शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नागपूर-मुंबई दुरांतोच्या नव्या एलएचबी कोचमध्ये प्रवाशांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 12:26 IST

रेल्वे प्रशासनाने नागपूर-मुंबई आणि मुंबई नागपूर दुरांतो एक्स्प्रेसमध्ये जुन्या कोचऐवजी एलएचबी कोच लावले आहेत. परंतु एलएचबी कोच लावल्यानंतर दोन दिवसातच त्यात तांत्रिक बिघाड असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देपंखे, चार्जिंग पॉईंट बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे प्रशासनाने नागपूर-मुंबई आणि मुंबई नागपूर दुरांतो एक्स्प्रेसमध्ये जुन्या कोचऐवजी एलएचबी कोच लावले आहेत. परंतु एलएचबी कोच लावल्यानंतर दोन दिवसातच त्यात तांत्रिक बिघाड असल्याचे स्पष्ट झाले आहे. या गाड्यांमधील पंखे, चार्जिंग पॉईंट बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.रेल्वेगाडी क्रमांक १२२८९ मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेस मंगळवारी २६ फेब्रुवारीला नागपूरसाठी छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून रवाना झाली. गाडी सुटताच एस ६ कोचमधील सर्व पंखे आणि मोबाईल चार्जिंग पॉईंट बंद असल्याचे लक्षात आले. या कोचमधील प्रवासी मनोज बंड यांच्यासह इतर प्रवाशांनी कोचमधील टीटीईला तक्रार केली. टीटीईने इगतपुरीला दुरुस्त करण्यात येणार असल्याचे सांगितले. परंतु ही गाडी नागपूरला पोहोचेपर्यंत यातील पंखे आणि चार्जिंग पॉईंट सुरु झाले नाही. याबाबत रेल्वेचे मेकॅनिक प्रमोद उईके यांच्याशी संपर्क साधला असता ते केवळ पाहणी करून निघून गेले. एस ६ कोचमध्ये बर्थ क्रमांक ७३ जवळील खिडकी इतकी जाम झाली होती की ती उघडत नव्हती. यामुळे प्रवाशांना गरमीत प्रवास करावा लागला. या कोचमध्ये ज्येष्ठ नागरिक प्रवास करीत होते. या गाडीच्या कोचमध्ये ८० बर्थ आहेत. परंतु बेडरोल ठेवण्यासाठी जागा देण्यात आली नाही. यामुळे बर्थ क्रमांक ७९ वर बेडरोल ठेवल्यामुळे प्रवाशांना बसण्यास त्रास झाला.

टॅग्स :railwayरेल्वे