शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

स्थानिक स्वराज्य संस्थेत नाना पटोलेंचा पुन्हा ‘एकला चलो’चा नारा

By कमलेश वानखेडे | Updated: May 16, 2023 18:24 IST

Nagpur News राज्यातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र वेगळा सूर लावला आहे.

कमलेश वानखेडे

नागपूर : राज्यातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र वेगळा सूर लावला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या त्या ठिकाणच्या स्थानिक परिस्थितिच्या आधारावर लढण्याचा निर्णय घेऊ, काही ठिकाणी काँग्रेस एकटीही लढू शकते, असे सांगत पटोले यांनी पुन्हा ‘एकला चलो’ चा नारा दिला आहे.

पटोले म्हणाले, स्थनिक स्वराज संस्था निवडणुका घ्या, अशी आम्ही सरकारला मागणी केली. पण सरकार भीतीने घेत नाही. ५६ इंच त्यांना कळली आहे. सरकारला विधानसभेतही मागणी केली पण सरकार वेळ काढत आहे. कारण भाजपला लोकांचे त्यांच्याबद्दलचे मत कळले आहे. कर्नाटकचे लोण सर्वत्र पसरले आहे. भाजपचे पाणीपत होईल. त्यामुळे भाजप निवडणुकीपासून पळत असल्याचा आरोप त्यांनी केला. सव्वा वर्ष झालं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेतल्या नाही. आता ऑक्टोबरमध्ये फार लवकर घेत आहेत, असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना टोला लगावला. ओबीसीच्या आरणाच्या मुद्यावर सरकारने तातडीने बाजू मांडली नाही. सत्ता द्या ओबीसींचा निर्णय २४ तासात घेतो, असे तुम्हीच म्हणाले होते, अशी आठवणही त्यांनी फडणवीस यांना करून दिली.

लोकसभेसाठी ९ सदस्यीय समिती

- लोकसभेच्या निवडणुका एकत्रित लढण्याबाबत महाविकास आघाडीत प्राथमिक चर्चा झाली आहे. आता तीनही पक्षांचे प्रत्येकी तीन सदस्य अशी एकूण ९ लोकांची कमिटी बनणार आहे. त्यात लोकसभानिहाय चर्चा केली जाईल. १५ ते २० दिवसात याबाबतचा अहवाल येईल. त्यानंतर निर्णय घेऊ, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले