शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

सर्दी-खोकल्याने नागपूरकर बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:25 IST

नागपूर : उपराजधानीत मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणासोबतच गारठा वाढला आहे. बदलत्या वातावरणामुळे आजाराचा धोकाही वाढला आहे. सर्दी, ...

नागपूर : उपराजधानीत मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणासोबतच गारठा वाढला आहे. बदलत्या वातावरणामुळे आजाराचा धोकाही वाढला आहे. सर्दी, खोकला, ताप, अतिसार व दम्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: लहान मुले व वयोवृद्धाचे आरोग्य जपण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

सर्दी, खोकला, तापाची कणकण, घसा खवखवणे हा ‘सिझनल अ‍ॅलर्जी’ आजार आहे. यात नाक, फुप्फुस, घसा आणि कान यांचा परस्परसंबंध असतो. यामुळे सर्दी-खोकला ही एखाद्या भयंकर आजाराची चाहूल असू शकते. यामुळे वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचे मेडिकलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले. जेव्हा ऋतू बदलतो त्यावेळी खोकला येणे, नाकातून पाणी यणे, सर्दी होणे, नाक लाल होणे, डोके दुखणे, अंग दुखणे आदी त्रास डोके वर काढतात. लहान मुले, वृद्ध व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती फारशी चांगली नसल्याने त्यांना याचा सर्वात जास्त त्रास होतो. ब्राँकायिटससारखे फुप्फुस आणि श्वसननलिकेचे आजरही जडतात. अशा वेळी बाहेरचे खाणे टाळावे. जास्तीत जास्त गरम पाणी प्यावे. कुठलाही पदार्थ खाताना हात स्वच्छ धुऊन खावेत. खोकताना, शिंकताना नाका-तोंडावर हात ठेवावा. व्यायाम करावा. लहान बाळांना गरम कपड्यात ठेवावे, असेही ते म्हणाले.

खबरदारी न घेतल्यास कोरोना वाढणार

फिजिशियन डॉ. निर्मल जयस्वाल म्हणाले, बदललेल्या वातावरणामुळे सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण वाढले आहेत. अशीच लक्षणे कोरोनामध्येही दिसून येतात. सध्याचे वातावरण कोरोना विषाणूसाठी पोषक आहे. यामुळे प्रत्येकाने मास्कचा वापर करणे, वारंवार हात धुणे व फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे. कुठलीही लक्षणे अंगावर काढू नका, असा सल्लाही डॉ. जयस्वाल यांनी दिला.