शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पाच तास वीज गुल झाल्यामुळे झाले नागरिकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 20:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लॉकडाऊनमुळे नागरिक आपल्या घरात बंदिस्त आहेत. यात कडक उन्हामुळे जीवाची लाहीलाही होत आहे. अशा ...

ठळक मुद्देमहावितरणच्या अ‍ॅपवर चुकीची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे नागरिक आपल्या घरात बंदिस्त आहेत. यात कडक उन्हामुळे जीवाची लाहीलाही होत आहे. अशा स्थितीत पाच तास वीज गुल झाल्यामुळे नागरिकांचे हाल झाले. ही घटना एखाद्या खेडेगावात नव्हे तर नागपुरात घडली. सकाळी ७ वाजता दाभा परिसरातील वीज गेली. पाच तासानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. या काळात गरमीमुळे नागरिकांचे मोठे हाल झाले.एखाद्या वेळी हवा सुटल्यास किंवा पाऊस आल्यास वीज जाते. परंतु बुधवार असल्यामुळे देखभालीच्या नावाखाली पाच तास दाभा परिसरातील वीज बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांनी महावितरणच्या अ‍ॅपवर संपर्क साधला. परंतु त्यांना त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यात आल्याची चुकीची माहिती मिळाली. लॉकडाऊनच्या काळात वीज बिलाच्या पेमेंटबाबत तक्रार करण्यासाठी अ‍ॅपचा वापर करण्याचे आवाहन महावितरण करीत आहे. परंतु या अ‍ॅपवरच नागरिकांना चुकीची माहिती मिळत असल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. देखभालीच्या नावाखाली पाच तास वीज पुरवठा खंडित केल्याबद्दल नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.

टॅग्स :Power Shutdownभारनियमनnagpurनागपूर