शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

नागपुरातील मोमिनपुरा परिसर कावीळ, गॅस्ट्रोच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 20:46 IST

मोमिनपुरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याने या भागात मोठ्या संख्येत कावीळ व गॅस्ट्रोचे रुग्ण दिसून येऊ लागले आहेत. तकिया, नालसाहब चौक, कसाबपुरा या परिसरात ४२वर लोकांना कावीळची लागण झाली आहे.

ठळक मुद्देदूषित पाण्याचा पुरवठा : ४२ वर लोकांना कावीळ : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोमिनपुरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याने या भागात मोठ्या संख्येत कावीळ व गॅस्ट्रोचे रुग्ण दिसून येऊ लागले आहेत. तकिया, नालसाहब चौक, कसाबपुरा या परिसरात ४२वर लोकांना कावीळची लागण झाली आहे. प्रशासनाला याविषयी तक्रार करूनही लक्ष देत नसल्याचा येथील सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे. विशेषत: या भागात ‘लोकमत’ चमू गेली असताना लोकांनी दूषित पाणी दाखवत ‘ओसीडब्ल्यू’ मुर्दाबादचे फलक हाती घेऊन निषेध व्यक्त केला.महानगरपालिकेच्या झोन क्र. ६ महाल अंतर्गत येणाऱ्या विशेषत: मेयो हॉस्पिटललगत असलेल्या कसाबपुरा, तकिया, नालसाहब चौक परिसरात गेल्या १५-२० दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. सुरुवातीला येणारे पाणी लाल-पिवळसर व दुर्गंधीयुक्त असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे काही वेळ पाणी जाऊ दिल्यानंतर या पाण्याचा वापर पिण्यासाठी होतो. परंतु हे पाणी किती शुद्ध ही शंका आहे. दूषित पाण्यामुळे घराघरात कावीळ, गॅस्ट्रोचे रुग्ण आहेत. काही शासकीय तर काही खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. काही दिवसांपूर्वी दोन रुग्णांचा मृत्यूही झाल्याचे येथील नागरिक सांगतात. या समस्येला घेऊन येथील नागरिकांनी ‘आॅरेंज सिटी वॉटर वर्क्स’ला (ओसीडब्ल्यू) तक्रारी दाखल केल्या आहेत. सोमवारी ‘लोकमत’ चमूने या भागाला भेट दिली असता पाण्याची बिकट समस्या असताना, दूषित पाण्यामुळे येथील नागरिक हवालदिल झाल्याचे दिसून आले.-महापौरांना पाजणार पाणीयुवक काँग्रेसचे वरिष्ठ महासचिव फजलूर्रहमान कुरेशी म्हणाले, या भागात कमी दाबाचा पाणीपुरवठा होत असल्याने पाणी समस्या बाराही महिने असते. यातच गेल्या महिन्यापासून दूषित पाण्याच्या समस्येत वाढ झाली आहे. दूषित पाण्यामुळे कावीळ, गॅस्ट्रोच्या रुग्णांत वाढ झाली आहे. विशेषत: लहान मुले याला बळी पडत असल्याने पालकांमध्ये रोष आहे. या समस्येला घेऊन ‘ओसीडब्ल्यू’ला तक्रारी केल्या आहेत, परंतु उपाययोजना नाही. यामुळे या भागात नळाला येणारे पाणी आम्ही आता महापौरांना पाजण्याचे आंदोलन हाती घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला.शुद्ध पाण्याची जबाबदारी मनपाचीमोहम्मद रिजवान म्हणाले, तकिया परिसरात पाण्याची भीषण टंचाई आहे. यातच सुरुवातीला येणारे पाणी हे दुर्गंधीयुक्त असते. त्या स्थितीतही लोक पाणी भरतात. या पाण्यामुळे कावीळ, गॅस्ट्रोच्या रुग्णांत वाढ झाली आहे. शुद्ध पाण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. परंतु तक्रारी करूनही त्याचे निराकरण होत नसल्याने सामान्य नागरिकांनी कुणाकडे दादा मागावी हा प्रश्न आहे.

 लोक मेल्यावरच प्रशासन लक्ष देईलहैदरी रोड येथील हाजी तसलीम व मोमिनपुरा येथील मो. शाहीद रंगुनवाला म्हणाले, दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले, परंतु मनपाकडून याची दखलही घेतली जात नाही. उपाययोजना म्हणून टँकरमधून पाणीपुरवठाही केला जात नाही. लोक मेल्यावरच प्रशासन लक्ष देईल का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.९५ टक्के रुग्ण कावीळ व गॅस्ट्रोचेकसाबपुरा परिसरात वैद्यकीय व्यवसाय करणारे बालरोगतज्ज्ञ डॉ. इकबाल म्हणाले, गेल्या महिन्यापासून या भागात कावीळ व गॅस्ट्रोच्या रुग्णांत वाढ झाली आहे. साधारण ९५ टक्के रुग्ण या रोगाचे येत आहेत. रुग्णांच्या मतानुसार त्यांच्या घरात दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. यामुळे या सर्वांना स्वच्छ पाणी तेही उकळून पिण्याचा सल्ला दिला जात आहे. रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या मोठी आहे, असेही ते म्हणाले.ओसीडब्ल्यू मुर्दाबादचे दाखविले फलक‘लोकमत’चमूने कसाबपुरा, तकिया, नालसाहब चौक परिसराला भेट देऊन समस्या जाणून घेतली असता येथील महिला व पुरुषांनी कागदावर ‘ओसीडब्ल्यू मुर्दाबाद’ लिहून आपला रोष व्यक्त केला. तक्रारी करूनही दखल घेत नसल्याचा त्यांचा आरोप आहे.तिसऱ्या महिन्यापासून दूषित पाण्याची तक्रारप्रभाग ८ मधील हैदरी रोड, पनईपेठ, तकिया दिवानशा, मोहम्मद अली सराय, तकिया महबूबशा व तकिया मासुमशा या वसाहतीत दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार महानगरपालिकेच्या आयुक्तांपासून ते जलप्रदाय विभागाला तिसºया महिन्यापासून करीत आहे. लोकांच्या सोयीसाठी या भागात आरोग्य शिबिरे भरविण्यात आली. मनपाकडून पाणी शुद्ध करण्यासाठी गोळ्यांचेही वाटप केले.जुल्फेकार अहमद भुट्टोनगरसेवक, प्रभाग ८

 

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर