शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
4
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
5
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
6
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
7
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
8
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
9
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
10
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
11
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
12
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
13
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
14
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
15
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
16
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
17
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
18
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
19
Sonam Raghuvanshi : धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
20
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच

नागपूर जि. प. निवडणूक : सभापतीसाठी डावलल्यामुळे काँग्रेसमध्ये धुसफूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 22:42 IST

सभापतिपदाच्या शर्यतीत असलेल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ सदस्यांना ऐनवेळी डावलल्याने काँग्रेसमध्ये आता नाराजीचा सूर उमटला आहे.

ठळक मुद्देज्येष्ठ सदस्या शांता कुमरे व नाना कंभाले यांनी व्यक्त केली जाहीर नाराजीमंत्री सुनील केदार यांच्यावर व्यक्त केला संताप

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सभापतिपदाच्या शर्यतीत असलेल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ सदस्यांना ऐनवेळी डावलल्याने काँग्रेसमध्ये आता नाराजीचा सूर उमटला आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ सदस्य शांता कुमरे यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी अनुसूचित जमातीवर अन्याय केल्याचा आरोप केला आहे तर नाना कंभाले यांनी मंत्री सुनील केदार यांच्यावर थेट तोफ डागत, केदारांनी गटातटाचे राजकारण केल्याचा आरोप केला आहे.शांता कुमरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, सभापती निवडीमध्ये कॉंग्रेस पक्षाने अनुसूचित जमाती प्रवर्गातील एकाही सदस्याला सभापती बनविले नाही. उलट अध्यक्षांसह दोन सभापतिपदी पदावर अनुसूचित जाती प्रवर्गातील सदस्यांना संधी दिली. काँग्रेसच्या नेत्यांनी ही खेळी खेळत अनुसूचित जमाती प्रवर्गावर एकप्रकारे अन्यायच केल्याचा आरोप त्यांनी केला. शांता कुमरे ह्या रामटेक तालुक्यातील वडंबा सर्कलमधून निवडून आल्या आहे. जिल्हा परिषदेत आठ सर्कल हे अनुसूचित जमाती प्रवगार्साठी राखीव होते. त्यापैकी सात ठिकाणी कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झालेत. शांता कुमरे या अनुसूचित जमाती प्रवर्गात मोडतात. यंदाच्या निवडणुकीमध्ये त्या खुल्या वर्गातून निवडून आल्या आहे. अध्यक्ष पद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे दोन सभापती देण्याची आवश्यकता नव्हती. मलाच नाही तर सातपैकी कुणा एका सदस्याला सभापतिपद द्यायला हवे होते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.नाना कंभालेची केदारांवर नाराजीकेदारांनी जिल्हा परिषदेत हस्तक्षेप करून गटातटाचे राजकारण केले असल्याचा आरोप जि.प.चे ज्येष्ठ सदस्य नाना कंभाले यांनी केला. मुकुल वासनिक गटाचा असल्यामुळेच ज्येष्ठ सदस्य असतानाही मला डावलण्यात आल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला. सुनील केदार हे स्वत:चे वर्चस्व दाखवून पार्टीमध्ये फूट पाडत असल्याचे ते म्हणाले. बाहेरून आलेल्यांना सभापतिपद देऊन निष्ठावंत काँग्रेसींना डावलल्याचे कंभाले म्हणाले. स्वत:बद्दल बोलताना कंभाले म्हणाले की, मला तिकीट कापण्यापासून, पाडण्यापर्यंत षड्यंत्र केदारांनी केल्याचाही आरोप केला. आपल्याच कार्यकर्त्यांना पदावर बसवून इतर नेत्यांचे अस्तित्व संपविण्याचा डाव केदार यांचा आहे. एका सदस्याला दोन पद देण्यावरही कंभाले यांनी आक्षेप घेतला. पत्रकारांशी बोलताना कंभाले यांनी आपली खदखद व्यक्त केली.भाजपने दिले, काँग्रेसला काय अडचण होतीएकाच विधानसभा क्षेत्रामध्ये दोन जणांना पदाधिकारी म्हणून संधी न देण्याची काँग्रेसची भूमिका होती, असे सांगण्यात येत आहे. यावर शांता कुमरे यांनी आक्षेप घेत, भाजपने २०१२ ला एकाच विधानसभेत दोन सभापती दिले. मग काँग्रेसला काय हरकत होती, असा आक्षेप घेतला. २०१२ मध्ये जि.प.वर भाजपची सत्ता आल्यानंतर पहिल्या टर्ममध्ये रामटेक विधानसभा क्षेत्रातून दुर्गावती सरीयाम व वर्षा धोेपटे या सभापती झाल्या. त्यानंतरच्या अडीच वर्षात याच क्षेत्रातुनच शरद डोणेकर व आशा गायकवाड हे पदाधिकारी झाले. त्यामुळे अध्यक्ष पद जरी रामटेक विधानसभेतून दिले असले तरी, एक सभापतिपदही येथून देणे सहज शक्य असल्याचे त्या म्हणाल्या.

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषदnagpurनागपूरcongressकाँग्रेस