शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

नागपूरचे तापमान ४२ अंशावर : उष्माघाताचे ४७ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 8:19 PM

शहराचे तापमान ४२ अंशावर गेले आहे. अंगाची लाहीलाही होत असताना उष्माघाताच्या रुग्णांतही वाढ झाली आहे. गेल्या वर्षी नागपुरात ३६४ रुग्णांची नोंद झाली होती. यावर्षी जानेवारी ते आतापर्यंत ४७ रुग्ण आढळून आले आहेत. मेयो, मेडिकलमध्ये मात्र, अद्यापही शीतकक्ष (कोल्ड वॉर्ड) सुरूच झाले नाही.

ठळक मुद्देगेल्या वर्षी ३६४ रुग्णांची नोंद : मेयो, मेडिकलचे शीतकक्ष अद्यापही बंदच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराचे तापमान ४२ अंशावर गेले आहे. अंगाची लाहीलाही होत असताना उष्माघाताच्या रुग्णांतही वाढ झाली आहे. गेल्या वर्षी नागपुरात ३६४ रुग्णांची नोंद झाली होती. यावर्षी जानेवारी ते आतापर्यंत ४७ रुग्ण आढळून आले आहेत. मेयो, मेडिकलमध्ये मात्र, अद्यापही शीतकक्ष (कोल्ड वॉर्ड) सुरूच झाले नाही.बदलत्या नैसर्गिक वातावरणाचा दुष्परिणाम शरीरावर होतो. यात सर्वात जास्त तापदायक ठरतो तो उन्हाळा. या ऋतूमध्ये विशेषत: उष्माघाताचे रुग्ण सर्वात जास्त दिसून येतात. यामुळे मेयो, मेडिकलमध्ये दहा-दहा खाटांचे ‘कोल्ड वॉर्ड’ (शीतकक्ष) सुरू करण्यात येतात. उष्माघाताची लक्षणे असलेले रुग्ण दिसून येत असलेतरी या दोन्ही रुग्णालयाचे ‘कोल्ड वॉर्ड’ आपल्या नेहमीच्या तारखेस म्हणजे १५ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. सध्या या वॉर्डातील कुलरच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. विशेष म्हणजे, हे दोन्ही रुग्णालय उष्माघाताचे रुग्णच दाखवत नाही. सूत्रानुसार, अशा रुग्णांच्या नोंदी ठेवणे आणि त्याची माहिती महापालिका, जिल्हा शल्यचिकित्सकापासून ते आरोग्य उपसंचालक आणि वैद्यकीय संचालकांना पाठवावी लागते. रुग्ण दगावल्यास शवविच्छेदन करावे लागते. ते टाळण्यासाठी मेयो, मेडिकल आणि खासगी इस्पितळांमध्ये उष्माघाताच्या रुग्णाला तापाचे रुग्ण म्हणून उपचार करतात.मुले व वृद्धांना सर्वाधिक धोकावैद्यकीय तज्ज्ञाानुसार, लहान मुले आणि वृद्धांना उष्माघाताचा धोका सर्वाधिक असतो. या शिवाय हायपरटेन्शन, मधुमेह, मूत्रपिंड, हृदय आणि यकृताच्या रुग्णांनाही हा आजार होऊ शकतो. शिवाय, मोठ्या प्रमाणात दारूचे सेवन करणाऱ्यांना व तापमानात जास्त कष्टाचे काम करणाऱ्यांनाही होऊ शकतो.उष्माघाताची लक्षणे१०४ डिग्री सेल्सिअसवर ताप जाणे, खूप डोके दुखणे, चिडचिडणे, रुग्णाला काही न समजणे, लघवीचा रंग गडद किंवा कमी असणे, श्वासोच्छवास जोरात चालणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत. अशा स्थितीत मेंदू, किडनी, हृदय, मांसपेशी आणि दुसरे अवयव किंवा पूर्ण शरीराची प्रक्रिया प्रभावित होऊ शकते.उष्माघात झाल्यावर हे करारुग्णाला थंड वातावरणात ठेवा. त्याचे कपडे सैल करा. थंड पाण्यात भिजवलेल्या कापडाने रुग्णाचे अंग पुसून त्याला थंड करा. रुग्णाला मीठ आणि साखरेचे भरपूर प्रमाण असलेले पेय द्या. तातडीने डॉक्टरांकडे घेऊन जा. लवकरात लवकर रुग्ण इस्पितळात पोहचल्यास त्याच्या वाचण्याची शक्यताही वाढते.

टॅग्स :Temperatureतापमानnagpurनागपूर