शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

नागपूर मेट्रो रेल्वे प्रशासनातर्फे मृताच्या पत्नीची अवहेलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 01:11 IST

कामठी रोडवर मेट्रो रेल्वेच्या बांधकामादरम्यान अपुऱ्या सुरक्षेमुळे अपघाती मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयास नुकसान भरपाई देण्यास मेट्रो रेल्वेचे अधिकारी तब्बल १३ महिन्यांपासून टाळाटाळ करीत असल्याचा आरोप मृताची पत्नी किरण मेश्राम यांनी लोकमतशी बोलताना केला.

ठळक मुद्देअपघाताच्या १३ महिन्यानंतरही भरपाई देण्यास टाळाटाळ : अधिकारी करताहेत दिशाभूल

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कामठी रोडवर मेट्रो रेल्वेच्या बांधकामादरम्यान अपुऱ्या सुरक्षेमुळे अपघाती मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयास नुकसान भरपाई देण्यास मेट्रो रेल्वेचे अधिकारी तब्बल १३ महिन्यांपासून टाळाटाळ करीत असल्याचा आरोप मृताची पत्नी किरण मेश्राम यांनी लोकमतशी बोलताना केला.आशिष अशोकराव मेश्राम असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो एका खासगी कंपनीत कार्यरत होता. किरण मेश्राम यांनी सांगितले की, १५ फेब्रुवारी २०१७ रोजी दुपारी आशिष कामठी रोडवरून जात असताना मेट्रो रेल्वेच्या कामादरम्यान मेट्रोच्या ढिसाळ कारभारामुळे एका मोठ्या मशीनचा रॉड लागून त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळी मेट्रो रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कामगारांनी बॅरिकेट्स लावून चूक आशिषची असल्याचे भासवले. पण कंपनीच्या चुकीमुळे अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आयटीडी सिमेंटेशन इंडिया लि. ही कंपनी त्याठिकाणी बांधकाम करीत होती. अपघातानंतर पोलिसांनी आशिषला मेयो हॉस्पिटलमध्ये आणले आणि एफआयआर नोंदविल्याची माहिती किरण यांनी दिली.मेट्रो रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या घटनेचा जाब विचारण्यासाठी कंपनीचे अधिकारी आनंद अग्निहोत्री यांची हिंगणा येथील कार्यालयात १७ आणि २० फेब्रुवारी २०१७ ला भेट घेतली. कोर्टकचेरीत काहीही ठेवले नाही. आपसात समझोता करा. एक महिन्यात ४० लाख रुपये नुकसान भरपाई मिळवून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. त्याकरिता त्यांनी एफआयआर व आधार कार्ड आणि अन्य कागदपत्रांचे झेरॉक्स मागितले. त्यानंतर दर दोन ते तीन दिवसांनी सिव्हील लाईन्स येथील मेट्रो हाऊसला जात होतो. अग्निहोत्री यांना मोबाईल करीत होतो. पण ते खोटी आश्वासने देत होते. त्यांनी महामेट्रोचे अधिकारी माणिक पाटील यांची भेट घालून दिली. अशा कामात वेळ लागतो. भरपाई मिळेल, चिंता करू नका, असे आश्वासन दिले. अशा प्रकारे दर महिन्यात या अधिकाऱ्यांची भेट घेत होतो, पण मला या दोन्ही अधिकाऱ्यांनी केवळ खोटी आश्वासने दिली, असा आरोप किरण मेश्राम यांनी केला.अधिकाऱ्यांच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून अखेर १७ नोव्हेंबर २०१७ ला चार ते पाच नातेवाईकांना घेऊन आयटीडी कंपनीच्या हिंगणा येथील कार्यालयात गेलो. त्यावेळी मेट्रो हाऊसमधील माणिक पाटील यांनी मला मोबाईल करून तुम्ही हिंगण्यातील कार्यालयात का गेला, यापुढे माझ्याशी संपर्क करायचा नाही, अशी तंबी देऊन जे बनते ते करून टाका, तुमचे काम होणार नाही, असे सांगितले. तेव्हा मी त्यांना आतापर्यंत आश्वासन का दिले, असे म्हटल्यानंतर मी पाच दिवसात निर्णय देतो, असे पाटील यांनी सांगितले. त्यांनी आतापर्यंत भरपाई संदर्भात काहीच केलेले नाही. आतापर्यंत आनंद अग्निहोत्री यांना १०० मोबाईल केले आहेत. आता त्यांनीही बोलण्यास नकार दिला आहे. अखेर प्रकल्प व्यवस्थापक दास यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही माझा या घटनेशी काहीही संबंध नाही, मला मोबाईल करू नका, असे सांगितले. ८ डिसेंबर २०१७ रोजी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांची भेट घेऊन त्यांना प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली होती. त्यांनीही यावर आजपर्यंत काहीच निर्णय घेतलेला नाही, असे किरण मेश्राम यांनी सांगितले.कमावता पती आशिषच्या मृत्यूनंतर दोन लहान मुले आणि वयोवृद्ध आईचा सांभाळ करीत आहे. आर्थिक स्रोत नसल्यामुळे पुढे त्यांचा सांभाळ करणे कठीण आहे. या प्रकरणी दीक्षित यांनी जातीने लक्ष घालून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी किरण मेश्राम यांनी लोकमतशी बोलताना केली.

 

टॅग्स :nagpurनागपूरMetroमेट्रो