शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

Nagpur: नागपूरहून पुणे, हैदराबाद आणि भोपाळसाठी 'वंंदे भारत' सुरू होण्याचे संकेत, रेल्वे मंत्रालयाकडे मागणी

By नरेश डोंगरे | Updated: August 3, 2023 19:35 IST

Vande Bharat Express: प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता नागपूरहून पुणे, हैदराबाद आणि भोपाळसाठी वंदे भारत ट्रेन लवकरच सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. अमृत भारत योजनेच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने विभागीय रेल्वे व्यवस्थापक तुषारकांत पांडे यांनी आज पत्रकारांशी चर्चा केली.

- नरेश डोगरेनागपूर -  प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता नागपूरहून पुणे, हैदराबाद आणि भोपाळसाठी वंदे भारत ट्रेन लवकरच सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. अमृत भारत योजनेच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने विभागीय रेल्वे व्यवस्थापक तुषारकांत पांडे यांनी आज पत्रकारांशी चर्चा केली. त्यातून हे संकेत मिळाले.

देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूर शहरातील रेल्वेस्थानकावरून देशाच्या चारही दिशांमधील विविध प्रांतात रेल्वेगाड्या जातात आणि येतात. नागपूरहून बहुतांश मार्गावरच्या रेल्वेगाड्यात प्रवाशांची गर्दी असते. मात्र, सर्वाधिक गर्दी मुंबई, पुणे, हैदराबाद आणि भोपाळकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये असते. नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या बऱ्यापैकी आहे. मात्र, पुणे, हैदराबाद आणि भोपाळकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्या प्रवाशांच्या गर्दीच्या तुलनेत कमी आहे. त्याचमुळे नागपूरहून पुणे, हैदराबाद आणि भोपाळला मोठ्या प्रमाणात खासगी बसेस चालतात. हा अभ्यासवजा अहवाल रेल्वे अधिकाऱ्यांनी मंत्रालयाकडे पाठविला असून या तीन शहरासाठी नागपूरहून वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची मागणी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे.

देशभरातील विविध मार्गावर आणि खासकरून महाराष्ट्रासह, मध्य रेल्वेच्या विभागात वंदे भारतला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तो लक्षात घेता रेल्वे मंत्रालयही विविध रुटवर वंदे भारत ट्रेन चालविण्याच्या तयारीत आहे. त्याचमुळे नागपूरहू पुणे, हैदराबाद आणि भोपाळसाठी वंदे भारत ट्रेन लवकरच सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत.

मंत्रालयाच्या अखत्यारितील विषयवंदे भारत ट्रेन हा विषय पुर्णत: रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारितील आहे. त्यामुळे वंदे भारत ट्रेन कुठे सुरू करायची, कधी सुरू करायची, ते तिकडूनच ठरणार असल्याचे मत रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक तुषारकांत पांडे यांनी नोंदविले.

तर, मोठा लोड कमी होईलउपरोक्त तीन मोठ्या शहरात नागपूरहून वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास ईतर रेल्वेगाड्यातील गर्दी कमी होण्यास मदत होईल आणि रेल्वे प्रशासनावर रिझर्वेशनच्या संबंधाने असलेला मोठा लोड कमी होईल. सध्या नागपूर - बिलासपूर मार्गावर वंदे भारत ट्रेन धावते. या आलिशान ट्रेनला मध्य रेल्वेच्या सर्व वंदे भारतच्या तुलनेत प्रवाशांचा प्रतिसाद सर्वाधिक आहे, हे विशेष !

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसnagpurनागपूरIndian Railwayभारतीय रेल्वे