शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

Nagpur: शिंदे सरकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम नाही, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचे मत

By कमलेश वानखेडे | Updated: May 11, 2023 15:25 IST

Nagpur: राज्यातील सत्ता संघर्षावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. या निकालाने राज्य सरकारला धोका नाही, रकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम झालेला नाही, ही बाब स्पष्ट झाली असे मत ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.

- कमलेश वानखेडे 

नागपूर - राज्यातील सत्ता संघर्षावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. या निकालाने राज्य सरकारला धोका नाही, रकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम झालेला नाही, ही बाब स्पष्ट झाली असे मत ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.

अॅड. निकम म्हणाले, न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटना पिठाकडे पाठविले आहे. हा एकप्रकारे राज्य सरकारला मोठा दिलासा आहे. न्यायालयाने तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या कृतीवर गंभीर ताशेरे ओढले आहेत. राज्यपालांची कृती अयोग्य ठरविली आहे. एखाद्या पक्षातील दोन गट भांडत असेल तर चौकशी स्पीकरने घ्यायला पाहिजे मात्र, राज्यपालांना अधिकार नसताना देखील त्यांनी हस्तक्षेप केला, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्य मंत्रीपदाचा राजीनामा मी राज्यपालांच्या अयोग्य कृतीमुळे देत आहे तर त्यांच्या सरकारची त्यांच्यासह पुर्नस्थापना करता आली असता. मात्र, त्यांनी स्वईच्छेने राजीनामा दिला होता. त्यामुळे आता सरकारची पुनर्स्थापना होऊ शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले असल्याचे ॲड. निकम म्हणाले. १६ आमदारांच्या अपात्रतेवर अध्यक्षांनी कधी निर्णय घ्यावा हे स्पष्ट नसले तरी विशिष्ट मुदतीत अध्यक्षांनी हा निर्णय घेणे अपेक्षित आहे.

विद्यमान अध्यक्षांकडे हा अधिकार आहे हे जवळपास स्पष्ट झाले आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षUjjwal Nikamउज्ज्वल निकम