेचे खांब उभे करण्यात आले. त्यावर फिलिप्स कंपनीचे एलईडी लाईट्स ही लावले गेले. ऑगस्ट महिना गेला, सप्टेंबरही संपला तरी या मार्गावर एक ही दिवा प्रकाशित झालेला नाही. त्यामुळे ‘दिव्याखाली अंधार’ ही म्हण या मार्गावर सत्य असल्याचे प्रत्यय वाहन चालकांना रोज येत आहे.अंधारामुळे जनावरांचा मृत्यूया मार्गावर दुभाजक चुकीचे असून त्याची उंची कमी असल्याने समोरून येणाºया वाहनाच्या हेडलाईटचे उजेड वाहनचालकांच्या डोळ्यावर पडतो. त्यामुळे अपघाताची शक्यता जास्त असते. काही दिवसांपूर्वी या मार्गावर एक म्हैस रात्रीच्या काळोख्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी होवून रस्त्यावर पडली होती. अंधारामुळे इतर वाहनांना ती दिसली नाही आणि तिला इतर वाहनांनी धडक दिल्याने म्हैस मृत्युमुखी पडली. तर काही वाहनचालक ही जखमी झाले.रस्ता अंधारात ठेवण्याचे कारण काय?अनेक महिन्यांच्या संघर्षानंतर नागरिकांनी दिवाबत्तीची सोय प्रशासनाकडून करवून घेतली. वीजेचे खांब लावण्यात त्यावर महागडे लाईट्स लावण्यात शासनाचा मोठा निधी खर्च झाला. निधी खर्च झाला आहे. पण ते पथदिवे ५० दिवस उलटल्यानंतर प्रकाशित झाले नाही. काम झाल्यानंतरही रस्त्यावर अंधार का? असा सवाल नागरिकांनी केला आहे. आणखी काही जणांचे अपघातात बळी गेल्यानंतरच हे मार्ग प्रकाशित करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिकेने ठरविले आहे का? असाही प्रश्न वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.

 

टॅग्स :highwayमहामार्गnagpurनागपूर