शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कालव्यात आंघाेळ करणे जीवावर बेतले; नागपूरच्या तरुणाचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2022 18:44 IST

संग्रामपूर (नवरगाव) शिवारातील घटना

रामटेक (नागपूर) : मित्रांसाेबत नातेवाईकाकडे पाहुणा म्हणून आलेला नागपूर शहरातील तरुण आंघाेळ करण्यासाठी कालव्यात उतरला आणि प्रवाहात आल्याने वाहात गेला. त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील संग्रामपूर (नवरगाव) शिवारात बुधवारी (दि. १९) सायंकाळी ४ च्या सुमारास घडली.

आशिष सुनील मोरे (२२, रा. गुरुदत्त कॉलनी, दाभा, नागपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. आशिष त्याच्या तीन मित्रांसाेबत संग्रामपूर (नवरगाव, ता. रामटेक) येथील नितीन माणिकराव हांडे यांच्याकडे पाहुणा म्हणून आला होता. ताे सायंकाळी मित्रांसाेबत गावालगतच्या पेंच जलाशयाच्या मुख्य कालव्याच्या परिसरात फिरायला गेला. कालव्यात पाणी असल्याने त्याला आंघाेळ करण्याचा माेह आवरला नाही. कालव्यात उतरताच पाय घसरला आणि ताे पाण्यात पडून प्रवाहात आल्याने वाहात गेला.

मित्रांनी या प्रकाराची माहिती आशिषच्या नातेवाईकांसह नागरिकांना दिली. शिवाय, पाेलिसांनाही कळवण्यात आले. त्या सर्वांनी लगेच त्याचा शाेध घ्यायला सुरुवात केली. रात्री अंधार झाल्याने थांबविण्यात आलेले शाेधकार्य गुरुवारी (दि. २०) सकाळी पुन्हा सुरू करण्यात आले. त्यात घटनास्थळापासून पाच किमीवर असलेल्या हाताेडी (ता. रामटेक) शिवारातील कालव्यात त्याचा मृतदेह आढळून आला. पाेलिसांनी मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणला. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली असून, सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार पांडे तपास करीत आहेत.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेDeathमृत्यूnagpurनागपूरramtek-acरामटेक