शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सर्दी-खोकल्याने नागपूरकर बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 19:45 IST

Cold-cough , nagpur newsउपराजधानीत मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणासोबतच गारठा वाढला आहे. बदलत्या वातावरणामुळे आजाराचा धोकाही वाढला आहे. सर्दी, खोकला, ताप, अतिसार व दम्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: लहान मुले व वयोवृद्धाचे आरोग्य जपण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

ठळक मुद्देढगाळ वातावरणाचा फटका : दुर्लक्ष नको, डॉक्टरांचा सल्ला

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : उपराजधानीत मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणासोबतच गारठा वाढला आहे. बदलत्या वातावरणामुळे आजाराचा धोकाही वाढला आहे. सर्दी, खोकला, ताप, अतिसार व दम्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: लहान मुले व वयोवृद्धाचे आरोग्य जपण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

सर्दी, खोकला, तापाची कणकण, घसा खवखवणे हा ‘सिझनल अ‍ॅलर्जी’ आजार आहे. यात नाक, फुप्फुस, घसा आणि कान यांचा परस्परसंबंध असतो. यामुळे सर्दी-खोकला ही एखाद्या भयंकर आजाराची चाहूल असू शकते. यामुळे वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचे मेडिकलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले. जेव्हा ऋतू बदलतो त्यावेळी खोकला येणे, नाकातून पाणी यणे, सर्दी होणे, नाक लाल होणे, डोके दुखणे, अंग दुखणे आदी त्रास डोके वर काढतात. लहान मुले, वृद्ध व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती फारशी चांगली नसल्याने त्यांना याचा सर्वात जास्त त्रास होतो. ब्राँकायिटससारखे फुप्फुस आणि श्वसननलिकेचे आजरही जडतात. अशा वेळी बाहेरचे खाणे टाळावे. जास्तीत जास्त गरम पाणी प्यावे. कुठलाही पदार्थ खाताना हात स्वच्छ धुऊन खावेत. खोकताना, शिंकताना नाका-तोंडावर हात ठेवावा. व्यायाम करावा. लहान बाळांना गरम कपड्यात ठेवावे, असेही ते म्हणाले.

खबरदारी न घेतल्यास कोरोना वाढणार

फिजिशियन डॉ. निर्मल जयस्वाल म्हणाले, बदललेल्या वातावरणामुळे सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण वाढले आहेत. अशीच लक्षणे कोरोनामध्येही दिसून येतात. सध्याचे वातावरण कोरोना विषाणूसाठी पोषक आहे. यामुळे प्रत्येकाने मास्कचा वापर करणे, वारंवार हात धुणे व फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे. कुठलीही लक्षणे अंगावर काढू नका, असा सल्लाही डॉ. जयस्वाल यांनी दिला.

टॅग्स :weatherहवामानHealthआरोग्य