शहरं
Join us  
Trending Stories
1
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
2
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
3
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
4
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
5
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
6
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
7
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
8
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
9
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
10
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
11
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
12
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ
13
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
14
एका श्वानामुळे तब्बल अर्धा तास रखडली ट्रेन, प्रवाशांचाही उडाला गोंधळ! नेमकं झालं तरी काय?
15
सुवर्णसंधी! BSF मध्ये हेड काँन्स्टेबल पदांवर मेगाभरती; या तारखेपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया
16
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
17
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
18
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
19
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
20
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?

"मदत तोकडी पण शेतकऱ्यांना पॅकेजमुळे दिलासा"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2021 14:38 IST

शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत ही राज्य सरकारने आपल्या आर्थिक स्थितीनुसार केली आहे. ही मदत तोकडी आहे हे सत्य आहे मात्र डिजास्टर मॅनेजमेंटनुसार केंद्र सरकारने राज्यांना मदत करायला पाहिजे. पण तसे न केल्याने ही अल्प मदत करावी लागली, असे नाना पटोले म्हणाले आहेत.

ठळक मुद्देपॅकेजसंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार : नाना पटोले

नगपूर : केंद्र शासनाकडून अपेक्षित मदत न मिळाल्यामुळेच राज्य सरकारने तोकडी का होईना आर्थिक मदत जाहीर केली. या पॅकेजमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी आशा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली. 

राज्यातील विशेषत: विदर्भ, मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंदर्भात पंचनामे आणि आढावा घेतल्यानंतर बुधवारच्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर सरकारने पॅकेजची घोषणा केली. ही मदत पुरेशी नाही! मात्र या संकटकाळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही मदत असल्याची भावना पटोले यांनी व्यक्त केली. 

आज नागपुरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळेस त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजवर समाधानी आहात का, या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत ही राज्य सरकारने आपल्या आर्थिक स्थितीनुसार केली आहे. ही मदत तोकडी आहे हे सत्य आहे मात्र, डिजास्टर मॅनेजमेंटनुसार केंद्र सरकारने राज्याला भरीव निधी देऊन मदत करायला पाहिजे. पण तसे न केल्यामुळे  सध्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार राज्य सरकारने ही मदत जाहीर केली आहे. यात राज्याच्या विरोधी पक्षाने लक्ष घालण्याची गरज आहे. जेव्हा राज्याची आर्थिक स्थिती सुधरेल तेव्हा राज्य सरकारला भरीव मदत करण्याच्या सूचना करणार असल्याचे पटोले यावेळी म्हणाले. 

दरम्यान, परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतीला मोठा फटका बसला आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नियोजित दौरे रद्द करत अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करून नागरिकांशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला मदत देण्याची मगणी केली होती.

त्यानंतर, राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. पंचनामे आणि आढावा घेतल्यानंतर आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत मदतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार सरकारने पॅकेजची घोषणा केली.

टॅग्स :agricultureशेतीNana Patoleनाना पटोलेFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा