शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नळाला नाही पाणी, घागर रिकामी रे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 00:43 IST

पाणीकपातीच्या निर्णयाची बुधवारपासून उपराजधानीत अंमलबजावणी सुरू झाली. यामुळे शहरातील ८० टक्के भागात पाणीपुरवठाच झाला नाही. तर कन्हान नदीतील पाण्याची स्थिती चांगली असल्यामुळे पूर्व व उत्तर नागपुरातील काही भागात १६० एमएलडी पाण्याचा पुरवठा झाला. शहरात दिवसभर टँकरची चाकेदेखील बंद होती. शहरातील वस्त्यावस्त्यांमध्ये पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू असल्याचे चित्र होते.

ठळक मुद्देशहरातील ८० टक्के भाग कोरडा : कन्हान नदीमुळे पूर्व, उत्तर नागपूरवर कृपा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाणीकपातीच्या निर्णयाची बुधवारपासून उपराजधानीत अंमलबजावणी सुरू झाली. यामुळे शहरातील ८० टक्के भागात पाणीपुरवठाच झाला नाही. तर कन्हान नदीतील पाण्याची स्थिती चांगली असल्यामुळे पूर्व व उत्तर नागपुरातील काही भागात १६० एमएलडी पाण्याचा पुरवठा झाला. शहरात दिवसभर टँकरची चाकेदेखील बंद होती. शहरातील वस्त्यावस्त्यांमध्ये पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू असल्याचे चित्र होते.पूर्व, उत्तर व दक्षिण नागपुरातील ‘आऊटर’ भाग पूर्णत: टँकरवर अवलंबून असतात. मात्र टँकर बंद असल्याने या भागांमध्ये पाण्यासाठी शोध सुरू असल्याचे दिसून आले. लोक विहिरी व हॅण्डपंपातून पाणी भरत होते. ज्यांनी प्लास्टिकच्या टाक्यांमध्ये पाणी भरले होते, तेथेदेखील दुपारनंतर जलशोधमोहिम दिसून आली. दक्षिण-पश्चिम, पश्चिम नागपुरात पाणीपुरवठा पूर्णत: ठप्प झाला होता.शहरात दिवसभर पाण्याचे टँकर्स बंद होते. गुरुवारी शहरात पाणीपुरवठा समान व चांगल्या प्रमाणात व्हावा यासाठी ओसीडब्ल्यू व जलप्रदाय विभागाला आवश्यक दिशानिर्देश देण्यात आले आहेत, असे जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी सांगितले.चार झोनमध्ये पाणीपुरवठाप्राप्त झालेल्या माहितीनुसार कन्हान नदीत पाण्याची पातळी चांगली आहे. जर या पाण्याचा उपयोग झाला नाही तर ते वाहून जाऊ शकते. यामुळेच कन्हान जलशुद्धीकरण केंद्र बुधवारी सुरू होते. त्यामुळे पूर्व व उत्तर नागपुरांतर्गत येणाऱ्या नेहरूनगर, सतरंजीपुरा, लकडगंज व आसीनगर झोनच्या अनेक भागात पाणीपुरवठा झाला. मात्र ही स्थिती जास्त काळ राहणार नाही. जोपर्यंत कन्हान नदीत पाणी असेल तोपर्यंत येथे पाणीपुरवठा होईल.‘ओसीडब्ल्यू’ला दोनशेहून अधिक फोनपाणीपुरवठा न झाल्यामुळे ओसीडब्ल्यूच्या टोल फ्री क्रमांकावर दिवसभर फोनची घंटी खणखणत होती. दिवसभरात एकूण २०३ फोन आले. यात १०२ फोन हे पाणीकपातीचा निर्णय खरा आहे की नाही, याची विचारणा करण्यासाठी होते. तर १०१ जणांनी पाणीपुरवठा न झाल्याची तक्रार केली.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईnagpurनागपूर