शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नामांतराच्या लढ्यात नागपूरचे अतुलनीय योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 21:18 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात नागपूरचे मोठे योगदान राहिले आहे. महाराष्ट्रभर पेटलेल्या या आंदोलनात अनेक भीमसैनिक शहीद झाले. यात नागपूरचे भीमसैनिक मोठ्या संख्येने होते.

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिन विशेषअनेक भीमसैनिक शहीद : दीक्षाभूमीवरून निघाला ऐतिहासिक लाँगमार्च

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडाविद्यापीठ नामांतर लढ्यात नागपूरचे मोठे योगदान राहिले आहे. महाराष्ट्रभर पेटलेल्या या आंदोलनात अनेक भीमसैनिक शहीद झाले. यात नागपूरचे भीमसैनिक मोठ्या संख्येने होते. नामांतरासाठी निघालेला ऐतिहासिक लाँग मार्च हा नागपूरच्या दीक्षाभूमीवरूनच काढण्यात आला होता. या लढ्याने पुढे चळवळीचे स्वरुप घेतले आणि ही चळवळ चालवण्यात आणि नामांतराची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला बाध्य करण्यातही नागपूरच्या नेतृत्वानेच महत्त्वाची भूमिका बजावली आहे, हे विशेष.औरंगाबाद येथील मराठवाडाविद्यापीठाला डॉ. आंबेडकरांचे नाव देण्याचा ठराव महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात २७ जुलै १९७८ रोजी एकमताने मंजूर झाला आणि आंबेडकरी बौद्ध अनुयायांवर अचानक हिंसाचार वाढला. या हिसांचारच्या विरोधातील पहिली तीव्र प्रतिक्रिया उमटली ती नागपुरातच. या अत्याचाराविरोधात ४ ऑगस्ट १९७८ रोजी नागपुरात विशाल संयुक्त मोर्चा निघाला. या मोर्चातून परतणाऱ्या जमावावर इंदोरा भागात पोलिसांनी बेछुट गोळीबार केला. ४ व ५ ऑगस्ट असे दोन दिवस पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच आंदोलक शहीद झाले. नागपुरातील आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरल्यानंतर आणि भीमसैनिकांच्या बलिदाननंतरच मराठवाड्यातील आंबेडकरी समाजावरील हिंसक हल्ले थांबले आणि तत्कालीन सरकारलाही हिंसाचार थांबविणे भाग पडले. नामांतर ठरावाच्या अंमलबजावणीसाठी १९७८-७९ अशी दोन वर्षे नागपुरात आंबेडकरी आणि पुरोगामी संघटनांनी रान उठविले होते. आंदोलनाचा एकच धडाडा लावला होता. ६ डिसेंबर १९७९ रोजी नागपुरात नामांतरासाठी स्वयंस्फूर्त असा विशाल मोर्चा निघाला होता. लाखोंच्या या मोर्चामुळे पोलीस यंत्रणेला धडकी भरली. हे आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी पुन्हा गोळीबर केला. ६ व ७ डिसेंबर असे दोन दिवस तांडव सुरू होते. या दोन दिवसात आणखी चार भीमसैनिक शहीद झाले.नामांतराच्या लढ्यात ६ डिसेंबर १९७९ रोजीचा औरंगाबाद येथील विशाल नामांतर सत्याग्रह व प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी ११ नेव्हेंबर १९७९ रोजी नागपुरातून औरंगाबादसाठी काढलेला लाँगमार्च ऐतिहासिक ठरला.मराठवाड्याच्या सीमेवर बुलडाणा जिल्ह्यात  दुसरा बिडजवळ खडकपूर्णाच्या राहेरी पुलावर २७ नेव्हेंबरला लाँगमार्च अडवून प्रा. कवाडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना अटक करून औरंगाबाद तुरुंगात ठेवले होते. तर शेकडो भीमसैनिकांना नागपूरच्या कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. औरंगाबाद येथे ६ डिसेंबर रोजी झालेल्या सत्याग्रहात अटक करण्यात आलेल्या नागपूरच्या प्रमुख कार्यकर्त्यांना विविध कारगृहात ठेवण्यात आले होते. असंख्य कार्यकर्ते तेव्हा नामांतरासाठी तुरुंगात होते.६ सप्टेंबर १९८२ रोजी मुंबईत नामांतर निर्धार सत्याग्रह करण्यात आला होता. त्यातही हजारो कार्यकर्त्यांना अटक करून राज्यातील विविध कारागृहात ठेवण्यात आले होते. नामांतराच्या १९९३ च्या अंतिम लढ्यातही नागपूर पुढे होते. उत्तर नागपूरचे तत्कालीन आमदार उपेंद्र शेंडे यांनी १५ ऑगस्ट १९९३ पासून मुंबईत सुरू केलेल्या बेमुदत उपोषणामुळे नामांतर लढ्याला पुन्हा गती मिळाली. त्यानंतर मोठे आंदोलन, झालेले आत्मदहन आणि आत्माहुतीमुळे सरकारला आंबेडकरी शक्तीपुढे नमावे लागले आणि अखेर १६ वर्षाच्या अविरत संघर्षानंतर अखेर १४ जानेवरी १९९४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर ठरावाची अंमलबजावणी करावी लागली. नामांतर आंदोलनात सहभागी झालेले आणि तुरुंगवास भोगलले अनेक कार्यकर्ते आजही नागपूर व विदर्भात आहेत. त्यांना या आंदोलनात सहभागी झाल्याचा , तुरुंगवास भोगल्याचा आजही सार्थ अभिमान वाटतो.नामांतरासाठी तुरुंगवास पत्करल्याचा सार्थ अभिमाननामांतरासाठी औरंगाबाद येथे ६ डिसेंबर १९७९ रोजी झालेल्या सत्याग्रहात पोलिसांनी अटक केल्यानंतर १२ दिवस पुणे येथील येरवडा कारागृहात आम्हाला ठेवले होते. त्यानंतर ६ सप्टेंबर १९८२ रोजी मुंबईत झालेल्या नामांतर निर्धार सत्याग्रहात अटक करून २० सप्टेंबर १९८२ पर्यंत भायखळा (ऑर्थर रोड) कारागृहात ठेवले होते. नामांतराच्या आंदोलनात दोन वेळा तुरुंगवास पत्करावा लागला, याचा सार्थ अभिमान आहे.अनिल वासनिक, नामांतर आंदोनातील कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व लेखक

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरMarathwadaमराठवाडाuniversityविद्यापीठagitationआंदोलन