शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

विधानसभा अध्यक्ष बनणारे नाना पटोले विदर्भातील दुसरे आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 21:31 IST

सन १९७२ नंतर रविवारी पुन्हा एकदा नाना पटोले यांच्या रुपात विदर्भाला विधानसभा अध्यक्षाचे पद मिळेल. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या महाविकास आघाडीने शनिवारी १६९ मतांनी विधानसभेत बहुमत सिद्ध केले. आता अध्यक्षपदाचे आघाडीचे उमेदवार नाना पटोले यांचे निवडून येणे निश्चित आहे.

ठळक मुद्देबॅ. शेषराववानखेडे यांना मिळाली यापूर्वी संधी पटोले लोकसभा निवडणुकीत गडकरींविरुद्ध लढले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सन १९७२ नंतर रविवारी पुन्हा एकदा नाना पटोले यांच्या रुपात विदर्भाला विधानसभा अध्यक्षाचे पद मिळेल. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या महाविकास आघाडीने शनिवारी १६९ मतांनी विधानसभेत बहुमत सिद्ध केले. आता अध्यक्षपदाचे आघाडीचे उमेदवार नाना पटोले यांचे निवडून येणे निश्चित आहे. त्यामुळे अनेक वर्षांनंतर विदर्भाला विधानसभेचे अध्यक्षपद मिळेल.नाना पटोले यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशी चर्चा होती. काँग्रेसच्या पहिल्या दोन मंत्र्यांच्या रुपात बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांना संधी मिळाल्याने पटाले यांचेही नाव चर्चेत आले. पटोले या विधानसभेत भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदर संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. त्यांनी भाजपा सरकारमध्ये राज्यमंत्री राहिलेल्या डॉ. परिणय फुके यांचा पराभव केला आहे.नाना पटोले यांनी शेतकरी नेते म्हणून आपली ओळखी निर्माण केली आहे. काँग्रेसचे आमदार असलेल्या पटोले यांनी २००८ मध्ये आमदार पदाचा रजीनामा देऊन लोकसभा निवडणुकीत गोंदिया-भंडारा येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफु ल्ल पटेल यांना टक्कर दिली होती. यानंतर ते भाजपमध्ये सामील होवून विधानसभेत पाहोचले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातून विजयी झाले. शेतकऱ्यांच्या मुद्यावर त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पटले नाही. त्यामुळे ते भाजपा सोडून काँग्रेसमध्ये आले. यावर्षी लोकसभा निवडणुकीत त्यांनी नागपुरातून भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरुद्ध त्यांनी निवडणूक लढवली. पराभूत झाल्यानंतर त्यांनी विधानसभेकडे लक्ष दिले. आपल्या साकोली विधानसभा मतदार संघातून विजय प्राप्त केला.विधानसभा उपाध्यक्षपद अनेकदाविधानसभा अध्यक्ष म्हणून बॅरि. शेषराव वानखेडे यांच्यानंतर नाना पटेले हे विदर्भातील दुसरे आमदार राहतील. विदर्भाच्या वाट्याला विधानसभेचे उपाध्यक्षपद मात्र अनेकदा आले आहे. प्रमोद शेंडे, वसंत पुरके, सूर्यकांत डोंगरे, मोरेश्वर टेंमुर्डे हे विधानसभ उपाध्यक्ष राहिले आहेत. विदर्भातीलच रा.सू. गवई हे विधान परिषदेचे सभापती सुद्धा राहिले आहेत.आतापर्यंतचे अध्यक्ष१९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ही १४ वी विधानसभा आहे. १९६० मध्ये महाराष्ट्राच्या पहिल्याच विधानसभेचे अध्यक्ष सयाजी सिलम होते. १९६२ मध्ये त्र्यंबक भराडे अध्यक्ष बनले. १९६७ मध्ये त्यांना पुन्हा संधी मिळाली. ते अहमदनगरचे होते. १९७२ मध्ये विदर्भाचे बॅरि. शेषराव वानखेडे यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी आली. ते विधानसभेचे अध्यक्ष राहिले. आतापर्यंतचे विदर्भातील एकमेव आमदार होते. ते नागपूरचे तीन वर्षे महापौरही राहिलेत. क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष होते. यानंतर अध्यक्षपदाची जबाबदारी शिवराज पाटील, शरद दिघे, शंकरराव जगताप, मधुकरराव चौधरी, दत्ता नलावडे, अरुण गुजराथी, बाबासाहेब कुपेकर, दिलीप वळसे पाटील आणि हरिभाऊ बागडे यांनी सांभाळलेली आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारNana Patoleनाना पटोले