शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

नागपुरातील ३६ इमारत मालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 20:57 IST

आगीपासून बचावासाठी सुरक्षा यंत्रणा न उभारल्याने शहरातील ३६ बहुमजली इमारत मालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागाने पोलीस विभागाला पत्र दिले आहे.

ठळक मुद्देअग्निशमन विभागाचे पोलिसांना पत्र : आगीपासून बचावासाठी सुरक्षा यंत्रणा नाही : ८८७ इमारती असुरक्षित घोषित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आगीपासून बचावासाठी सुरक्षा यंत्रणा उभारण्यासंदर्भात नोटीस बजावली, वीज व पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतरही सुरक्षा यंत्रणा न उभारल्याने शहरातील ३६ बहुमजली इमारत मालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागाने पोलीस विभागाला पत्र दिले आहे. यात हॉटेल, रेस्टॉरंट व बार, व्यावसायिक प्रतिष्ठानांसह बहुमजली इमारतींचा समावेश आहे.अग्निशमन विभागातर्फे शहरातील एनओसी न घेतलेल्या ३९८५ इमारतींची यादी तयार केली होती. यातील ९८५ लोकांनी आग नियंत्रणासाठी आवश्यक असलेली सुरक्षा यंत्रणा उभारली. २४९१ इमारतीत सुरक्षा यंत्रणा न उभारल्याने त्यांना कलम ६ अंतर्गत नोटीस बजावण्यात आली. त्यानंतरही आग नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना न केल्याने कलम ८(१) अंतर्गत १४१२ इमारतींना असुरक्षित असल्याचे जाहीर करून तेथून हटण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. त्यानंतरही उपाययोजना न केल्याने कलम ८(२) अंतर्गत कारवाई करण्यात आली. यात संबंधित इमारतींचा वीज व पाणीपुरवठा खंडित करण्यात आला तर ६६ इमारतींवर कलम ८(१) ख अंतर्गत कारवाई करण्यात आली. यात पोलीस विभागाला संबंधित इमारती धोकादायक असल्याने त्या खाली करून सील करण्याची सूचना पोलीस विभागाला देण्यात आली आहे.आग नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी संबंधित इमारत मालकांना वेळ देण्यात आली होती. परंतु त्यानंतरही उपाययोजना न केल्याने संबंधित हॉटेल, रेस्टॉरंट व बार, व्यावसायिक संकूल व बहुमजली निवासी इमारतींच्या मालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याबाबतचे पत्र पोलीस विभागाला देण्यात आल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कारवाईबार आणि रेस्टॉरंट यासह बहुमजली इमारतीत आगीपासून बचावाची यंत्रणा आवश्यक आहे. फायर स्टेशनमार्फत तपासणी अभियान सुरु असते. अनियमितता दिसून आल्यास त्यांना नोटीस जारी केली जाते. त्यानंतर आग नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यासाठी सात दिवस ते एक महिन्याची वेळ दिली जाते. संंबधित संचालकांनी योग्य पाऊल उचलले नाही, तर इमारत असुरक्षित घोषित करून वीज-पाणी कापण्याचे आदेश जारी केले जातात. त्यानंतर संबंधितावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पोलिसांना कळविले जाते.राजेंद्र उचके, प्रमुख अग्निशमन अधिकारी महापालिका

टॅग्स :fireआगPoliceपोलिस