योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही कालावधीपासून संपूर्ण देशात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. विशेषतः सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक तेढ निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेवर आघात करणारे 'डिजिटल असुर' चिंतेचा विषय बनले आहे. अशाच तत्त्वावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांच्या पोस्ट व्हायरल होण्याअगोदरच त्या हटविण्यासाठी नागपूरपोलिसांच्या हाती गरुडदृष्टी'चे अस्त्र आले आहे. नागपुरातील तरुणांच्या व्हिजनमुळे ही प्रणाली विकसित झाली असून याच्यामुळे सोशल माध्यमांतील घडामोडींवर विशेष लक्ष ठेवता येणार आहे. विशेष म्हणजे, नागपूर पोलिसांनी आयोजित केलेल्या 'सायबर हॅकेथॉन'मधूनच नागपूरकर तरुणांची ही 'आयडिया' प्रत्यक्षात उतरली आहे.
श्रेयस कावळे, अखिलेश तळसमुद्रकर, साईश चवरे या तीन तरुणांच्या प्रयत्नाने सायबर पोलिसांना मोठे बळ मिळाले आहे. तीनही तरुण आयटी विषयातील तज्ज्ञ आहेत. ३० वर्षीय श्रेयस हा स्वतः आयटी कंपनी चालवतो व तो सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे, तर अखिलेश व साईश हे दोघेही सायबर सुरक्षेच्या 'डोमेन'मध्ये काम करतात. पोलिसांनी काही महिन्यांअगोदर 'सायबर हॅकेथॉन'चे आयोजन केले होते. सायबर समस्यांवर आयटीच्या माध्यमातून
भविष्यात गुन्ह्यांना रोखण्याचे व्हिजनश्रेयससोबत 'लोकमत'ने संवाद साधला असता त्याने सायबर गुन्हेगारी वाढत असल्याने ते आयटी इंडस्ट्री व पोलिस यंत्रणेसमोरील मोठे आव्हान असल्याचे स्पष्ट केले. सहाःस्थितीत 'गरुडदृष्टी'तून गुन्हेगारांकडून होणाऱ्या सोशल मीडियावरील हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. पोलिस विभागाच्च्या आवश्यकता लक्षात घेऊन यात आणखी अपडेट्स करण्यात येणार आहेत. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्याकडून याबाबत सातत्याने मार्गदर्शन मिळत असल्याचे श्रेयसने स्पष्ट केले.
पॅकेजपेक्षा इनोव्हेशनवर दिला भर
- श्रेयस हा सामान्य कुटुंबातील तरुण असून नागपुरातीलच एका महाविद्यालयातून त्याने अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली होती. काही वर्षे त्याने घराला आधार देण्यासाठी नोकरीदेखील केली. मात्र, लहानपणापासून 'इनोव्हेशन'मध्येच त्याला जास्त रस होता.
- त्यामुळे पॅकेजचा मोह न धरता त्याने २०२० साली स्वतःची कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून विविध संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यावर त्याने व त्याच्या सहकाऱ्यांनी भर दिला. कमी वयातच त्यातून त्याने 'टेक एन्ट्ररप्रेनर' अशी ओळख प्रस्थापित केली.