शहरं
Join us  
Trending Stories
1
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
2
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
3
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
4
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
5
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
6
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
7
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
8
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
9
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
10
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
11
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
12
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
13
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
14
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
15
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
16
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
17
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
18
"विश्वास ठेवा, दुसरा कुठलाही हेतू नाही" माओवाद्यांनी आत्मसमर्पणासाठी मागितली १५ फेब्रुवारीपर्यंतची वेळ
19
IND vs SA: टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी, दुसरीकडे करूण नायरची सूचक पोस्ट, म्हणाला...
20
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविकास विभागाच्या आदेशाला नागपूर जि.प.चा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 00:08 IST

ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवरील थकीत वीज बिल ग्रामपंचायतींनी स्वनिधीतून, चौदाव्या वित्त आयोगातून किंवा इतर निधीतून भरावे, असे पत्र ग्रामविकास विभागाने काढले आहे. ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती बघता, आम्ही पथदिव्यांचे थकीत वीज बिल भरणार नाही, असा निर्णय जि.प.च्या अध्यक्ष निशा सावरकर यांनी घेतला आहे.

ठळक मुद्देअध्यक्ष म्हणतात, थकीत बिल भरणार नाही : निर्णय मागे घेण्याची मागणी

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर. ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवरील थकीत वीज बिल ग्रामपंचायतींनी स्वनिधीतून, चौदाव्या वित्त आयोगातून किंवा इतर निधीतून भरावे, असे पत्र ग्रामविकास विभागाने काढले आहे. ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती बघता, आम्ही पथदिव्यांचे थकीत वीज बिल भरणार नाही, असा निर्णय जि.प.च्या अध्यक्ष निशा सावरकर यांनी घेतला आहे. ग्रामविकास विभागाने हे निर्देश मागे घ्यावे, अशी मागणी अध्यक्ष सावरकर यांनी केली आहे.राज्यात ग्राम पंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवरील विजेच्या दिव्यांचे बिल शासनस्तरावरून भरले जाते. हे वीज बिल ग्रामपंचायतीकडून भरले जात नव्हते. मध्यंतरी या पथदिव्याच्या थकीत वीज बिलामुळे महावितरणने अनेक ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची वीज तोडली होती. मोठा बोभाटा झाल्यानंतर वीज जोडणी पूर्ववत केली होती. आता पुन्हा शासनाने पत्र काढल्याने ऐन उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामपंचायतीसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. पथदिव्यांच्या थकीत वीज बिलाचा प्रश्न राज्यभर आहे. राज्यातील ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांची सुमारे ३०० कोटींची वीज बिले शासनस्तरावर थकीत असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना अतितात्काळ म्हणून पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवरील दिव्यांची बरीचशी वीज बिले थकीत असल्याचे निदर्शनास आले आहे. या वीज बिलासाठी महावितरण विद्युत कंपनी वीज जोडणी खंडित करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील गैरसोय टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी (ग्रामपंचायत) त्यांच्या स्वनिधीतून, चौदाव्या वित्त आयोगातून किंवा इतर निधीतून थकीत बिले भरावी.याबाबत जि.प.अध्यक्षा निशा सावरकर यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन स्थिती लक्षात आणून दिली. यापूर्वी या देयकांचे शोधन शासन करीत असल्याचे त्यांनी सांगितले. ऊर्जामंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेणार, असे आश्वासन दिल्याची माहिती जि.प.अध्यक्षा निशा सावरकर यांनी दिली.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnagpurनागपूर