शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

नागपुरातील मोमिनपुरा परिसर कावीळ, गॅस्ट्रोच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 20:46 IST

मोमिनपुरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याने या भागात मोठ्या संख्येत कावीळ व गॅस्ट्रोचे रुग्ण दिसून येऊ लागले आहेत. तकिया, नालसाहब चौक, कसाबपुरा या परिसरात ४२वर लोकांना कावीळची लागण झाली आहे.

ठळक मुद्देदूषित पाण्याचा पुरवठा : ४२ वर लोकांना कावीळ : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोमिनपुरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याने या भागात मोठ्या संख्येत कावीळ व गॅस्ट्रोचे रुग्ण दिसून येऊ लागले आहेत. तकिया, नालसाहब चौक, कसाबपुरा या परिसरात ४२वर लोकांना कावीळची लागण झाली आहे. प्रशासनाला याविषयी तक्रार करूनही लक्ष देत नसल्याचा येथील सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे. विशेषत: या भागात ‘लोकमत’ चमू गेली असताना लोकांनी दूषित पाणी दाखवत ‘ओसीडब्ल्यू’ मुर्दाबादचे फलक हाती घेऊन निषेध व्यक्त केला.महानगरपालिकेच्या झोन क्र. ६ महाल अंतर्गत येणाऱ्या विशेषत: मेयो हॉस्पिटललगत असलेल्या कसाबपुरा, तकिया, नालसाहब चौक परिसरात गेल्या १५-२० दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. सुरुवातीला येणारे पाणी लाल-पिवळसर व दुर्गंधीयुक्त असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे काही वेळ पाणी जाऊ दिल्यानंतर या पाण्याचा वापर पिण्यासाठी होतो. परंतु हे पाणी किती शुद्ध ही शंका आहे. दूषित पाण्यामुळे घराघरात कावीळ, गॅस्ट्रोचे रुग्ण आहेत. काही शासकीय तर काही खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. काही दिवसांपूर्वी दोन रुग्णांचा मृत्यूही झाल्याचे येथील नागरिक सांगतात. या समस्येला घेऊन येथील नागरिकांनी ‘आॅरेंज सिटी वॉटर वर्क्स’ला (ओसीडब्ल्यू) तक्रारी दाखल केल्या आहेत. सोमवारी ‘लोकमत’ चमूने या भागाला भेट दिली असता पाण्याची बिकट समस्या असताना, दूषित पाण्यामुळे येथील नागरिक हवालदिल झाल्याचे दिसून आले.-महापौरांना पाजणार पाणीयुवक काँग्रेसचे वरिष्ठ महासचिव फजलूर्रहमान कुरेशी म्हणाले, या भागात कमी दाबाचा पाणीपुरवठा होत असल्याने पाणी समस्या बाराही महिने असते. यातच गेल्या महिन्यापासून दूषित पाण्याच्या समस्येत वाढ झाली आहे. दूषित पाण्यामुळे कावीळ, गॅस्ट्रोच्या रुग्णांत वाढ झाली आहे. विशेषत: लहान मुले याला बळी पडत असल्याने पालकांमध्ये रोष आहे. या समस्येला घेऊन ‘ओसीडब्ल्यू’ला तक्रारी केल्या आहेत, परंतु उपाययोजना नाही. यामुळे या भागात नळाला येणारे पाणी आम्ही आता महापौरांना पाजण्याचे आंदोलन हाती घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला.शुद्ध पाण्याची जबाबदारी मनपाचीमोहम्मद रिजवान म्हणाले, तकिया परिसरात पाण्याची भीषण टंचाई आहे. यातच सुरुवातीला येणारे पाणी हे दुर्गंधीयुक्त असते. त्या स्थितीतही लोक पाणी भरतात. या पाण्यामुळे कावीळ, गॅस्ट्रोच्या रुग्णांत वाढ झाली आहे. शुद्ध पाण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. परंतु तक्रारी करूनही त्याचे निराकरण होत नसल्याने सामान्य नागरिकांनी कुणाकडे दादा मागावी हा प्रश्न आहे.

 लोक मेल्यावरच प्रशासन लक्ष देईलहैदरी रोड येथील हाजी तसलीम व मोमिनपुरा येथील मो. शाहीद रंगुनवाला म्हणाले, दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले, परंतु मनपाकडून याची दखलही घेतली जात नाही. उपाययोजना म्हणून टँकरमधून पाणीपुरवठाही केला जात नाही. लोक मेल्यावरच प्रशासन लक्ष देईल का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.९५ टक्के रुग्ण कावीळ व गॅस्ट्रोचेकसाबपुरा परिसरात वैद्यकीय व्यवसाय करणारे बालरोगतज्ज्ञ डॉ. इकबाल म्हणाले, गेल्या महिन्यापासून या भागात कावीळ व गॅस्ट्रोच्या रुग्णांत वाढ झाली आहे. साधारण ९५ टक्के रुग्ण या रोगाचे येत आहेत. रुग्णांच्या मतानुसार त्यांच्या घरात दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. यामुळे या सर्वांना स्वच्छ पाणी तेही उकळून पिण्याचा सल्ला दिला जात आहे. रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या मोठी आहे, असेही ते म्हणाले.ओसीडब्ल्यू मुर्दाबादचे दाखविले फलक‘लोकमत’चमूने कसाबपुरा, तकिया, नालसाहब चौक परिसराला भेट देऊन समस्या जाणून घेतली असता येथील महिला व पुरुषांनी कागदावर ‘ओसीडब्ल्यू मुर्दाबाद’ लिहून आपला रोष व्यक्त केला. तक्रारी करूनही दखल घेत नसल्याचा त्यांचा आरोप आहे.तिसऱ्या महिन्यापासून दूषित पाण्याची तक्रारप्रभाग ८ मधील हैदरी रोड, पनईपेठ, तकिया दिवानशा, मोहम्मद अली सराय, तकिया महबूबशा व तकिया मासुमशा या वसाहतीत दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार महानगरपालिकेच्या आयुक्तांपासून ते जलप्रदाय विभागाला तिसºया महिन्यापासून करीत आहे. लोकांच्या सोयीसाठी या भागात आरोग्य शिबिरे भरविण्यात आली. मनपाकडून पाणी शुद्ध करण्यासाठी गोळ्यांचेही वाटप केले.जुल्फेकार अहमद भुट्टोनगरसेवक, प्रभाग ८

 

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर