शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
4
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
5
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
6
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
7
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
8
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
9
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
10
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
11
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
12
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
13
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
14
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
15
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
16
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
18
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
19
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
20
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!

नामांतराच्या लढ्यात नागपूरचे अतुलनीय योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 21:18 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात नागपूरचे मोठे योगदान राहिले आहे. महाराष्ट्रभर पेटलेल्या या आंदोलनात अनेक भीमसैनिक शहीद झाले. यात नागपूरचे भीमसैनिक मोठ्या संख्येने होते.

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिन विशेषअनेक भीमसैनिक शहीद : दीक्षाभूमीवरून निघाला ऐतिहासिक लाँगमार्च

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडाविद्यापीठ नामांतर लढ्यात नागपूरचे मोठे योगदान राहिले आहे. महाराष्ट्रभर पेटलेल्या या आंदोलनात अनेक भीमसैनिक शहीद झाले. यात नागपूरचे भीमसैनिक मोठ्या संख्येने होते. नामांतरासाठी निघालेला ऐतिहासिक लाँग मार्च हा नागपूरच्या दीक्षाभूमीवरूनच काढण्यात आला होता. या लढ्याने पुढे चळवळीचे स्वरुप घेतले आणि ही चळवळ चालवण्यात आणि नामांतराची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला बाध्य करण्यातही नागपूरच्या नेतृत्वानेच महत्त्वाची भूमिका बजावली आहे, हे विशेष.औरंगाबाद येथील मराठवाडाविद्यापीठाला डॉ. आंबेडकरांचे नाव देण्याचा ठराव महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात २७ जुलै १९७८ रोजी एकमताने मंजूर झाला आणि आंबेडकरी बौद्ध अनुयायांवर अचानक हिंसाचार वाढला. या हिसांचारच्या विरोधातील पहिली तीव्र प्रतिक्रिया उमटली ती नागपुरातच. या अत्याचाराविरोधात ४ ऑगस्ट १९७८ रोजी नागपुरात विशाल संयुक्त मोर्चा निघाला. या मोर्चातून परतणाऱ्या जमावावर इंदोरा भागात पोलिसांनी बेछुट गोळीबार केला. ४ व ५ ऑगस्ट असे दोन दिवस पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच आंदोलक शहीद झाले. नागपुरातील आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरल्यानंतर आणि भीमसैनिकांच्या बलिदाननंतरच मराठवाड्यातील आंबेडकरी समाजावरील हिंसक हल्ले थांबले आणि तत्कालीन सरकारलाही हिंसाचार थांबविणे भाग पडले. नामांतर ठरावाच्या अंमलबजावणीसाठी १९७८-७९ अशी दोन वर्षे नागपुरात आंबेडकरी आणि पुरोगामी संघटनांनी रान उठविले होते. आंदोलनाचा एकच धडाडा लावला होता. ६ डिसेंबर १९७९ रोजी नागपुरात नामांतरासाठी स्वयंस्फूर्त असा विशाल मोर्चा निघाला होता. लाखोंच्या या मोर्चामुळे पोलीस यंत्रणेला धडकी भरली. हे आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी पुन्हा गोळीबर केला. ६ व ७ डिसेंबर असे दोन दिवस तांडव सुरू होते. या दोन दिवसात आणखी चार भीमसैनिक शहीद झाले.नामांतराच्या लढ्यात ६ डिसेंबर १९७९ रोजीचा औरंगाबाद येथील विशाल नामांतर सत्याग्रह व प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी ११ नेव्हेंबर १९७९ रोजी नागपुरातून औरंगाबादसाठी काढलेला लाँगमार्च ऐतिहासिक ठरला.मराठवाड्याच्या सीमेवर बुलडाणा जिल्ह्यात  दुसरा बिडजवळ खडकपूर्णाच्या राहेरी पुलावर २७ नेव्हेंबरला लाँगमार्च अडवून प्रा. कवाडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना अटक करून औरंगाबाद तुरुंगात ठेवले होते. तर शेकडो भीमसैनिकांना नागपूरच्या कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. औरंगाबाद येथे ६ डिसेंबर रोजी झालेल्या सत्याग्रहात अटक करण्यात आलेल्या नागपूरच्या प्रमुख कार्यकर्त्यांना विविध कारगृहात ठेवण्यात आले होते. असंख्य कार्यकर्ते तेव्हा नामांतरासाठी तुरुंगात होते.६ सप्टेंबर १९८२ रोजी मुंबईत नामांतर निर्धार सत्याग्रह करण्यात आला होता. त्यातही हजारो कार्यकर्त्यांना अटक करून राज्यातील विविध कारागृहात ठेवण्यात आले होते. नामांतराच्या १९९३ च्या अंतिम लढ्यातही नागपूर पुढे होते. उत्तर नागपूरचे तत्कालीन आमदार उपेंद्र शेंडे यांनी १५ ऑगस्ट १९९३ पासून मुंबईत सुरू केलेल्या बेमुदत उपोषणामुळे नामांतर लढ्याला पुन्हा गती मिळाली. त्यानंतर मोठे आंदोलन, झालेले आत्मदहन आणि आत्माहुतीमुळे सरकारला आंबेडकरी शक्तीपुढे नमावे लागले आणि अखेर १६ वर्षाच्या अविरत संघर्षानंतर अखेर १४ जानेवरी १९९४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर ठरावाची अंमलबजावणी करावी लागली. नामांतर आंदोलनात सहभागी झालेले आणि तुरुंगवास भोगलले अनेक कार्यकर्ते आजही नागपूर व विदर्भात आहेत. त्यांना या आंदोलनात सहभागी झाल्याचा , तुरुंगवास भोगल्याचा आजही सार्थ अभिमान वाटतो.नामांतरासाठी तुरुंगवास पत्करल्याचा सार्थ अभिमाननामांतरासाठी औरंगाबाद येथे ६ डिसेंबर १९७९ रोजी झालेल्या सत्याग्रहात पोलिसांनी अटक केल्यानंतर १२ दिवस पुणे येथील येरवडा कारागृहात आम्हाला ठेवले होते. त्यानंतर ६ सप्टेंबर १९८२ रोजी मुंबईत झालेल्या नामांतर निर्धार सत्याग्रहात अटक करून २० सप्टेंबर १९८२ पर्यंत भायखळा (ऑर्थर रोड) कारागृहात ठेवले होते. नामांतराच्या आंदोलनात दोन वेळा तुरुंगवास पत्करावा लागला, याचा सार्थ अभिमान आहे.अनिल वासनिक, नामांतर आंदोनातील कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व लेखक

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरMarathwadaमराठवाडाuniversityविद्यापीठagitationआंदोलन