शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

नागपूर जिल्हा परिषद शाळा : सायकलचा कोट्यवधीचा निधी अखर्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 23:19 IST

शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या वर्ग ५ ते १२ च्या विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात येते. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून त्यासाठी तरतूद करण्यात येते. परंतु गेल्या तीन वर्षापासून डीबीटीमुळे सायकलसाठी तरतूद करण्यात आलेला कोट्यवधीचा निधी अखर्चित राहतो आहे.

ठळक मुद्देडीबीटीचा फटका : नव्या आर्थिक वर्षात एकही सायकल वाटली नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या वर्ग ५ ते १२ च्या विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात येते. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून त्यासाठी तरतूद करण्यात येते. परंतु गेल्या तीन वर्षापासून डीबीटीमुळे सायकलसाठी तरतूद करण्यात आलेला कोट्यवधीचा निधी अखर्चित राहतो आहे. लाभार्थी म्हणून निवड झाल्यानंतरही हजारो विद्यार्थी सायकलच्या लाभापासून वंचित राहत आहेत.शासनाने जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून राबविण्यात येणाऱ्या योजनांवर डीबीटी लावली. त्यामुळे अखर्चित निधी वाढला गेला. जिल्हा परिषदेचा तीन वर्षापासून सायकलचा निधी अखर्चित राहतो आहे. २०१७-१८ मध्ये १ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सायकलसाठी केली होती. यातून ६० लाख रुपयांचा निधी अखर्चित राहिला. २०१८-१९ मध्ये ५४ लाखाची तरतूद केली. यातून ४४ लाख रुपये अखर्चित राहिले. २०१९-२० मध्ये सायकलसाठी ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. परंतु आर्थिक वर्ष संपायला दोन महिने शिल्लक असताना एकाही सायकलचे वाटप झालेले नाही. त्यामुळे सलग तीन वर्षापासून सायकलसाठी तरतूद करण्यात येत असलेला मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित राहत आहे.वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये डीबीटी लावल्याने निवड झालेल्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या नावाने बँकेत खाते उघडावे लागते. सायकलची खरेदी करून खरेदीची पावती पं.स. मध्ये जमा करावी लागते. त्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांच्या खात्यात सायकलचा निधी जमा होतो. या भानगडीत विद्यार्थी व त्यांचे पालक पडत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी लाभापासून वंचित राहतात.२०१८-१९ मध्ये सायकलची अवस्थाजिल्ह्यात २०१८-१९ मध्ये १६९० विद्यार्थ्यांनी निवड झाली होती. त्यासाठी ५३ लाख ५० हजार रुपयांची तरतूद केली होती. यातून २७० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. त्यावर ११ लाख ०७ हजार रुपये खर्च झाले. उर्वरीत १४२० विद्यार्थ्यांचा ४२ लाख ४३ हजार रुपये निधी अखर्चित राहिला.२०१९-२० गेले आचारसंहितेतया आर्थिक वर्षात सायकलसाठी ५० लाख रुपयांची तरतूद केली होती. पण मे महिन्यामध्ये लागलेली लोकसभेची आचारसंहिता, त्यानंतर जिल्हा परिषद बरखास्त झाली. त्यानंतर विधानसभेची आचारसंहिता लागली. त्यानंतर परत जिल्हा परिषदेची निवडणूक आचारसंहिता लागली. हे अख्खे वर्ष आचारसंहितेत गेले. आता शिल्लक २ महिने बाकी आहे. लाभार्थ्यांचे अर्ज आले आहेत, मात्र समिती अजूनही गठित झाली नाही. त्यामुळे यंदाही निधी अखर्चित राहणार आहे.भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना जिल्हा परिषदेच्या योजनांवर डीबीटी लावली. डीबीटीची प्रक्रिया अतिशय किचकट असल्याने गरीब विद्यार्थी योजनेचा लाभ घेऊ शकले नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित राहतो आहे. आम्ही शासनाला या निर्णयात सुधारणा करण्याची विनंती करणार आहोत.मनोहर कुंभारे, उपाध्यक्ष, जि.प.

 

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरStudentविद्यार्थी