शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Nagpur Voilence: समाजकंटक स्थानिकच, बाहेरून आलेले नव्हे; नागपूर पोलीस आयुक्तांचा दावा

By योगेश पांडे | Updated: March 18, 2025 21:45 IST

पोलिसांकडून या संपूर्ण प्रकारात सहभागी असलेल्यांवर कारवाई सुरूच राहणार आहे. ज्यांची ओळख पटते आहे त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे.

योगेश पांडे 

नागपूर : सोमवारी रात्री महाल व हंसापुरीमध्ये झालेल्या जाळपोळीच्या घटना व दंग्यांमध्ये बाहेरील तत्व सहभागी असल्याच्या चर्चांनी जोर पकडला होता. मात्र पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांनी याचे खंडन केले आहे. एकूण घटनांचा क्रम लक्षात घेतला तर कायदा व सुव्यवस्था बिघविण्याचा प्रयत्न करणारे समाजकंटक स्थानिकच असल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पोलीस आयुक्तांनी सोशल माध्यमांच्या गैरवापरावर चिंता व्यक्त केली. सोशल माध्यमांतून अनेकांनी आक्षेपार्ह व भडकावू पद्धतीचे व्हिडीओ तसेच रील्स फॉरवर्ड-शेअर केले. त्यामुळे अनेकांच्या भावना भडकल्या. ज्या पद्धतीने घटना झाल्या, त्यावरून कुणी बाहेरून आल्याचे दिसून येत नाही. अद्यापपर्यंत तसे पुरावे दिसून आले नाही. दोन्ही गटातील लोक स्थानिकच होते असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.

पोलिसांकडून या संपूर्ण प्रकारात सहभागी असलेल्यांवर कारवाई सुरूच राहणार आहे. ज्यांची ओळख पटते आहे त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे. समाजकंटकांनी बाहेरून दगड वगैरे आणले नव्हते. प्रत्यक्षात घटनास्थळाजवळच उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. तेथीलच दगड पोलिसांवर फेकण्यात आले असे त्यांनी सांगितले.

सकाळी शिवाजी पुतळा चौकात औरंगजेबाची कबर हटविण्यावरून आंदोलन झाले होते. त्यावरून एका गटाच्या लोकांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली होती व माझीदेखील भेट घेतली होती. कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर त्यांचे समाधान झाले होते. सायंकाळची पूर्ण घटना वेगळी होती. सकाळच्या आंदोलनाशी त्याची कुठलीही लिंक वाटत नाही. संबंधित भागात विविध जातीधर्मांचे लोक राहतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सायंकाळी दोन गटातील तरुण आमनेसामने आले व त्यातून तणावाला सुरुवात झाली. सोशल माध्यमांमुळे त्यात तेल ओतल्या गेले, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूर