शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कृषी विभागाच्या सर्वेक्षणावर नागपूर जिल्हा परिषदेचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 15:22 IST

कापसाच्या पिकावर बोंडअळीचा झालेल्या प्रकोपामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ५० टक्के नुकसान झाले आहे. असे असताना कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ५ तालुक्यात कुठलेही नुकसान झाले नसल्याचा अहवाल दिला आहे. जि.प.च्या स्थायी समितीच्या बैठकीत कृषी विभागाकडून हा अहवाल ठेवण्यात आल्यावर स्थायी समितीनेच त्यावर आक्षेप घेतला. कृषी विभागाने केलेले सर्वेक्षण चुकीचे असल्याने फेरसर्वेक्षणाची मागणी जिल्हा परिषदेने केली.

ठळक मुद्देपाच तालुक्यात बोंडअळीचा हल्लाच नाही : फेरसर्वेक्षणाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कापसाच्या पिकावर बोंडअळीचा झालेल्या प्रकोपामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ५० टक्के नुकसान झाले आहे. असे असताना कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ५ तालुक्यात कुठलेही नुकसान झाले नसल्याचा अहवाल दिला आहे. जि.प.च्या स्थायी समितीच्या बैठकीत कृषी विभागाकडून हा अहवाल ठेवण्यात आल्यावर स्थायी समितीनेच त्यावर आक्षेप घेतला. कृषी विभागाने केलेले सर्वेक्षण चुकीचे असल्याने फेरसर्वेक्षणाची मागणी जिल्हा परिषदेने केली.बीटी कापसावर यंदा बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले तर कापसावर फवारणीमुळे शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाला. अनेक जण आजारी पडले. हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा गाजला. बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शासनाने मदत जाहीर करून सर्वेक्षणाचे आदेश दिले. कृषी विभागाकडून याचे सर्वेक्षण करण्यात आले. अधिकाऱ्यांनी सर्वेक्षणच चुकीच्या पद्धतीने केल्याचे दिसत आहे. सर्वेक्षणानुसार नागपूर जिल्ह्यात पाच तालुक्यात बोंडअळीमुळे एकही हेक्टरमध्ये पिकाचे नुकसान झाले नाही. यात मौदा, काटोल,नरखेड, रामटेक आणि कळमेशवर तालुक्याचा समावेश आहे. नऊ तालुक्यात ६९१९३.२३ हेक्टरमध्ये ३३ टक्केपेक्षा जास्त कापसाचे नुकसान झाले असून, यासाठी ६८ कोटी ५७ लाख ६९ हजार ७५७ रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शून्य नुकसान दाखविण्यात आलेल्या तालुक्यात कापसाची पेरणी झाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.जिल्हा परिषदच्या स्थायी समितीत बोंडअळीच्या नुकसानीचा अहवाला मुद्दा गाजला. अध्यक्षा निशा सावरकरसह विरोधी पक्ष नेते मनोहर कुंभारे आणि सर्व सदस्यांनी अहवालावर आक्षेप नोंदविला असून फेरतपासणी करण्याचा प्रस्ताव ठराव पारित करण्यात आला. हा प्रस्ताव शासनास पाठविण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्षा निशा सावरकर यांनी दिली. कुठल्याही सदस्यांना डावलले नाहीजिल्ह्यातील १३२ गावांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी खनिज प्रतिष्ठानातून १४ कोटी रुपयांना मंजुरी मिळाली. यात हिंगणा तालुक्यातील डेगमा खुर्द या गावाचा प्रस्ताव असूनही गावाला हेतूपुरस्सर डावलल्याचा आरोप सदस्य उज्ज्वला बोढारे यांनी केला. यासंदर्भात अध्यक्ष म्हणाले की, कुणीही सदस्यांचे गाव हेतूपुरस्सर वगळले नाही. ९ पीएच योजनेत जी गावे होती, ती तशी घेण्यात आली. हिंगणा तालुक्यातील ११ गावांचा यात समावेश करण्यात आला आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnagpurनागपूर