शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

नागपुरातील ३६ इमारत मालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 20:57 IST

आगीपासून बचावासाठी सुरक्षा यंत्रणा न उभारल्याने शहरातील ३६ बहुमजली इमारत मालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागाने पोलीस विभागाला पत्र दिले आहे.

ठळक मुद्देअग्निशमन विभागाचे पोलिसांना पत्र : आगीपासून बचावासाठी सुरक्षा यंत्रणा नाही : ८८७ इमारती असुरक्षित घोषित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आगीपासून बचावासाठी सुरक्षा यंत्रणा उभारण्यासंदर्भात नोटीस बजावली, वीज व पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतरही सुरक्षा यंत्रणा न उभारल्याने शहरातील ३६ बहुमजली इमारत मालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागाने पोलीस विभागाला पत्र दिले आहे. यात हॉटेल, रेस्टॉरंट व बार, व्यावसायिक प्रतिष्ठानांसह बहुमजली इमारतींचा समावेश आहे.अग्निशमन विभागातर्फे शहरातील एनओसी न घेतलेल्या ३९८५ इमारतींची यादी तयार केली होती. यातील ९८५ लोकांनी आग नियंत्रणासाठी आवश्यक असलेली सुरक्षा यंत्रणा उभारली. २४९१ इमारतीत सुरक्षा यंत्रणा न उभारल्याने त्यांना कलम ६ अंतर्गत नोटीस बजावण्यात आली. त्यानंतरही आग नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना न केल्याने कलम ८(१) अंतर्गत १४१२ इमारतींना असुरक्षित असल्याचे जाहीर करून तेथून हटण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. त्यानंतरही उपाययोजना न केल्याने कलम ८(२) अंतर्गत कारवाई करण्यात आली. यात संबंधित इमारतींचा वीज व पाणीपुरवठा खंडित करण्यात आला तर ६६ इमारतींवर कलम ८(१) ख अंतर्गत कारवाई करण्यात आली. यात पोलीस विभागाला संबंधित इमारती धोकादायक असल्याने त्या खाली करून सील करण्याची सूचना पोलीस विभागाला देण्यात आली आहे.आग नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी संबंधित इमारत मालकांना वेळ देण्यात आली होती. परंतु त्यानंतरही उपाययोजना न केल्याने संबंधित हॉटेल, रेस्टॉरंट व बार, व्यावसायिक संकूल व बहुमजली निवासी इमारतींच्या मालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याबाबतचे पत्र पोलीस विभागाला देण्यात आल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कारवाईबार आणि रेस्टॉरंट यासह बहुमजली इमारतीत आगीपासून बचावाची यंत्रणा आवश्यक आहे. फायर स्टेशनमार्फत तपासणी अभियान सुरु असते. अनियमितता दिसून आल्यास त्यांना नोटीस जारी केली जाते. त्यानंतर आग नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यासाठी सात दिवस ते एक महिन्याची वेळ दिली जाते. संंबधित संचालकांनी योग्य पाऊल उचलले नाही, तर इमारत असुरक्षित घोषित करून वीज-पाणी कापण्याचे आदेश जारी केले जातात. त्यानंतर संबंधितावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पोलिसांना कळविले जाते.राजेंद्र उचके, प्रमुख अग्निशमन अधिकारी महापालिका

टॅग्स :fireआगPoliceपोलिस