शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
3
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
4
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
5
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
6
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
7
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
8
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
9
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
10
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
11
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
12
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
13
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
14
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
15
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
16
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
17
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
18
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
19
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
20
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

नागपूर अधिवेशनात राज्यकर्त्यांना सामान्य नागरिकांसाठी वेळ मिळेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 11:23 AM

मुंबईत आमदार निवासाचे काम पूर्ण न झाल्यामुळे नागपुरात पावसाळी अधिवेशन होत आहे. हे अधिवेशनही नेहमीप्रमाणे औपचारिकताच ठरेल, असा दावा तज्ज्ञांकडून केला जात आहे.

ठळक मुद्देअधिवेशन ठरते केवळ औपचारिकतामोजक्याच प्रश्नांवर होते चर्चा

कमल शर्मा/आनंद शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर करारांतर्गत विधिमंडळाचे वर्षातील एक अधिवेशन नागपूरला घेणे बंधनकारक आहे. १९७१ पासून २०१७ पर्यंत शहरात हिवाळी अधिवेशन झाले. यावेळी मुंबईत आमदार निवासाचे काम पूर्ण न झाल्यामुळे नागपुरात पावसाळी अधिवेशन होत आहे. हे अधिवेशनही नेहमीप्रमाणे औपचारिकताच ठरेल, असा दावा तज्ज्ञांकडून केला जात आहे.२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. फडणवीस हे नागपुरातील असल्यामुळे येथील अधिवेशनालाही विशेष महत्व आले. विदर्भाचे समर्थक अशी फडणवीस यांची ओळख असल्यामुळे विदर्भातील नागरिकांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. गेल्या चार वर्षांपासून नागपूर अधिवेशनात विदर्भावर खूप चर्चा झाली. मात्र, पुरेसा वेळ न मिळाल्याने सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर फारसा प्रकाश टाकण्यात आला नाही. आमदार शेकडो प्रश्नांचे प्रस्ताव विधिमंडळ सचिवालयाकडे पाठवितात. मात्र, त्यातील निवडक सभागृहात येतात व त्यातही मोजक्याच प्रश्नांवर चर्चा होते. यावरून विषयांना किती न्याय मिळतो याचा अंदाज येतो. सूत्रांच्या मते बहुतांश प्रश्न दुसऱ्या संबंधित प्रश्नांशी जोडले जातात. लक्षवेधी सूचनांबाबतही असेच केले जाते. याशिवाय औचित्याच्या मुद्यांद्वारेही आपले म्हणणे सरकारपर्यंत पोहचविण्याची आमदारांना संधी असते.अधिवेशनावर निवडणुकीची छाया१९७१ नंतर पहिल्यांदा नागपुरात पावसाळी अधिवेशन होत आहे. मात्र, या अधिवेशनावर निवडणुकीची छाया आहे. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलै रोजी निवडणूक होत आहे. विधानसभा सदस्य आपला मताधिकार बजावतील. संबंधित ११ आमदारांचा कार्यकाळ २७ जुलै रोजी संपुष्टात येत आहे. या जागांसाठी भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सक्रिय झाले आहेत. ४ जुलै रोजी अधिवेशनाला सुरुवात होताच हालचाली सुरू होतील. दरम्यान, शेतकरी व सामान्य नागरिकांच्या हिताच्या काही घोषणा होण्याचीही शक्यता आहे.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८