शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

नागपूर: पाणीटंचाई नसल्याचा मनपाचा दावा मात्र दररोज टँकरच्या २,४०० फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 11:44 AM

नागपूर शहराला मागणीच्या तुलनेत अतिरिक्त पाणीपुरवठा होत आहे. शहरात पाणीटंचाई नसल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे, परंतु प्रत्यक्षात शहराच्या विविध भागात पाण्यासाठी ओरड सुरु आहे.

ठळक मुद्दे३४२ टँकरद्वारे पाणीपुरवठातीन महिन्यात ६.१२ कोटींचा खर्च फेब्रुवारीच्या तुलनेत जानेवारीत अधिक खर्चाचे कोडे

गणेश हूड।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहराला मागणीच्या तुलनेत अतिरिक्त पाणीपुरवठा होत आहे. शहरात पाणीटंचाई नसल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे, परंतु प्रत्यक्षात शहराच्या विविध भागात पाण्यासाठी ओरड सुरु आहे. नळाचे नेटवर्क नसलेल्या शहरालगतच्या वस्त्यांत मागील अनेक वर्षांपासून पाणीटंचाई आहे. दरवर्षी टँकरची संख्या वाढतच आहे. ३४२ टँकरद्वारे दररोज १७६२ फेऱ्यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. एप्रिल महिन्यात पाण्याची मागणी वाढल्याने हा आकडा २,४०० पर्यंत पोहचला आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्याच्या कालावधीत ३४२ टँकरद्वारे १ लाख ५८ हजार ५९७ फेऱ्या मारण्यात आल्या. यावर ६ कोटी १२ लाख १८ हजार ४४२ रुपये खर्च करण्यात आला. एप्रिल महिन्यात ७२ हजार २,२७५ फेऱ्या होतील, असा अंदाज जलप्रदाय विभागातील अधिकाºयांनी व्यक्त केला. म्हणजेच महापालिकेला शहरालगतच्या पाणीपुरवठ्यावर दर महिन्याला दोन कोटीहून अधिक खर्च क रावा लागत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी टँकरवरील खर्चात वाढ झाली आहे. सर्वाधिक १०५ टँकर लकडगंज झोनमध्ये आहेत. या झोनमध्ये टँकरच्या दररोज ६०० फेऱ्या होतात. आसीनगर झोनमध्ये ८७ टँकर धावत आहेत. महापालिका क्षेत्रात समावेश करण्यात आलेल्या हुडकेश्वर-नरसाळा भागात ७६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. नेहरूनगर झोनमध्ये ३९ तर हनुमाननगर झोनमधील आऊ टर भागात १४ टँकर धावत आहते. प्रत्येक टँकरच्या सरासरी ५ ते ६ फेऱ्या होतात. मात्र मार्च ते जून या चार महिन्यांच्या कालावधीत टँकची सर्वाधिक संख्या असते. यामुळे फेऱ्या वाढतात.

नेटवर्कच्या भागात ६६ टँकरशहरातील नेटवर्क असूनही अनेकदा पाणीपुरवठा खंडित करावा लागतो. काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. अशा वस्त्यांतील लोकांना पाण्याची टंचाई भासू नये यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. उन्हाळ्याच्या दिवसात अशा तक्रारी वाढतात. सध्या यासाठी ६६ टँकर लावण्यात आले आहेत.थंडीच्या दिवसात अधिक टँकरफेब्रुवारीच्या तुलनेत जानेवारी महिना अधिक थंडीच्या असतो. या दिवसात पाण्याची मागणी कमी असते. असे असूनही फेब्रुवारी  महिन्याच्या तुलनेत जानेवारी महिन्यात टँकरची संख्या अधिक दर्शविण्यात आली आहे. जानेवारीत ५२ हजार ८४१ टँकर फेऱ्या असून फेब्रुवारी  महिन्यात मात्र ४५ हजार ४७८ फेऱ्या दर्शविण्यात आल्या आहेत. म्हणजेच जानेवारी महिन्यात टँकरच्या ७,३६१ फेऱ्या अधिक आहेत. थंडीच्या दिवसात टँकर क से वाढले, हा संशोधनाचाच विषय आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका