शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

नागपूर मनपा स्थायी समिती अध्यक्ष कुकरेजा यांच्याने तिजोरी सांभाळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 23:47 IST

जेव्हापासून मनपाच्या तिजोरीची चावी स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांच्या हाती आली आहे, तेव्हापासून मनपाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यांच्या कार्यकाळात २०१८-१९ चा २९४६ कोटी रुपयाचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तेव्हा असे वाटले की विकासाचे नवे वारे वाहतील. परंतु त्यांच्या कार्यकाळात तिजोरी खाली झाली. मनपावर ‘नादार’होण्याची वेळ आली आहे. कंत्राटदार सुद्धा आठवडाभरापासून तीव्र आंदोलन करीत आहेत. कर्मचाऱ्यांची दिवाळीही काळी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देभरभक्कम सादर केला अर्थसंकल्प : अंमलबजावणीचे काय?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जेव्हापासून मनपाच्या तिजोरीची चावी स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांच्या हाती आली आहे, तेव्हापासून मनपाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यांच्या कार्यकाळात २०१८-१९ चा २९४६ कोटी रुपयाचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तेव्हा असे वाटले की विकासाचे नवे वारे वाहतील. परंतु त्यांच्या कार्यकाळात तिजोरी खाली झाली. मनपावर ‘नादार’होण्याची वेळ आली आहे. कंत्राटदार सुद्धा आठवडाभरापासून तीव्र आंदोलन करीत आहेत. कर्मचाऱ्यांची दिवाळीही काळी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मनपाचे वास्तविक उत्पन्न गेल्या वर्षी १७५० कोटीच्या जवळपास होते. माजी स्थायी समिती अध्यक्ष संदीप जोशी यांनी २२७१.९७ कोटी रुपयाचा अर्थसंकल्प सादर केला होता. परंतु नागपूरच्या नागरिकांना मूर्ख बनवत कुकरेजा यांनी मागच्या स्थायी समितीपेक्षा ६७४.०३ कोटी रुपयाचा अधिकच अर्थसंकल्प सादर केला. विशेष म्हणजे जूनमध्ये अर्थसंकल्प सादर होऊन जुलै महिन्याच्या शेवटी मनपा आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी त्यावर स्वाक्षरी केली. स्वाक्षरीसोबतच त्यावर नियंत्रण आणण्यासाठी (अर्थसंकल्पातील तरतुदींना कात्री लावण्यासाठी ) जीआर सुद्धा जारी केला. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष पूर्णपणे हतबल असल्याचे दिसून आले.सामान्यपणे स्थायी समितीच्या अथसंकल्पामध्ये डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आयुक्त कपात करीत असतात. परंतु नेतृत्वक्षमतेची कमतरता, मनपाचा कमी असलेला अनुभव आणि अदूरदर्शितेमुळे कुकरेजा यांच्या योजनांवर पाणी फेरले. त्यांच्याकडे आता केवळ काही महिन्यांचाच कार्यकाळ शिल्लक आहे. परंतु अर्थसंकल्पात सादर करण्यात आलेल्या एकाही योजनेचे काम अद्याप सुरु होऊ शकलेले नाही. त्यामुळे कुकरेजा यांनी भरभक्कम अर्थसंकल्प सादर करून नागरिकांना मूर्ख बनवण्याचे काम केले आहे. यासंदर्भात स्थायी समितीचे अध्यक्ष कुकरेजा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मिटिंगमध्ये असल्याचे सांगत फोन ठेवून दिला.कंत्राटदारांपासून तोंड लपवित फिरताहेत कुकरेजाकुकरेजा हे राज्य सरकारकडून विशेष निधी आणत असल्याचा दावा गेल्या दोन महिन्यांपासून करीत आहेत. परंतु त्यांच्या कार्यकाळात दुसऱ्यांदा आठवडाभरापेक्षा अधिक दिवस कंत्राटदार आंदोलनावर आहेत. सध्या ते कंत्राटदारापासून तोंड लपवित फिरताना दिसत आहेत. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असल्याचे मानले जाते. परंतु त्याचा फायदाही ना मनपाला झाला ना जनतेला.यंदा कर्मचाऱ्यांची काळी दिवाळीज्या पद्धतीने स्थायी समिती अध्यक्षाची भूमिका आहे, ती पाहता मनपा कर्मचाऱ्यांना यंदा त्यांची दिवाळी काळी होण्याची भीती वाटत आहे. त्यांच्या प्रश्नांना सुद्धा कुकरेजा प्रशासनिक स्तरावर उचलण्यास अपयशी ठरले आहे. मनपा कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रीम राशी दिली जाते. ती नंतर वेतनातून कपात केली जाते. ती रक्कम देण्याची हालचालसुद्धा सुरु झालेली नाही. सहावा वेतन आयोग आणि महागाई भत्त्याचे थकीत तर दूरच राहिले.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर