शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

गडद धुके बनले रेल्वेसाठी स्पीड ब्रेकर, गाड्या रेंगाळल्या; वेळापत्रक विस्कळीत, रेल्वे वाहतुकीला जबर फटका

By नरेश डोंगरे | Updated: January 15, 2024 23:28 IST

Indian Railway:

- नरेश डोंगरे नागपूर - उत्तर भारतात थंडीची जोरदार लाट आल्याने सर्वत्र गडद धुके निर्माण झाले आहे. त्यामुळे रेल्वे वाहतुक प्रभावित झाली आहे. उत्तर भारतातून नागपूरमार्गे धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या स्पीडला धुक्यामुळे ब्रेक लागला असून रेल्वे प्रशासनाचे वेळापत्रक पुरते विस्कळीत झाले आहे. यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप होत आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून उत्तर भारतात गारठा निर्माण झाला असून वातावरणाने गडद धुक्याची शाल पांघरली आहे. त्यामुळे सोमवारी अनेक रेल्वेगाड्या विलंबाने नागपुरात पोहोचल्या. उशिरा धावत असलेल्या गाड्या पुढीलप्रमाणे आहेत.

१२५११ राप्तीसागर एक्स्प्रेस १६ तास उशिरा, १२७२४ तेलंगणा एक्स्प्रेस १५ तास, १२६१६ जीटी एक्स्प्रेस १२ तास, २० मिनिट, १२६२६ केरला एक्स्प्रेस ११ तास, २०८०६ एपी एक्स्प्रेस, १२७२२ दक्षिण एक्स्प्रेस १० तास, १२७२३ तेलंगणा एक्स्प्रेस १० तास, २२५१२ कर्मभूमी एक्स्प्रेस ८.३० तास, २२४०४ पाँडेचरी सुपरफास्ट एक्स्प्रेस ८ तास, १२६२२ एक्स्प्रेस ७ तास, १२९५० सिकंदराबाद एक्स्प्रेस ६ तास, १८०३० शालिमार एलटीटी एक्स्प्रेस ४.३० तास, २२८४५ पुणे हटिया सुपर फास्ट एक्स्प्रेस ४.१० तास, १२८११ एलटीटी हावडा सुपर फास्ट एक्स्प्रेस ४ तास, १२८१० हावडा एलटीटी एक्स्प्रेस ४ तास, १२७२१ दक्षिण एक्स्प्रेस ३.२० तास, ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस ३ तास, १२१३० हावडा पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस २.५० तास, ०२१३९ मुंबई नागपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस २.४० तास, १२२९६ संघमित्रा एक्स्प्रेस २.४० तास, १८२३८ छत्तीसगड एक्स्प्रेस २.४५ तास, १२८६० गीतांजली एक्स्प्रेस २.१५ तास, १२९६८ सुपर फास्ट एक्स्प्रेस २ तास १० मिनटे उशिरा धावत आहे.

फलाट, प्रतीक्षालयात गर्दी वाढलीविविध गाड्या उशिरा धावत असल्याने या गाड्यांच्या प्रतीक्षेतील प्रवाशांची रेल्वे स्थानकावरच्या विविध फलाटांवर तसेच प्रतीक्षालयात गर्दी वाढली आहे. परिणामी खान-पानाच्या स्टॉलवरही झुंबड बघायला मिळत आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेnagpurनागपूर