शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

नागपूर मनपा स्थायी समिती अध्यक्ष कुकरेजा यांच्याने तिजोरी सांभाळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 23:47 IST

जेव्हापासून मनपाच्या तिजोरीची चावी स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांच्या हाती आली आहे, तेव्हापासून मनपाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यांच्या कार्यकाळात २०१८-१९ चा २९४६ कोटी रुपयाचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तेव्हा असे वाटले की विकासाचे नवे वारे वाहतील. परंतु त्यांच्या कार्यकाळात तिजोरी खाली झाली. मनपावर ‘नादार’होण्याची वेळ आली आहे. कंत्राटदार सुद्धा आठवडाभरापासून तीव्र आंदोलन करीत आहेत. कर्मचाऱ्यांची दिवाळीही काळी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देभरभक्कम सादर केला अर्थसंकल्प : अंमलबजावणीचे काय?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जेव्हापासून मनपाच्या तिजोरीची चावी स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांच्या हाती आली आहे, तेव्हापासून मनपाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यांच्या कार्यकाळात २०१८-१९ चा २९४६ कोटी रुपयाचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तेव्हा असे वाटले की विकासाचे नवे वारे वाहतील. परंतु त्यांच्या कार्यकाळात तिजोरी खाली झाली. मनपावर ‘नादार’होण्याची वेळ आली आहे. कंत्राटदार सुद्धा आठवडाभरापासून तीव्र आंदोलन करीत आहेत. कर्मचाऱ्यांची दिवाळीही काळी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मनपाचे वास्तविक उत्पन्न गेल्या वर्षी १७५० कोटीच्या जवळपास होते. माजी स्थायी समिती अध्यक्ष संदीप जोशी यांनी २२७१.९७ कोटी रुपयाचा अर्थसंकल्प सादर केला होता. परंतु नागपूरच्या नागरिकांना मूर्ख बनवत कुकरेजा यांनी मागच्या स्थायी समितीपेक्षा ६७४.०३ कोटी रुपयाचा अधिकच अर्थसंकल्प सादर केला. विशेष म्हणजे जूनमध्ये अर्थसंकल्प सादर होऊन जुलै महिन्याच्या शेवटी मनपा आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी त्यावर स्वाक्षरी केली. स्वाक्षरीसोबतच त्यावर नियंत्रण आणण्यासाठी (अर्थसंकल्पातील तरतुदींना कात्री लावण्यासाठी ) जीआर सुद्धा जारी केला. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष पूर्णपणे हतबल असल्याचे दिसून आले.सामान्यपणे स्थायी समितीच्या अथसंकल्पामध्ये डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आयुक्त कपात करीत असतात. परंतु नेतृत्वक्षमतेची कमतरता, मनपाचा कमी असलेला अनुभव आणि अदूरदर्शितेमुळे कुकरेजा यांच्या योजनांवर पाणी फेरले. त्यांच्याकडे आता केवळ काही महिन्यांचाच कार्यकाळ शिल्लक आहे. परंतु अर्थसंकल्पात सादर करण्यात आलेल्या एकाही योजनेचे काम अद्याप सुरु होऊ शकलेले नाही. त्यामुळे कुकरेजा यांनी भरभक्कम अर्थसंकल्प सादर करून नागरिकांना मूर्ख बनवण्याचे काम केले आहे. यासंदर्भात स्थायी समितीचे अध्यक्ष कुकरेजा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मिटिंगमध्ये असल्याचे सांगत फोन ठेवून दिला.कंत्राटदारांपासून तोंड लपवित फिरताहेत कुकरेजाकुकरेजा हे राज्य सरकारकडून विशेष निधी आणत असल्याचा दावा गेल्या दोन महिन्यांपासून करीत आहेत. परंतु त्यांच्या कार्यकाळात दुसऱ्यांदा आठवडाभरापेक्षा अधिक दिवस कंत्राटदार आंदोलनावर आहेत. सध्या ते कंत्राटदारापासून तोंड लपवित फिरताना दिसत आहेत. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असल्याचे मानले जाते. परंतु त्याचा फायदाही ना मनपाला झाला ना जनतेला.यंदा कर्मचाऱ्यांची काळी दिवाळीज्या पद्धतीने स्थायी समिती अध्यक्षाची भूमिका आहे, ती पाहता मनपा कर्मचाऱ्यांना यंदा त्यांची दिवाळी काळी होण्याची भीती वाटत आहे. त्यांच्या प्रश्नांना सुद्धा कुकरेजा प्रशासनिक स्तरावर उचलण्यास अपयशी ठरले आहे. मनपा कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रीम राशी दिली जाते. ती नंतर वेतनातून कपात केली जाते. ती रक्कम देण्याची हालचालसुद्धा सुरु झालेली नाही. सहावा वेतन आयोग आणि महागाई भत्त्याचे थकीत तर दूरच राहिले.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर