शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या गरीब आॅटोचालकाने उभारला दीडशे कोटींचा व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 23:46 IST

आईचे दागिने विकून कसातरी एक आॅटो विकत घेतला. दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस करून तो चालवला व त्यातून हाती आलेल्या चार-दोन पैशांच्या बळावर मोठी झेप घेतली. प्रतिकूलतेच्या वादळांनी वाट अडवली खरी, पण स्वत:वरचा विश्वास त्याने ढळू दिला नाही. अभावातून प्रभाव निर्माण करणार हाच माणूस आज दीडशे कोटीच्या व्यवसायाचा मालक ठरला आहे. जिथे दोनवेळच्या भाकरीसाठी झगडावे लागायचे त्याच घराच्या अंगणात आज १२५ ट्रेलरचा ताफा उभा आहे. प्यारे खान त्याचे नाव. आॅटोचालक प्यारेच्या जिद्दीची ही यशोगाथा क्षणिक पराभवाने खचून जाणाऱ्या अनेकांसाठी प्रेरणावाट ठरेल अशीच आहे.

ठळक मुद्देजिद्दीची यशोगाथा : भाकर मिळत नव्हती, आज अंगणात उभे आहेत १२५ ट्रेलर

लोकमत न्यूज नेटवर्कसुमेध वाघमारेनागपूर : शिक्षण - दहावी नापास. उदरनिर्वाहाचे साधन- गोळ्या-बिस्किटांचे दुकान. घरी आश्रित- आई-वडील, तीन भाऊ, बहिणी. भाकरीचा संघर्ष पाचवीलाच पूजलेला. आईचे दागिने विकून कसातरी एक आॅटो विकत घेतला. दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस करून तो चालवला व त्यातून हाती आलेल्या चार-दोन पैशांच्या बळावर मोठी झेप घेतली. प्रतिकूलतेच्या वादळांनी वाट अडवली खरी, पण स्वत:वरचा विश्वास त्याने ढळू दिला नाही. अभावातून प्रभाव निर्माण करणार हाच माणूस आज दीडशे कोटीच्या व्यवसायाचा मालक ठरला आहे. जिथे दोनवेळच्या भाकरीसाठी झगडावे लागायचे त्याच घराच्या अंगणात आज १२५ ट्रेलरचा ताफा उभा आहे. प्यारे खान त्याचे नाव. आॅटोचालक प्यारेच्या जिद्दीची ही यशोगाथा क्षणिक पराभवाने खचून जाणाऱ्या अनेकांसाठी प्रेरणावाट ठरेल अशीच आहे.प्रचंड मेहनतीच्या भरवशावर कोट्यवधीचा व्यावसायिक होऊनही श्रीमंतीची हवा प्यारे यांच्या डोक्यात गेलेली नाही. त्यांच्या हाताखाली ३०० कर्मचारी काम करतात. त्या सर्वांना आपल्या जीवाभावाप्रमाणेच मानतो. कामाच्याप्रति प्रामाणिक राहा, श्रम घेण्याची तयारी ठेवा आणि ध्येयपासून विचलित होऊ नका, असाच सल्ला ते सर्वांना देतात. ‘लोकमत’ने त्यांच्या यशाविषयी विचारले असता सुरुवातीला प्रसिद्धी नको म्हणून टाळले, परंतु आपले यश इतरांना प्रेरणादेणारे ठरेल याचे महत्त्व पटवून दिल्यावर त्यांनी बोलण्यास सुरुवात केली. प्यारेलाल म्हणाले, घरची स्थिती अत्यंत हलाखीची. अर्धेपोट उपाशी राहून कधी लहानाचा मोठा झालो ते कळलेच नाही. त्यात शिक्षण दहावी नापास. रेल्वे स्टेशनवर संत्री विकण्यापासून ते दुचाकी धुण्याचे