शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

नाना पटोले म्हणाले, समीर वानखेडे 'पोपट'.. त्याच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2022 16:12 IST

देश वाचवणं आता काँग्रेसची जबाबदारी आहे आणि त्यासाठी तरुणांना प्रशिक्षण देण्याचं काम या शिबिरातून होईल, असे पटोले म्हणाले.

नागपूर : मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यनला मोठा दिलासा मिळाला आहे. आर्यन खानला कोर्टाकडून क्लीन चिट मिळाली आहे. तर, या प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे तत्कालीन मुंबई प्रमुख समीर वानखेडे यांच्याविरोधात चौकशी सुरू होणार असल्याची माहिती आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

केंद्रीय तपास यंत्रणेचा सातत्याने दुरुपयोग होत आहे, हे आम्ही आधीपासूनच सांगत आहोत. आर्यन खान प्रकरणातही काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली होती. समीर वानखेडेवर कुठलीही कारवाई होणार नाही. कारण, वानखेडे केंद्रीय तपास यंत्रणेतील एक पोपट होता आणि या पोपटावर कुठलीही कारवाई होणार नाही हे आपल्याला येत्या काळात दिसून येईल, असे पटोले म्हणाले.

सोशल मीडिया सेशन

भाजप दररोज ४० कोटी रुपये खर्च करुन देशभरात  जे काम करत आहे ते काम काँग्रेस करणार नाहीय वस्तूस्थिती समाजासमोर मांडणं ही भूमिक काँग्रेसची सातत्याने राहिली आहे. काँग्रेसचे जे कार्यकर्ते सोशल मीडियात काम करत आहेत त्यांना आणखी ट्रेनिंग देणं, अलिकडच्या स्पर्धेत कसं टिकता येईल यावर देशव्यापी काँग्रेस कार्यकर्त्यांचं सेशन ठेवलं आहे, असे पटोले यांनी सांगितलं.

राणा दाम्पत्याकडून आज नागपुरात हनुमान चालीसा पठण केलं जाणार आहे. याबाबत प्रश्न विचारला असता हनुमान चालीसा हा आस्थेचा विषय आहे, मी हनुमान चालीसा वाचून घरून निघतो. याचं राजकारण कशासाठी ?  तसेच, देशात महागाईसारखे प्रश्न असताना धार्मिक मुद्द्यावरुन राजकारण सुरू आहे, अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसAryan Khanआर्यन खानSameer Wankhedeसमीर वानखेडेBJPभाजपा