शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

नागपूर जिल्हा परिषद शाळा : सायकलचा कोट्यवधीचा निधी अखर्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 23:19 IST

शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या वर्ग ५ ते १२ च्या विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात येते. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून त्यासाठी तरतूद करण्यात येते. परंतु गेल्या तीन वर्षापासून डीबीटीमुळे सायकलसाठी तरतूद करण्यात आलेला कोट्यवधीचा निधी अखर्चित राहतो आहे.

ठळक मुद्देडीबीटीचा फटका : नव्या आर्थिक वर्षात एकही सायकल वाटली नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या वर्ग ५ ते १२ च्या विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात येते. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून त्यासाठी तरतूद करण्यात येते. परंतु गेल्या तीन वर्षापासून डीबीटीमुळे सायकलसाठी तरतूद करण्यात आलेला कोट्यवधीचा निधी अखर्चित राहतो आहे. लाभार्थी म्हणून निवड झाल्यानंतरही हजारो विद्यार्थी सायकलच्या लाभापासून वंचित राहत आहेत.शासनाने जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून राबविण्यात येणाऱ्या योजनांवर डीबीटी लावली. त्यामुळे अखर्चित निधी वाढला गेला. जिल्हा परिषदेचा तीन वर्षापासून सायकलचा निधी अखर्चित राहतो आहे. २०१७-१८ मध्ये १ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सायकलसाठी केली होती. यातून ६० लाख रुपयांचा निधी अखर्चित राहिला. २०१८-१९ मध्ये ५४ लाखाची तरतूद केली. यातून ४४ लाख रुपये अखर्चित राहिले. २०१९-२० मध्ये सायकलसाठी ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. परंतु आर्थिक वर्ष संपायला दोन महिने शिल्लक असताना एकाही सायकलचे वाटप झालेले नाही. त्यामुळे सलग तीन वर्षापासून सायकलसाठी तरतूद करण्यात येत असलेला मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित राहत आहे.वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये डीबीटी लावल्याने निवड झालेल्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या नावाने बँकेत खाते उघडावे लागते. सायकलची खरेदी करून खरेदीची पावती पं.स. मध्ये जमा करावी लागते. त्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांच्या खात्यात सायकलचा निधी जमा होतो. या भानगडीत विद्यार्थी व त्यांचे पालक पडत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी लाभापासून वंचित राहतात.२०१८-१९ मध्ये सायकलची अवस्थाजिल्ह्यात २०१८-१९ मध्ये १६९० विद्यार्थ्यांनी निवड झाली होती. त्यासाठी ५३ लाख ५० हजार रुपयांची तरतूद केली होती. यातून २७० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. त्यावर ११ लाख ०७ हजार रुपये खर्च झाले. उर्वरीत १४२० विद्यार्थ्यांचा ४२ लाख ४३ हजार रुपये निधी अखर्चित राहिला.२०१९-२० गेले आचारसंहितेतया आर्थिक वर्षात सायकलसाठी ५० लाख रुपयांची तरतूद केली होती. पण मे महिन्यामध्ये लागलेली लोकसभेची आचारसंहिता, त्यानंतर जिल्हा परिषद बरखास्त झाली. त्यानंतर विधानसभेची आचारसंहिता लागली. त्यानंतर परत जिल्हा परिषदेची निवडणूक आचारसंहिता लागली. हे अख्खे वर्ष आचारसंहितेत गेले. आता शिल्लक २ महिने बाकी आहे. लाभार्थ्यांचे अर्ज आले आहेत, मात्र समिती अजूनही गठित झाली नाही. त्यामुळे यंदाही निधी अखर्चित राहणार आहे.भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना जिल्हा परिषदेच्या योजनांवर डीबीटी लावली. डीबीटीची प्रक्रिया अतिशय किचकट असल्याने गरीब विद्यार्थी योजनेचा लाभ घेऊ शकले नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित राहतो आहे. आम्ही शासनाला या निर्णयात सुधारणा करण्याची विनंती करणार आहोत.मनोहर कुंभारे, उपाध्यक्ष, जि.प.

 

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरStudentविद्यार्थी