शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

ललित टेकचंदानीवरून पटोलेंनी संरसंघचालकांना घेरले; म्हणाले, जनतेचे पैसे लुटणाऱ्याला..

By कमलेश वानखेडे | Updated: April 27, 2023 16:51 IST

शेकडो लोकांना फसवणारी व्यक्ति मोहन भागवत यांच्यासोबत कार्यक्रमात कशी ?

नागपूर : ललित टेकचंदानी आणि त्यांच्या लोकांनी यांनी १३ वर्षांपासून सदनिका देतो, असे सांगून शेकडो लोकांकडून कोट्यवधी रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. पैसे घेतले, पण त्यांना सदनिका दिल्या नाहीत आणि त्यांचे पेसैही परत केले नाहीत. तेच टेकचंदानी गुरुवारी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या उद्घाटन कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत कसे काय दिसत होते, असा सवाल करीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संघ परिवारालाच लक्ष्य केले.

पटोले म्हणाले, या कार्यक्रमात टेकचंदानी यांचा मुक्त संचार होता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमवेतही ते वारंवार दिसले. यावरून हा माणूस भाजप आणि संघाच्या अगदी जवळचा आहे, हे लक्षात येते. जनतेचे पैसे लुटणाऱ्याला जर संघ संरक्षण देत असेल, तर मग संघ जनतेला लुटणारी संघटना आहे का, असा सवाल करीत सरसंघचालक मोहन भागवत यांनी या प्रकरणात लक्ष घालून पिडीत लोकांना न्याय द्यावा, अशी मागणीही पटोले यांनी केली.

पटोले म्हणाले, टेकचंदानी यांना नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटमध्ये संचालक बनवण्यात आले आहे. ते आरएसएसमध्ये मोठ्या पदावर ते असतीलही. याप्रकरणी पोलिसांकडून साधी तक्रारही घेतली जात नाही. सरकारही न्याय देण्यास तयार नाही. उलट टेकचंदानी आजही पैसे परत न करता त्याच लोकांना धमकावत आहेत. ज्या लोकांना फसवण्यात आले आहे, ते सर्व हिंदू आहेत. त्यामुळे आता डॉ. भागवत यांनीच न्याय द्यावा, अशी मागणीही पटोले यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेMohan Bhagwatमोहन भागवत