काम केले. याचवेळी एकाने आॅटो चालविणे शिकविले. अम्मीने आॅटो विकत घेण्यासाठी १२ हजार रुपये दिले. परंतु हे पैसेही तोकडे होते. ताजबागेत राहतो म्हणून बँकेने कर्ज देण्यास नकार दिला. मित्रांकडून उसनवारीने आॅटो विकत घेतला. दिवस-रात्र एक करून आॅटो चालविला. लहानपणापासून हार्माेनियम वाजविण्याची आवड होती. त्याचा उपयोगही पैसे मिळविण्यासाठी केला. ओ.पी. सिंह आॅर्केस्ट्रात १५० रुपये रोजंदारीने ‘की बोर्ड’ वाजवू लागलो. आॅर्केस्ट्राला चांगले दिवस आल्याने त्यांना बाहेर मागणी होऊ लागली. परंतु ये-जा करण्यासाठी बस नव्हती. मी हिंमत दाखविली. आॅटो विकला, सेकंडहॅण्ड बस विकत घेतली. मात्र बसमधून हवी तशी मिळकत होत नव्हती. कुठल्याही स्थितीत पैसा मिळविण्याच्या जिद्दीने ट्रकचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.प्यारे म्हणाले, कर्जासाठी अनेक बँकेचे उंबरठे झिजविले, परंतु कुणीच कर्ज देत नव्हते. अखेर एका बँकेने विश्वास दाखविला आणि ११ लाखांचे कर्ज दिले. परंतु सहा महिन्यातच ट्रकचा मोठा अपघात झाला. ट्रकचा चुराडा झाला. पुन्हा रस्त्यावर आलो. ‘ट्रान्सपोर्ट’चा व्यवसाय माझ्यासाठी लाभदायक नसल्याचा अनेकांनी सल्ला दिला. परंतु हिमंत हारली नाही. ज्याने मला रस्त्यावर आणले त्याच व्यवसायात प्रगती करून दाखवीन, अशी जिद्द ठेवली. पुन्हा उसनवारीतून ट्रकची दुरुस्ती केली. ट्रक चालविण्यास सुरुवात केली. एका अडलेल्या कंपनीला तातडीने मदत केली. त्या कंपनीच्या मालकाने माझा प्रामाणिकपणा व श्रम करण्याची तयारी पाहून पुढे अनेक कामे दिली. यातूनच २००५ मध्ये दुसरा ट्रक घेतला, नंतर एकेक ट्रकची संख्या वाढू लागली. पुढे ट्रक सोडून ट्रेलर विकत घेतले आणि आश्मी रोड कॅरिअर्स प्रा. लिमिटेडच्या नावाने कंपनी स्थापन करून ‘ट्रान्सपोर्ट’चा व्यवसाय सुरू केला. आज १२५ ट्रेलर आहेत. १६० चक्क्यांच्या ट्रेलरचाही यात समावेश आहे. वर्षाचा १५० कोटींचा व्यवसाय आहे.पेट्रोल पंपासाठी २०१३ मध्ये दिली दहावीची परीक्षाप्यारे म्हणाले, स्वत:चे पेट्रोल पंप असावे हे स्वप्न होते. परंतु त्यासाठी दहावी पासची अट आड येत होती. २०१३ मध्ये दहावीची परीक्षा दिली. परंतु दोनवेळा नापास झाल्यावर पास झालो. उमरेड रोडवर आज सर्वात मोठा पेट्रोल पंप आहे. २०१६ मध्ये बारावीची परीक्षा दिली. त्यातही दोनदा नापास होऊन गेल्याच वर्षी उतीर्ण झालो, असे म्हणत प्यारेलाल म्हणाले की, जीवनात कितीही अडथळे आले तरी हार मानू नका. हे अडथळेच तुम्हाला तुमच्या यशाच्या शिखरावर पोहचवितात. त्या अडथळ्यांमधून स्वत:ला घडवा, प्रचंड मेहनत घ्या, आपल्या लक्ष्याविषयी, कामाविषयी प्रामाणिक राहा. यश नक्कीच मिळेल.

टॅग्स :nagpurनागपूर