शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

नागपूर शौचालयाचे पाणी प्रकरण विधानसभेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 11:23 PM

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत शौचालयाचे पाणी विद्यार्थ्यांना पाजल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यासंदर्भात विधानसभेचे सदस्य आमदार डॉ. मिलिंद माने यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला आहे. यासंदर्भात शासनाच्या अवर सचिवांनी जिल्हा परिषदेला या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती मागितली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत शौचालयाचे पाणी विद्यार्थ्यांना पाजल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यासंदर्भात विधानसभेचे सदस्य आमदार डॉ. मिलिंद माने यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला आहे. यासंदर्भात शासनाच्या अवर सचिवांनी जिल्हा परिषदेला या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती मागितली आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने २३ व २४ फेब्रुवारीला जिल्हा क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यास्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना शौचालयाचे पाणी प्यायला दिल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. प्रसार माध्यमांनी हे प्रकरण चांगलेच लावून धरल्याने जि.प.च्या सीईओंनी यासंदर्भात उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर यांच्या अध्यक्षतेत समिती गठित केली होती. समितीने आपला अहवाल सीईओंकडे दिला आहे. या स्पर्धेच्या आयोजनात अनेक त्रुटी आढळल्या आहेत.आमदार डॉ. माने यांनी हा प्रश्न विधानसभेत लावल्याने, या संपूर्ण प्रकरणाचा तपशील जिल्हा परिषदेला मागितला आहे. यासंदर्भातील पत्र जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहे. यासंदर्भात समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरही सीईओनी कुठलाही निर्णय न घेतल्याने जिल्हा परिषदेत उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. आता शासनाच्या पत्रानंतर सीईओंना या प्रकरणात योग्य निर्णय घेणे भाग पडणार आहे.विस्तार अधिकाऱ्याचा बळीजिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत शौचालयाचे पाणी पाजल्याप्रकरणात विस्तार अधिकारी सुरेश थोटे यांनाच टार्गेट करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या आयोजनात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या, कंत्राटदारांच्या त्रुटी आढळल्यानंतरही त्यांना बगल दिली जात आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनांनी यासंदर्भात फेरचौकशीची मागणी सीईओंकडे केली आहे.स्पर्धेचे नियंत्रण अधिकारी म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांनी विस्तार अधिकारी थोटेंची नियुक्ती केली होती. तसेच पंचायत समितीस्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांना थोटेंच्या सहकार्याकरिता समित्या नियुक्त करण्याचे पत्र दिले होते. या स्पर्धा परीक्षेच्या तोंडावर आल्याने सर्व विस्तार अधिकारी परीक्षेच्या कामात व्यस्त असल्याने समित्याच स्थापन करण्यात आल्या नाही. त्यामुळे संपूर्ण आयोजनाची जबाबदारी थोटेंवर आली. त्यामुळे आयोजनाच्या सर्वच प्रक्रियेत ते वैयक्तिक लक्ष घालू शकले नाही. परिणामी कंत्राटदारानेही मनमानी कारभार केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार आल्यानंतरही त्यांनी अपेक्षित यंत्रणा कार्यक्रमास्थळी उभी केली नाही. विशेष म्हणजे ज्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ही तक्रार केली, त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांची स्पर्धेच्या उपस्थिती रजिस्टरवर स्वाक्षरी नव्हती. त्यामुळे संघटनेने थोटेंवर कारवाई करताना या सर्व गोष्टी लक्षात घेण्याची विनंती सीईओंना केली आहे. स्पर्धेच्या जेवणाचे कंत्राट दिलेला चव्हाण नावाच्या कंत्राटदाराची जि.प. पदाधिकारी, सदस्यांशी जवळीक असल्यामुळे कंत्राटदाराकडून झालेल्या चुका दाबल्या जात असल्याचीही चर्चा आहे.

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाMumbaiमुंबई