शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्ग अंधारात : पथदिवे लागले, मात्र उजेड पडेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 00:45 IST

राष्ट्रीय महामार्गावरील विद्यापीठ कॅम्पस ते वाडी दरम्यान प्रशासनाने दिवाबत्तीची सोय केली, पण दोन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही प्रकाश काही पडला नाही. परिणामी वाहनचालकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

ठळक मुद्देचालकांची सुरक्षा धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी सरकार धडपडते आहे. रस्त्यांचा विस्तार केला जात आहे. उपाययोजना करण्यात येत आहे. पण काही महामार्गावर सोयी सुविधा करूनही प्रशासनाकडून खरचं हलगर्जीपणा होताना दिसतोय. राष्ट्रीय महामार्गावरील विद्यापीठ कॅम्पस ते वाडी दरम्यानचा रस्त्यावर याचे उदाहरण बघायला मिळते. या रस्त्यावर प्रशासनाने दिवाबत्तीची सोय केली, पण दोन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही प्रकाश काही पडला नाही. परिणामी वाहनचालकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर प्रवास करणाऱ्या प्रवाश्याना सरकारी काम महिनोंमहिने थांब याचाच प्रत्यय येतो आहे. राष्ट्रीय महामार्गाचा विद्यापीठ केम्पस ते वाडी दरम्यानचा रस्ता गेल्या वर्षी अत्यंत निकृष्ट झाला होता. त्यावर अनेक अपघात होऊन काही वाहनचालकांचा जीवही गेला होता. नागरिकांच्या अनेक तक्रारीनंतर महापालिकेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासोबत बोलणं करून रस्त्याचे डांबरीकरण केले. मात्र, शहराच्या हद्दीत असूनही रात्रीच्या वेळी या महामार्गावर दिवाबत्तीची सोय नव्हती. विद्यापीठ कॅम्पसपासून काचीमेट, कमलानगर, दाभा आणि वाडीच्या दिशेने जाणाऱ्या हजारो वाहनचालकांना अत्यंत धोकादायक स्थितीत वाहन चालवावे लागत होते. नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि नागपूर महापालिकेकडे या मार्गावर दिवाबत्तीची सोय करण्याची मागणी केली. पहिले तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महापालिकेकडे आणि महापालिकेने प्राधिकरणाकडे बोट दाखवत हे आमचे काम नाही असेच धोरण ठेवले. मात्र, रात्रीच्या वेळी हा मार्ग अत्यंत धोकादायक असल्याचे लक्षात आल्यावर सामोपचाराने निधीची तरतूद करण्यात आली आणि अनेक महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर या वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला विद्यापीठ कॅम्पस ते दहा नंबर नाका दरम्यान रस्ते दुभाजकावर वीजेचे खांब उभे करण्यात आले. त्यावर फिलिप्स कंपनीचे एलईडी लाईट्स ही लावले गेले. ऑगस्ट महिना गेला, सप्टेंबरही संपला तरी या मार्गावर एक ही दिवा प्रकाशित झालेला नाही. त्यामुळे ‘दिव्याखाली अंधार’ ही म्हण या मार्गावर सत्य असल्याचे प्रत्यय वाहन चालकांना रोज येत आहे.अंधारामुळे जनावरांचा मृत्यूया मार्गावर दुभाजक चुकीचे असून त्याची उंची कमी असल्याने समोरून येणाºया वाहनाच्या हेडलाईटचे उजेड वाहनचालकांच्या डोळ्यावर पडतो. त्यामुळे अपघाताची शक्यता जास्त असते. काही दिवसांपूर्वी या मार्गावर एक म्हैस रात्रीच्या काळोख्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी होवून रस्त्यावर पडली होती. अंधारामुळे इतर वाहनांना ती दिसली नाही आणि तिला इतर वाहनांनी धडक दिल्याने म्हैस मृत्युमुखी पडली. तर काही वाहनचालक ही जखमी झाले.रस्ता अंधारात ठेवण्याचे कारण काय?अनेक महिन्यांच्या संघर्षानंतर नागरिकांनी दिवाबत्तीची सोय प्रशासनाकडून करवून घेतली. वीजेचे खांब लावण्यात त्यावर महागडे लाईट्स लावण्यात शासनाचा मोठा निधी खर्च झाला. निधी खर्च झाला आहे. पण ते पथदिवे ५० दिवस उलटल्यानंतर प्रकाशित झाले नाही. काम झाल्यानंतरही रस्त्यावर अंधार का? असा सवाल नागरिकांनी केला आहे. आणखी काही जणांचे अपघातात बळी गेल्यानंतरच हे मार्ग प्रकाशित करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिकेने ठरविले आहे का? असाही प्रश्न वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.

 

टॅग्स :highwayमहामार्गnagpurनागपूर