शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नागपूरचा कचरा जबलपूरला जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 23:42 IST

भांडेवाडी येथील डम्पिंग यार्ड परिसरातील नागरिक दुर्गंधीमुळे त्रस्त आहेत. डम्पिंग यार्ड शहराबाहेर नेण्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे डम्पिंग यार्डमध्ये कचऱ्याचा मोठा डोंगर उभा राहिला असून कचरा कुठे साठवावा, असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला आहे. परंतु भांडेवाडी येथील कचरा जबलपूर येथे नेला जाणार असल्याने नागरिकांना आता लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे.

ठळक मुद्देभांडेवाडी परिसरातील नागरिकांना मिळणार मोठा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भांडेवाडी येथील डम्पिंग यार्ड परिसरातील नागरिक दुर्गंधीमुळे त्रस्त आहेत. डम्पिंग यार्ड शहराबाहेर नेण्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे डम्पिंग यार्डमध्ये कचऱ्याचा मोठा डोंगर उभा राहिला असून कचरा कुठे साठवावा, असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला आहे. परंतु भांडेवाडी येथील कचरा जबलपूर येथे नेला जाणार असल्याने नागरिकांना आता लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे.केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांनी सांडपाण्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती प्रकल्पांना या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यातून महापालिकेला वर्षाला ८० कोटी मिळत आहे. तसेच वीज प्रकल्पासाठी सांडपाणी वापरले जात असल्याने पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत आहे. गडकरी यांच्याच प्रयत्नातून कचऱ्यापासून वीजनिर्मिती व बायो-फ्युएल निर्माण केले जाणार आहे. यातून महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यासोबतच कचऱ्याचीही समस्या मार्गी लागणार आहे.नागपूर शहरातून दररोज ११०० ते १२०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. हा कचरा भांडेवाडी येथील डम्पिंग यार्ड येथे साठविला जातो. कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने डम्पिंग यार्डची क्षमता संपली आहे. याचा विचार करता महापालिकेने एस्लेल इन्फ्रा गु्रपशी भांडेवाडी येथे कचऱ्यापासून ११.५ मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याचा करार के ला आहे. यासाठी १० एकर जागा दिली आहे. नागपुरातील प्रकल्प अद्याप सुरू झालेला नाही. दोन वर्षात हा प्रकल्प उभारावयाचा आहे. मात्र या कंपनीने मध्य प्रदेशातील जबलपूर येथे कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पासाठी भांडेवाडी येथील घनकचऱ्यावर प्रक्रिया करून निर्माण होणारे आरडीएफ जबलपूरला नेणार आहे. नागपूर शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. यासोबतच भांडेवाडी येथील कचऱ्याची विल्हेवाट लागणार असल्याने मोठी समस्या सुटणार आहे.भांडेवाडी येथे बायो-मायनिंगमहापालिकेने भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे साचून असलेल्या कचऱ्याचे बायो-मायनिंग सुरू केले आहे. कचऱ्याचे वर्गींकरण तसेच रासायनिक प्रक्रिया करून कचरा नष्ट केला जात आहे. यामुळे डम्पिंग यार्डमध्ये साचून असलेल्या कचऱ्याची मोठ्या प्रमाणात विल्हेवाट लावण्यात यश आले आहे. दुर्गंधीचा त्रास कमी झाला आहे.भांडेवाडीत ११ लाख मेट्रिक टन कचराभांडेवाडी डम्पिंगयार्ड येथे ११ लाख मेट्रिक टन कचरा साचून आहे. डम्पिंगयार्डची क्षमता संपली आहे. त्यातच शहरातून दररोज ११०० ते १२०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. यामुळे कचरा साठविण्याची समस्या निर्माण झाली आहे. येथील कचरा जबलपूरला जाणार असल्याने भांडेवाडी येथील जागा रिकामी होईल. या जागेवर एस्लेल गु्रप कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प उभारणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.गडकरींच्या प्रयत्नामुळे मनपाला आर्थिक फायदाकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांनी महापालिकेला सांडपाण्यापासून ८० कोटींचे उत्पन्न होत आहे. तसेच एस्सेल ग्रुप दररोज ८०० टन कचरा वीजनिर्मितीसाठी महापालिकेकडून घेणार आहे. या कचऱ्यातून ११.५ मेगावॅट वीजनिर्मिती होईल. ही वीज पारडी येथील उपकेंद्राला देण्यात येणार आहे. येथून ही वीज महावितरणकडे वळती केली जाणार आहे. तसेच कंपोस्ट खत, बायोफ्युअल निर्माण होणार असल्याने भविष्यात यामुळे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.आठ-दहा दिवसात आरडीएफ जबलपूरला जाणारएस्लेल गु्पचा जबलपूर येथे कचऱ्यापासून वीज प्रकल्प सुरू झाला आहे. भांडेवाडी येथील कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून निर्माण होणारे आरडीएफ जबलपूर येथील वीज प्रकल्पासाठी नेले जाणार आहे. येत्या आठ-दहा दिवसात याला सुरुवात होईल. यामुळे भांडेवाडी डम्पिंगयार्ड मधील चार एकर जागा खाली होणार आहे. भांडेवाडीत कचऱ्यातून वीजनिर्मिती प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर महापालिका कचऱ्यातून बायो ऑईल, बायोचरची निर्मिती करणार आहे. येथे दररोज ८०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मिती केली जाणार आहे.अभिजित बांगर, आयुक्त महापालिका

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न