शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
3
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
4
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
5
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
6
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
7
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
8
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
9
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
10
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
11
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
13
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
14
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
15
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
17
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
18
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
19
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
20
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात

नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका न्यायालयीन पेचात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 6:36 PM

५ आॅक्टोबर २०१६ ला निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार काढण्यात आलेल्या आरक्षणाच्या सोडतीवर माजी जि.प. सदस्य बाबा आष्टणकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही.

ठळक मुद्देसर्कल पुनर्रचना व आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर : न्यायालयात आव्हान देण्याचा आष्टणकर यांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्कल रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केल्यामुळे, जिल्हा परिषदेच्या वर्षभरापासून खोळंबलेल्या निवडणुका लवकरच जाहीर होतील, असे संकेत मिळत आहेत. असे असले तरी, निवडणुकीच्या कार्यक्रमाला पुन्हा न्यायालयात चॅलेंज देण्यात येऊ शकते, याचीही शक्यता नाकारता येत नाही. कारण ५ आॅक्टोबर २०१६ ला निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार काढण्यात आलेल्या आरक्षणाच्या सोडतीवर माजी जि.प. सदस्य बाबा आष्टणकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही.जिल्हा परिषदेची निवडणूक सुरुवातीपासूनच न्यायालयीन पेचात सापडली आहे. सत्ताधाऱ्यांची मुदत २० मार्च २०१७ रोजी संपली. त्यामुळे निवडणूक तेव्हाच होणार, अशी शक्यता होती. त्यासाठी आरक्षण सोडतही काढण्यात आली होती. त्यानंतर पारशिवनी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीत आणि वानाडोंगरीचे रूपांतर नगर परिषदेत झाले. राज्य सरकारने २५ आॅक्टोबर २०१६ रोजी पारशिवनी नगरपंचायत करण्यासाठी अधिसूचना काढली. अधिसूचनेला पारशिवनी येथील प्रकाश डोमकी यांनी हायकोर्टात आव्हान दिले. त्यांची याचिका हायकोर्टाने नाकारली. दरम्यान, वानाडोंगरी नगर परिषद घोषित केल्यामुळे वानाडोंगरी भागातून जि. प. आणि पंचायत समितीच्या निवडणुका रद्द कराव्यात तसेच पारशिवनी नगरपंचायतीची निवडणूक घेण्यात यावी, अशा वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. वानाडोंगरी नगर परिषद आणि पारशिवनी नगरपंचायत वगळता जिल्हा परिषदेची निवडणूक घ्यावी, असे आदेश नागपूर खंडपीठाने निवडणूक आयोगाला दिले होते. ही याचिका निकाली निघाली. परंतु आॅक्टोबर २०१६ मध्ये झालेल्या सर्कल आरक्षणाच्या सोडतीत जि.प.चे आरक्षण ५७ टक्क्यावर गेले असल्याबाबत जि.प.चे माजी सदस्य बाबा आष्टणकर यांनी आक्षेप घेतला होता. याबाबत त्यांनी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. ती अद्यापही प्रलंबित आहे.यासंदर्भात बाबा आष्टणकर यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, न्यायालयाने स्पष्ट केले होते, ही याचिका निकाली लागेस्तोवर निवडणुका घेण्यात येऊ नये. तरीसुद्धा निवडणूक आयोगाने सर्कल पुनर्रचना व आरक्षण सोडतीसंदर्भात कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमाच्या विरोधात पुन्हा न्यायालयात जाणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदElectionनिवडणूक