शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: भरडधान्याने दूर हाेतील आधुनिक जीवनशैलीचे सर्व आजार, पद्मश्री खादर वल्ली यांचा दावा

By निशांत वानखेडे | Updated: November 20, 2023 19:23 IST

Nagpur: सध्या उपलब्ध असलेल्या भरडधान्य (मिलेट्स) मध्ये सर्व प्रकारचे प्रथिने आणि शरीरातील शर्करा नियंत्रित करण्याची क्षमता आहे.

- निशांत वानखेडे नागपूर : सध्या उपलब्ध असलेल्या भरडधान्य (मिलेट्स) मध्ये सर्व प्रकारचे प्रथिने आणि शरीरातील शर्करा नियंत्रित करण्याची क्षमता आहे. आहारात यांचे सेवन वाढले तर कार्पाेरेट अन्न व आधुनिक जीवनशैलीमुळे आलेले सर्व आजार दूर करून देशाला राेगमुक्त करण्याची क्षमता आहे, असा विश्वास ‘मिलेट मॅन’ पद्मश्री डाॅ. खादर वल्ली यांनी केला.

नागपूर प्रेस क्लबतर्फे आयाेजित औपचारिक चर्चेत डाॅ. वल्ली यांनी हरितक्रांतीमुळे देशाच्या अन्नसाखळीचे नुकसान झाल्याची टीका केली. भारत भरडधान्याच्या उपलब्धतेमुळे अन्नाच्या गरजेत स्वयंपूर्ण हाेता. मात्र हरित क्रांतीच्या नावाने भात, गहु, साखर, मांस, दूध हे व्यावसायिक अन्नधान्य जेवणाच्या ताटात आले आणि समस्या वाढली. हे अन्न मधुमेह, रक्तदाब, थायराॅईड व इतर सर्व दुर्धर आजारांचे कारण आहे. या व्यावसायिक अन्नामध्ये शर्कराचे प्रचंड प्रमाण असते. आज भारत मधुमेहाची राजधानी झाला व ८-१० वर्षाच्या मुलांना देखील या आजाराने ग्रासले, हे त्याचेच कारण हाेय.ज्वारी, बाजरी, नाचनी, मका व चना हे माेठे भरडधान्य तर काेदाे, कुटकी, कंगनी, हिरवी कंगनी, साव ही लहान धान्य सध्या उपलब्ध आहेत. या धान्याचे माेठ्या प्रमाणात उत्पादन दक्षिण भारतात सुरू झाले आहे. भरडधान्यात शर्करा नियंत्रित करण्याची क्षमता आहे. शिवाय हे चयापचय व अनुवांशिक असंतुलनही दूर करू शकते. आहारात भरडधान्याचे सेवन वाढले तर व्यक्ती सहा महिन्यात आजारमुक्त हाेईल व याबाबत यशस्वी प्रयाेग केल्याची माहिती डाॅ. वल्ली यांनी दिली. भारतीयांच्या ताटात भरडधान्यांचा समावेश करणे हे आयुष्याचे ध्येय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

कार्पाेरेट लाॅबीचे मायाजाळआपल्यात ताटात गहु, भात, साखर येणे ही नैसर्गिक गाेष्ट नाही तर कार्पाेरेट लाॅबीचे मायाजाळ आहे, अशी टीका डाॅ. वल्ली यांनी केली. यामागे कार्पाेरेट धान्याचे पेटंट करणारेच नाही तर खत कंपन्या, किटनाशक कंपन्या आणि वैद्यकीय व औषधी कंपन्यांची लाॅबी कार्यरत असल्याचा आराेप त्यांनी केला.

लाखाे रुपयांची सबसिडीहे कार्पाेरेट अन्न आपल्या ताटात स्वस्तात येते असे आपल्याला दाखविले जात असले तरी यामागे सबसिडीच्या रुपाने सरकारचे लाखाे रुपये जातात. दरचर्षी २.४ लाख काेटी रुपये या धान्यावरील सबसिडीवर जात असल्याचा दावा करीत यातील १०-२० टक्के सबसिडी भरडधान्याला मिळाली तर क्रांती घडेल, असेही ते म्हणाले.

किचनच गायब हाेत आहेआतातर बहुतेक घरांमधले किचन गायब हाेत आहे. झाेमॅटाेसारख्या कंपन्याद्वारे बाहेरून अन्न मागविण्याचे फॅड वाढले आहे, जे अतिशय धाेकादायक असल्याचे डाॅ. वल्ली म्हणाले.

टॅग्स :foodअन्नnagpurनागपूर