शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

Nagpur: किन्नराच्या हैदोसानंतर दहशत, रेल्वेतील प्रवाशांना सुरक्षा प्रदान करा; थेट पंतप्रधानांना पत्र

By नरेश डोंगरे | Updated: January 6, 2024 19:12 IST

Nagpur News: पुणे हटिया एक्सप्रेसमध्ये किन्नरांनी घातलेल्या दरोड्यामुळे प्रवासी दहशतीत आले आहे. या पार्श्वभूमीवर, प्रत्येक रेल्वे गाडीमध्ये सशस्त्र गार्ड नियुक्त करून प्रवाशांना सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी प्रवासी तसेच प्रवाशांच्या संघटनेकडून पुढे आली आहे.

- नरेश डोंगरे  नागपूर - पुणे हटिया एक्सप्रेसमध्ये किन्नरांनी घातलेल्या दरोड्यामुळे प्रवासी दहशतीत आले आहे. या पार्श्वभूमीवर, प्रत्येक रेल्वे गाडीमध्ये सशस्त्र गार्ड नियुक्त करून प्रवाशांना सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी प्रवासी तसेच प्रवाशांच्या संघटनेकडून पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय यात्री केंद्राने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून रेल्वे गाड्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विषय त्यांच्यासमोर मांडला आहे.

पुण्याहून नागपूर मार्गे हटियाकडे निघालेल्या रेल्वे गाडीच्या जनरल कोचमध्ये शिरून सहा किन्नरांनी लुटमार केली होती. पैशासाठी त्यांनी त्यावेळी अनेकांना वेठीस धरले होते आणि त्यांच्या कुटुंबियांसमोर तसेच अन्य प्रवाशांसमोर अपमाण करून मारहाणही केली होती. या घटनेचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर प्रवाशांमध्ये संतापाची तसेच असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. प्रत्येक रेल्वेगाडीत रेल्वे सुरक्षा दलाचे जवान सुरक्षेसाठी तैनात असतात. मात्र, त्यांची संख्या फार तर चार किंवा पाच एवढीच असते. ते जवान एसी कोचमधील प्रवाशांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रीत करतात. त्यामुळे जनरल कोचमधून प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होते. हा भाग लक्षात घेऊन  भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंकुमार शुक्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले आहे. या पत्रातून त्यांनी पुणे हटिया एक्सप्रेसमध्ये बुधवारी मध्यरात्री घडलेल्या घटनेचा उल्लेख केला असून रेल्वेगाड्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या विषयाचे मुद्दे मांडले आहे. आउटरवर (निर्जन ठिकाणी) गाडी थांबवू नये, रेल्वे स्थानकावरच डब्याचे दार उघडावे, प्रवाशांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गाडीत सुरक्षेसाठी जे तैनात आहे, अशा जवानांचे मोबाईल प्रत्येक डब्यात लिहिले जावे, अशी मागणीही या पत्रातून करण्यात आली आहे.

एका डब्यात दोन गार्ड असावेप्रत्येक डब्यात किमान दोन गार्ड प्रवाशांच्या सुरक्षेत तैनात असल्यास गुन्हेगारी करणारे, किन्नर तसेच अन्य समाजकंटकावर वचक राहिल आणि प्रवाशांच्या जानमालास समाजकंटकाकडून धोका होणार नाही त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेची व्यवस्था तातडीने करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेCrime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरNarendra Modiनरेंद्र मोदी