शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

विधानसभा अध्यक्ष बनणारे नाना पटोले विदर्भातील दुसरे आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 21:31 IST

सन १९७२ नंतर रविवारी पुन्हा एकदा नाना पटोले यांच्या रुपात विदर्भाला विधानसभा अध्यक्षाचे पद मिळेल. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या महाविकास आघाडीने शनिवारी १६९ मतांनी विधानसभेत बहुमत सिद्ध केले. आता अध्यक्षपदाचे आघाडीचे उमेदवार नाना पटोले यांचे निवडून येणे निश्चित आहे.

ठळक मुद्देबॅ. शेषराववानखेडे यांना मिळाली यापूर्वी संधी पटोले लोकसभा निवडणुकीत गडकरींविरुद्ध लढले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सन १९७२ नंतर रविवारी पुन्हा एकदा नाना पटोले यांच्या रुपात विदर्भाला विधानसभा अध्यक्षाचे पद मिळेल. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या महाविकास आघाडीने शनिवारी १६९ मतांनी विधानसभेत बहुमत सिद्ध केले. आता अध्यक्षपदाचे आघाडीचे उमेदवार नाना पटोले यांचे निवडून येणे निश्चित आहे. त्यामुळे अनेक वर्षांनंतर विदर्भाला विधानसभेचे अध्यक्षपद मिळेल.नाना पटोले यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशी चर्चा होती. काँग्रेसच्या पहिल्या दोन मंत्र्यांच्या रुपात बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांना संधी मिळाल्याने पटाले यांचेही नाव चर्चेत आले. पटोले या विधानसभेत भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदर संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. त्यांनी भाजपा सरकारमध्ये राज्यमंत्री राहिलेल्या डॉ. परिणय फुके यांचा पराभव केला आहे.नाना पटोले यांनी शेतकरी नेते म्हणून आपली ओळखी निर्माण केली आहे. काँग्रेसचे आमदार असलेल्या पटोले यांनी २००८ मध्ये आमदार पदाचा रजीनामा देऊन लोकसभा निवडणुकीत गोंदिया-भंडारा येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफु ल्ल पटेल यांना टक्कर दिली होती. यानंतर ते भाजपमध्ये सामील होवून विधानसभेत पाहोचले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातून विजयी झाले. शेतकऱ्यांच्या मुद्यावर त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पटले नाही. त्यामुळे ते भाजपा सोडून काँग्रेसमध्ये आले. यावर्षी लोकसभा निवडणुकीत त्यांनी नागपुरातून भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरुद्ध त्यांनी निवडणूक लढवली. पराभूत झाल्यानंतर त्यांनी विधानसभेकडे लक्ष दिले. आपल्या साकोली विधानसभा मतदार संघातून विजय प्राप्त केला.विधानसभा उपाध्यक्षपद अनेकदाविधानसभा अध्यक्ष म्हणून बॅरि. शेषराव वानखेडे यांच्यानंतर नाना पटेले हे विदर्भातील दुसरे आमदार राहतील. विदर्भाच्या वाट्याला विधानसभेचे उपाध्यक्षपद मात्र अनेकदा आले आहे. प्रमोद शेंडे, वसंत पुरके, सूर्यकांत डोंगरे, मोरेश्वर टेंमुर्डे हे विधानसभ उपाध्यक्ष राहिले आहेत. विदर्भातीलच रा.सू. गवई हे विधान परिषदेचे सभापती सुद्धा राहिले आहेत.आतापर्यंतचे अध्यक्ष१९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ही १४ वी विधानसभा आहे. १९६० मध्ये महाराष्ट्राच्या पहिल्याच विधानसभेचे अध्यक्ष सयाजी सिलम होते. १९६२ मध्ये त्र्यंबक भराडे अध्यक्ष बनले. १९६७ मध्ये त्यांना पुन्हा संधी मिळाली. ते अहमदनगरचे होते. १९७२ मध्ये विदर्भाचे बॅरि. शेषराव वानखेडे यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी आली. ते विधानसभेचे अध्यक्ष राहिले. आतापर्यंतचे विदर्भातील एकमेव आमदार होते. ते नागपूरचे तीन वर्षे महापौरही राहिलेत. क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष होते. यानंतर अध्यक्षपदाची जबाबदारी शिवराज पाटील, शरद दिघे, शंकरराव जगताप, मधुकरराव चौधरी, दत्ता नलावडे, अरुण गुजराथी, बाबासाहेब कुपेकर, दिलीप वळसे पाटील आणि हरिभाऊ बागडे यांनी सांभाळलेली आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारNana Patoleनाना पटोले