शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

नागपूर विद्यापीठाच्या निकालांचा वेग वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 2:02 PM

काही वर्षांअगोदर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ लेटलतिफ निकालांसाठी प्रसिद्ध होते. मात्र विद्यापीठाने तंत्रज्ञानाचा उपयोग सुरू केल्यानंतर मागील तीन वर्षांत नागपूर विद्यापीठाच्या ‘निकाल एक्सप्रेस’ने चांगलाच वेग घेतला आहे.

ठळक मुद्देसरासरी १९ दिवसांच्या अगोदर लागताहेत निकालतीन वर्षांत स्थितीत आमूलाग्र बदल

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काही वर्षांअगोदर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ लेटलतिफ निकालांसाठी प्रसिद्ध होते. मात्र विद्यापीठाने तंत्रज्ञानाचा उपयोग सुरू केल्यानंतर मागील तीन वर्षांत नागपूर विद्यापीठाच्या ‘निकाल एक्सप्रेस’ने चांगलाच वेग घेतला आहे. २०१५ च्या तुलनेत आता सरासरी १९ दिवसांच्या अगोदर निकाल जाहीर होत आहेत. २०२४ पर्यंत परीक्षा झाल्यानंतर ३१ दिवसांतच निकाल लावण्याचे ‘टार्गेट’ विद्यापीठाने समोर ठेवले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.एकेकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संथ निकालांमुळे विद्यार्थ्यांचे मोर्चांवर मोर्चे यायचे. नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल साधारणत: आॅगस्ट, सप्टेंबरपर्यंत लागायचे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागायचा. २०१४ साली तर ४६ टक्के निकाल ४५ दिवस उलटून गेल्यानंतर लागले होते. २०१५ साली गैरव्यावसायिक अभ्यासक्रमांचे निकाल हे सरासरी ५०.८८ दिवस तर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे निकाल ५०.४३ दिवसांनी जाहीर झाले होते. मात्र त्यानंतर परीक्षा विभागाने कात टाकण्यास सुरुवात केली. विद्यापीठातील बहुसंख्य परीक्षांचे मूल्यांकन ’आॅनलाईन’ करण्यात आले. शिवाय परीक्षा प्रणालीत अनेक सुधारणा करुन निकालांचा वेग कसा वाढविता येईल, याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर सातत्याने प्रत्येक वर्षी निकालांचा वेग वाढत गेला. २०१४ मध्ये अवघ्या २६ टक्के परीक्षांचे निकाल ३० दिवसांच्या आत जाहीर झाले होते. २०१५ मध्ये हाच आकडा ३४.५३ टक्के इतका होता. २०१६ मध्ये निकालांचा वेग वाढला व ५०.८३ टक्के परीक्षांचे निकाल ३० दिवसांच्या आत जाहीर करण्यात विद्यापीठाला यश आले. २०१७ मध्ये ७०.३२ टक्के निकाल ३० दिवसांच्या आत जाहीर झाले. २०१८ च्या उन्हाळी परीक्षात तर गैरव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल सरासरी ३१.४३ दिवस तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे निकाल सरासरी ३१.२२ दिवसात जाहीर झाले.

२०१४ पर्यंत ३१ दिवसांचे ‘टार्गेट’४नागपूर विद्यापीठाच्या निकालांच्या ‘पॅटर्न’चा राज्यातील व राज्याबाहेरील विद्यापीठांनीदेखील अभ्यास केला. निकालांचा हा वेग कायम राहावाल यासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. विद्यापीठाच्या बृहत् आराखड्यात यासंदर्भात ‘टार्गेट’देखील ठरविण्यात आले आहेत. सर्व परीक्षांचे निकाल सरासरी ३१ दिवसांत जाहीर झाले पाहिजे, यावर विद्यापीठाचा भर राहणार आहे.

निकालांचा वेग वाढण्याची कारणे

  • ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकन
  • मूल्यांकनासाठी प्राध्यापकांना येणे अनिवार्य
  • महाविद्यालयांसमवेत समन्वय
  • तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग करण्याचे धोरण
टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