शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: किन्नराच्या हैदोसानंतर दहशत, रेल्वेतील प्रवाशांना सुरक्षा प्रदान करा; थेट पंतप्रधानांना पत्र

By नरेश डोंगरे | Updated: January 6, 2024 19:12 IST

Nagpur News: पुणे हटिया एक्सप्रेसमध्ये किन्नरांनी घातलेल्या दरोड्यामुळे प्रवासी दहशतीत आले आहे. या पार्श्वभूमीवर, प्रत्येक रेल्वे गाडीमध्ये सशस्त्र गार्ड नियुक्त करून प्रवाशांना सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी प्रवासी तसेच प्रवाशांच्या संघटनेकडून पुढे आली आहे.

- नरेश डोंगरे  नागपूर - पुणे हटिया एक्सप्रेसमध्ये किन्नरांनी घातलेल्या दरोड्यामुळे प्रवासी दहशतीत आले आहे. या पार्श्वभूमीवर, प्रत्येक रेल्वे गाडीमध्ये सशस्त्र गार्ड नियुक्त करून प्रवाशांना सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी प्रवासी तसेच प्रवाशांच्या संघटनेकडून पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय यात्री केंद्राने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून रेल्वे गाड्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विषय त्यांच्यासमोर मांडला आहे.

पुण्याहून नागपूर मार्गे हटियाकडे निघालेल्या रेल्वे गाडीच्या जनरल कोचमध्ये शिरून सहा किन्नरांनी लुटमार केली होती. पैशासाठी त्यांनी त्यावेळी अनेकांना वेठीस धरले होते आणि त्यांच्या कुटुंबियांसमोर तसेच अन्य प्रवाशांसमोर अपमाण करून मारहाणही केली होती. या घटनेचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर प्रवाशांमध्ये संतापाची तसेच असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. प्रत्येक रेल्वेगाडीत रेल्वे सुरक्षा दलाचे जवान सुरक्षेसाठी तैनात असतात. मात्र, त्यांची संख्या फार तर चार किंवा पाच एवढीच असते. ते जवान एसी कोचमधील प्रवाशांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रीत करतात. त्यामुळे जनरल कोचमधून प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होते. हा भाग लक्षात घेऊन  भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंकुमार शुक्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले आहे. या पत्रातून त्यांनी पुणे हटिया एक्सप्रेसमध्ये बुधवारी मध्यरात्री घडलेल्या घटनेचा उल्लेख केला असून रेल्वेगाड्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या विषयाचे मुद्दे मांडले आहे. आउटरवर (निर्जन ठिकाणी) गाडी थांबवू नये, रेल्वे स्थानकावरच डब्याचे दार उघडावे, प्रवाशांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गाडीत सुरक्षेसाठी जे तैनात आहे, अशा जवानांचे मोबाईल प्रत्येक डब्यात लिहिले जावे, अशी मागणीही या पत्रातून करण्यात आली आहे.

एका डब्यात दोन गार्ड असावेप्रत्येक डब्यात किमान दोन गार्ड प्रवाशांच्या सुरक्षेत तैनात असल्यास गुन्हेगारी करणारे, किन्नर तसेच अन्य समाजकंटकावर वचक राहिल आणि प्रवाशांच्या जानमालास समाजकंटकाकडून धोका होणार नाही त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेची व्यवस्था तातडीने करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेCrime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरNarendra Modiनरेंद्र मोदी