शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
3
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
4
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
5
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
6
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
7
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
8
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
9
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
10
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
11
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
12
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
13
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
14
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
15
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
16
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
17
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
18
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
19
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
20
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी

Nagpur: किन्नराच्या हैदोसानंतर दहशत, रेल्वेतील प्रवाशांना सुरक्षा प्रदान करा; थेट पंतप्रधानांना पत्र

By नरेश डोंगरे | Updated: January 6, 2024 19:12 IST

Nagpur News: पुणे हटिया एक्सप्रेसमध्ये किन्नरांनी घातलेल्या दरोड्यामुळे प्रवासी दहशतीत आले आहे. या पार्श्वभूमीवर, प्रत्येक रेल्वे गाडीमध्ये सशस्त्र गार्ड नियुक्त करून प्रवाशांना सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी प्रवासी तसेच प्रवाशांच्या संघटनेकडून पुढे आली आहे.

- नरेश डोंगरे  नागपूर - पुणे हटिया एक्सप्रेसमध्ये किन्नरांनी घातलेल्या दरोड्यामुळे प्रवासी दहशतीत आले आहे. या पार्श्वभूमीवर, प्रत्येक रेल्वे गाडीमध्ये सशस्त्र गार्ड नियुक्त करून प्रवाशांना सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी प्रवासी तसेच प्रवाशांच्या संघटनेकडून पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय यात्री केंद्राने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून रेल्वे गाड्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विषय त्यांच्यासमोर मांडला आहे.

पुण्याहून नागपूर मार्गे हटियाकडे निघालेल्या रेल्वे गाडीच्या जनरल कोचमध्ये शिरून सहा किन्नरांनी लुटमार केली होती. पैशासाठी त्यांनी त्यावेळी अनेकांना वेठीस धरले होते आणि त्यांच्या कुटुंबियांसमोर तसेच अन्य प्रवाशांसमोर अपमाण करून मारहाणही केली होती. या घटनेचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर प्रवाशांमध्ये संतापाची तसेच असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. प्रत्येक रेल्वेगाडीत रेल्वे सुरक्षा दलाचे जवान सुरक्षेसाठी तैनात असतात. मात्र, त्यांची संख्या फार तर चार किंवा पाच एवढीच असते. ते जवान एसी कोचमधील प्रवाशांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रीत करतात. त्यामुळे जनरल कोचमधून प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होते. हा भाग लक्षात घेऊन  भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंकुमार शुक्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले आहे. या पत्रातून त्यांनी पुणे हटिया एक्सप्रेसमध्ये बुधवारी मध्यरात्री घडलेल्या घटनेचा उल्लेख केला असून रेल्वेगाड्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या विषयाचे मुद्दे मांडले आहे. आउटरवर (निर्जन ठिकाणी) गाडी थांबवू नये, रेल्वे स्थानकावरच डब्याचे दार उघडावे, प्रवाशांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गाडीत सुरक्षेसाठी जे तैनात आहे, अशा जवानांचे मोबाईल प्रत्येक डब्यात लिहिले जावे, अशी मागणीही या पत्रातून करण्यात आली आहे.

एका डब्यात दोन गार्ड असावेप्रत्येक डब्यात किमान दोन गार्ड प्रवाशांच्या सुरक्षेत तैनात असल्यास गुन्हेगारी करणारे, किन्नर तसेच अन्य समाजकंटकावर वचक राहिल आणि प्रवाशांच्या जानमालास समाजकंटकाकडून धोका होणार नाही त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेची व्यवस्था तातडीने करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेCrime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरNarendra Modiनरेंद्र मोदी