शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
20
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मेट्रो रेल्वे प्रशासनातर्फे मृताच्या पत्नीची अवहेलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 01:11 IST

कामठी रोडवर मेट्रो रेल्वेच्या बांधकामादरम्यान अपुऱ्या सुरक्षेमुळे अपघाती मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयास नुकसान भरपाई देण्यास मेट्रो रेल्वेचे अधिकारी तब्बल १३ महिन्यांपासून टाळाटाळ करीत असल्याचा आरोप मृताची पत्नी किरण मेश्राम यांनी लोकमतशी बोलताना केला.

ठळक मुद्देअपघाताच्या १३ महिन्यानंतरही भरपाई देण्यास टाळाटाळ : अधिकारी करताहेत दिशाभूल

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कामठी रोडवर मेट्रो रेल्वेच्या बांधकामादरम्यान अपुऱ्या सुरक्षेमुळे अपघाती मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयास नुकसान भरपाई देण्यास मेट्रो रेल्वेचे अधिकारी तब्बल १३ महिन्यांपासून टाळाटाळ करीत असल्याचा आरोप मृताची पत्नी किरण मेश्राम यांनी लोकमतशी बोलताना केला.आशिष अशोकराव मेश्राम असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो एका खासगी कंपनीत कार्यरत होता. किरण मेश्राम यांनी सांगितले की, १५ फेब्रुवारी २०१७ रोजी दुपारी आशिष कामठी रोडवरून जात असताना मेट्रो रेल्वेच्या कामादरम्यान मेट्रोच्या ढिसाळ कारभारामुळे एका मोठ्या मशीनचा रॉड लागून त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळी मेट्रो रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कामगारांनी बॅरिकेट्स लावून चूक आशिषची असल्याचे भासवले. पण कंपनीच्या चुकीमुळे अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आयटीडी सिमेंटेशन इंडिया लि. ही कंपनी त्याठिकाणी बांधकाम करीत होती. अपघातानंतर पोलिसांनी आशिषला मेयो हॉस्पिटलमध्ये आणले आणि एफआयआर नोंदविल्याची माहिती किरण यांनी दिली.मेट्रो रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या घटनेचा जाब विचारण्यासाठी कंपनीचे अधिकारी आनंद अग्निहोत्री यांची हिंगणा येथील कार्यालयात १७ आणि २० फेब्रुवारी २०१७ ला भेट घेतली. कोर्टकचेरीत काहीही ठेवले नाही. आपसात समझोता करा. एक महिन्यात ४० लाख रुपये नुकसान भरपाई मिळवून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. त्याकरिता त्यांनी एफआयआर व आधार कार्ड आणि अन्य कागदपत्रांचे झेरॉक्स मागितले. त्यानंतर दर दोन ते तीन दिवसांनी सिव्हील लाईन्स येथील मेट्रो हाऊसला जात होतो. अग्निहोत्री यांना मोबाईल करीत होतो. पण ते खोटी आश्वासने देत होते. त्यांनी महामेट्रोचे अधिकारी माणिक पाटील यांची भेट घालून दिली. अशा कामात वेळ लागतो. भरपाई मिळेल, चिंता करू नका, असे आश्वासन दिले. अशा प्रकारे दर महिन्यात या अधिकाऱ्यांची भेट घेत होतो, पण मला या दोन्ही अधिकाऱ्यांनी केवळ खोटी आश्वासने दिली, असा आरोप किरण मेश्राम यांनी केला.अधिकाऱ्यांच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून अखेर १७ नोव्हेंबर २०१७ ला चार ते पाच नातेवाईकांना घेऊन आयटीडी कंपनीच्या हिंगणा येथील कार्यालयात गेलो. त्यावेळी मेट्रो हाऊसमधील माणिक पाटील यांनी मला मोबाईल करून तुम्ही हिंगण्यातील कार्यालयात का गेला, यापुढे माझ्याशी संपर्क करायचा नाही, अशी तंबी देऊन जे बनते ते करून टाका, तुमचे काम होणार नाही, असे सांगितले. तेव्हा मी त्यांना आतापर्यंत आश्वासन का दिले, असे म्हटल्यानंतर मी पाच दिवसात निर्णय देतो, असे पाटील यांनी सांगितले. त्यांनी आतापर्यंत भरपाई संदर्भात काहीच केलेले नाही. आतापर्यंत आनंद अग्निहोत्री यांना १०० मोबाईल केले आहेत. आता त्यांनीही बोलण्यास नकार दिला आहे. अखेर प्रकल्प व्यवस्थापक दास यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही माझा या घटनेशी काहीही संबंध नाही, मला मोबाईल करू नका, असे सांगितले. ८ डिसेंबर २०१७ रोजी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांची भेट घेऊन त्यांना प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली होती. त्यांनीही यावर आजपर्यंत काहीच निर्णय घेतलेला नाही, असे किरण मेश्राम यांनी सांगितले.कमावता पती आशिषच्या मृत्यूनंतर दोन लहान मुले आणि वयोवृद्ध आईचा सांभाळ करीत आहे. आर्थिक स्रोत नसल्यामुळे पुढे त्यांचा सांभाळ करणे कठीण आहे. या प्रकरणी दीक्षित यांनी जातीने लक्ष घालून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी किरण मेश्राम यांनी लोकमतशी बोलताना केली.

 

टॅग्स :nagpurनागपूरMetroमेट्रो