शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्ग अंधारात : पथदिवे लागले, मात्र उजेड पडेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 00:45 IST

राष्ट्रीय महामार्गावरील विद्यापीठ कॅम्पस ते वाडी दरम्यान प्रशासनाने दिवाबत्तीची सोय केली, पण दोन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही प्रकाश काही पडला नाही. परिणामी वाहनचालकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

ठळक मुद्देचालकांची सुरक्षा धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी सरकार धडपडते आहे. रस्त्यांचा विस्तार केला जात आहे. उपाययोजना करण्यात येत आहे. पण काही महामार्गावर सोयी सुविधा करूनही प्रशासनाकडून खरचं हलगर्जीपणा होताना दिसतोय. राष्ट्रीय महामार्गावरील विद्यापीठ कॅम्पस ते वाडी दरम्यानचा रस्त्यावर याचे उदाहरण बघायला मिळते. या रस्त्यावर प्रशासनाने दिवाबत्तीची सोय केली, पण दोन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही प्रकाश काही पडला नाही. परिणामी वाहनचालकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर प्रवास करणाऱ्या प्रवाश्याना सरकारी काम महिनोंमहिने थांब याचाच प्रत्यय येतो आहे. राष्ट्रीय महामार्गाचा विद्यापीठ केम्पस ते वाडी दरम्यानचा रस्ता गेल्या वर्षी अत्यंत निकृष्ट झाला होता. त्यावर अनेक अपघात होऊन काही वाहनचालकांचा जीवही गेला होता. नागरिकांच्या अनेक तक्रारीनंतर महापालिकेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासोबत बोलणं करून रस्त्याचे डांबरीकरण केले. मात्र, शहराच्या हद्दीत असूनही रात्रीच्या वेळी या महामार्गावर दिवाबत्तीची सोय नव्हती. विद्यापीठ कॅम्पसपासून काचीमेट, कमलानगर, दाभा आणि वाडीच्या दिशेने जाणाऱ्या हजारो वाहनचालकांना अत्यंत धोकादायक स्थितीत वाहन चालवावे लागत होते. नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि नागपूर महापालिकेकडे या मार्गावर दिवाबत्तीची सोय करण्याची मागणी केली. पहिले तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महापालिकेकडे आणि महापालिकेने प्राधिकरणाकडे बोट दाखवत हे आमचे काम नाही असेच धोरण ठेवले. मात्र, रात्रीच्या वेळी हा मार्ग अत्यंत धोकादायक असल्याचे लक्षात आल्यावर सामोपचाराने निधीची तरतूद करण्यात आली आणि अनेक महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर या वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला विद्यापीठ कॅम्पस ते दहा नंबर नाका दरम्यान रस्ते दुभाजकावर वीजेचे खांब उभे करण्यात आले. त्यावर फिलिप्स कंपनीचे एलईडी लाईट्स ही लावले गेले. ऑगस्ट महिना गेला, सप्टेंबरही संपला तरी या मार्गावर एक ही दिवा प्रकाशित झालेला नाही. त्यामुळे ‘दिव्याखाली अंधार’ ही म्हण या मार्गावर सत्य असल्याचे प्रत्यय वाहन चालकांना रोज येत आहे.अंधारामुळे जनावरांचा मृत्यूया मार्गावर दुभाजक चुकीचे असून त्याची उंची कमी असल्याने समोरून येणाºया वाहनाच्या हेडलाईटचे उजेड वाहनचालकांच्या डोळ्यावर पडतो. त्यामुळे अपघाताची शक्यता जास्त असते. काही दिवसांपूर्वी या मार्गावर एक म्हैस रात्रीच्या काळोख्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी होवून रस्त्यावर पडली होती. अंधारामुळे इतर वाहनांना ती दिसली नाही आणि तिला इतर वाहनांनी धडक दिल्याने म्हैस मृत्युमुखी पडली. तर काही वाहनचालक ही जखमी झाले.रस्ता अंधारात ठेवण्याचे कारण काय?अनेक महिन्यांच्या संघर्षानंतर नागरिकांनी दिवाबत्तीची सोय प्रशासनाकडून करवून घेतली. वीजेचे खांब लावण्यात त्यावर महागडे लाईट्स लावण्यात शासनाचा मोठा निधी खर्च झाला. निधी खर्च झाला आहे. पण ते पथदिवे ५० दिवस उलटल्यानंतर प्रकाशित झाले नाही. काम झाल्यानंतरही रस्त्यावर अंधार का? असा सवाल नागरिकांनी केला आहे. आणखी काही जणांचे अपघातात बळी गेल्यानंतरच हे मार्ग प्रकाशित करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिकेने ठरविले आहे का? असाही प्रश्न वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.

 

टॅग्स :highwayमहामार्गnagpurनागपूर