शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

नागपूर जि.प.ची आर्थिक कोंडी : तिजोरीत पैसाच नाही, तरीही केले पुनर्नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 00:08 IST

आभासी बजेट सादर करून, प्रत्यक्षात तिजोरीत पैसा नसतानाही, नसलेल्या पैशाचे पुनर्नियोजन केल्याचे वास्तव पुढे आले आहे. त्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेची आर्थिक कोंडी झाली आहे.

ठळक मुद्देलाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी पैसेच नाही

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आभासी बजेट सादर करून, प्रत्यक्षात तिजोरीत पैसा नसतानाही, नसलेल्या पैशाचे पुनर्नियोजन केल्याचे वास्तव पुढे आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची आर्थिक कोंडी झाली आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनेत लाभ मिळविलेल्या लाभार्थ्यांना पैसे द्यायला जि.प.कडे पैसे नसल्याचे दिसते आहे.२०१८-१९ या आर्थिक वर्षात वित्त सभापती उकेश चौहान यांनी ३७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्यावर्षी ३० ते ३२ कोटीच्या घरातच रक्कम तिजोरीत जमा झाली होती. बजेटनुसार पाच ते सात कोटींची प्रत्यक्ष तूट दिसून आली होती. असे असतानाही जवळपास सहा कोटीच्या रकमेचे पुनर्नियोजन करण्यात आले होते. म्हणजे तिजोरीत पैसे नसतानाही त्या निधीचे पुनर्नियोजन करण्यात आले. विशेष म्हणजे ही बाब अधिकाऱ्यांना माहीत असतानाही, त्यांनीही त्यात दुरुस्ती केली नाही. सत्ताधाऱ्यांकडूनही त्यावर पांघरूण घालण्यात आले. त्यामुळे आज जिल्हा परिषदेला आर्थिक कोंडीचा सामना करावा लागतो आहे.मागील वर्षीच्या योजना व त्यांच्या लाभार्थ्यांना यावर्षी कायम करण्यात आले. लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घेत डीबीटीची रक्कम मिळण्यासाठी अर्ज प्रशासनाकडे केले. पण जिल्हा परिषदेच्या तिजोरीत पैसाच नसल्याने लाभार्थ्यांना निधीच देऊ शकले नाही. निधी कागदावरच अखर्चितयावर्षी वित्त सभापतींनी ३७ कोटीच्या बजेटमध्ये उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ हा केवळ कागदावरच साधला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अर्थसंकल्पाला अधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला होता. जिल्हा परिषदेचे उत्पन्न पाहता हा अर्थसंकल्प अवाजवी असल्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र वित्त सभापतींनी मागील वर्षीचा अर्थसंकल्पाचा आकडा कायम ठेवला. इतकेच नव्हे तर कागदोपत्री अखर्चित असलेल्या निधीचेही पुनर्नियोजन केले. विशेष म्हणजे बजेट हा अवाजवी असल्याने जि.प. प्रशासनाने विभागीय आयुक्त किंवा शासनाकडे याची माहिती देणे आवश्यक होते. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरfundsनिधी