शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

नागपुरातील मोमिनपुरा परिसर कावीळ, गॅस्ट्रोच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 20:46 IST

मोमिनपुरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याने या भागात मोठ्या संख्येत कावीळ व गॅस्ट्रोचे रुग्ण दिसून येऊ लागले आहेत. तकिया, नालसाहब चौक, कसाबपुरा या परिसरात ४२वर लोकांना कावीळची लागण झाली आहे.

ठळक मुद्देदूषित पाण्याचा पुरवठा : ४२ वर लोकांना कावीळ : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोमिनपुरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याने या भागात मोठ्या संख्येत कावीळ व गॅस्ट्रोचे रुग्ण दिसून येऊ लागले आहेत. तकिया, नालसाहब चौक, कसाबपुरा या परिसरात ४२वर लोकांना कावीळची लागण झाली आहे. प्रशासनाला याविषयी तक्रार करूनही लक्ष देत नसल्याचा येथील सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे. विशेषत: या भागात ‘लोकमत’ चमू गेली असताना लोकांनी दूषित पाणी दाखवत ‘ओसीडब्ल्यू’ मुर्दाबादचे फलक हाती घेऊन निषेध व्यक्त केला.महानगरपालिकेच्या झोन क्र. ६ महाल अंतर्गत येणाऱ्या विशेषत: मेयो हॉस्पिटललगत असलेल्या कसाबपुरा, तकिया, नालसाहब चौक परिसरात गेल्या १५-२० दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. सुरुवातीला येणारे पाणी लाल-पिवळसर व दुर्गंधीयुक्त असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे काही वेळ पाणी जाऊ दिल्यानंतर या पाण्याचा वापर पिण्यासाठी होतो. परंतु हे पाणी किती शुद्ध ही शंका आहे. दूषित पाण्यामुळे घराघरात कावीळ, गॅस्ट्रोचे रुग्ण आहेत. काही शासकीय तर काही खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. काही दिवसांपूर्वी दोन रुग्णांचा मृत्यूही झाल्याचे येथील नागरिक सांगतात. या समस्येला घेऊन येथील नागरिकांनी ‘आॅरेंज सिटी वॉटर वर्क्स’ला (ओसीडब्ल्यू) तक्रारी दाखल केल्या आहेत. सोमवारी ‘लोकमत’ चमूने या भागाला भेट दिली असता पाण्याची बिकट समस्या असताना, दूषित पाण्यामुळे येथील नागरिक हवालदिल झाल्याचे दिसून आले.-महापौरांना पाजणार पाणीयुवक काँग्रेसचे वरिष्ठ महासचिव फजलूर्रहमान कुरेशी म्हणाले, या भागात कमी दाबाचा पाणीपुरवठा होत असल्याने पाणी समस्या बाराही महिने असते. यातच गेल्या महिन्यापासून दूषित पाण्याच्या समस्येत वाढ झाली आहे. दूषित पाण्यामुळे कावीळ, गॅस्ट्रोच्या रुग्णांत वाढ झाली आहे. विशेषत: लहान मुले याला बळी पडत असल्याने पालकांमध्ये रोष आहे. या समस्येला घेऊन ‘ओसीडब्ल्यू’ला तक्रारी केल्या आहेत, परंतु उपाययोजना नाही. यामुळे या भागात नळाला येणारे पाणी आम्ही आता महापौरांना पाजण्याचे आंदोलन हाती घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला.शुद्ध पाण्याची जबाबदारी मनपाचीमोहम्मद रिजवान म्हणाले, तकिया परिसरात पाण्याची भीषण टंचाई आहे. यातच सुरुवातीला येणारे पाणी हे दुर्गंधीयुक्त असते. त्या स्थितीतही लोक पाणी भरतात. या पाण्यामुळे कावीळ, गॅस्ट्रोच्या रुग्णांत वाढ झाली आहे. शुद्ध पाण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. परंतु तक्रारी करूनही त्याचे निराकरण होत नसल्याने सामान्य नागरिकांनी कुणाकडे दादा मागावी हा प्रश्न आहे.

 लोक मेल्यावरच प्रशासन लक्ष देईलहैदरी रोड येथील हाजी तसलीम व मोमिनपुरा येथील मो. शाहीद रंगुनवाला म्हणाले, दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले, परंतु मनपाकडून याची दखलही घेतली जात नाही. उपाययोजना म्हणून टँकरमधून पाणीपुरवठाही केला जात नाही. लोक मेल्यावरच प्रशासन लक्ष देईल का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.९५ टक्के रुग्ण कावीळ व गॅस्ट्रोचेकसाबपुरा परिसरात वैद्यकीय व्यवसाय करणारे बालरोगतज्ज्ञ डॉ. इकबाल म्हणाले, गेल्या महिन्यापासून या भागात कावीळ व गॅस्ट्रोच्या रुग्णांत वाढ झाली आहे. साधारण ९५ टक्के रुग्ण या रोगाचे येत आहेत. रुग्णांच्या मतानुसार त्यांच्या घरात दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. यामुळे या सर्वांना स्वच्छ पाणी तेही उकळून पिण्याचा सल्ला दिला जात आहे. रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या मोठी आहे, असेही ते म्हणाले.ओसीडब्ल्यू मुर्दाबादचे दाखविले फलक‘लोकमत’चमूने कसाबपुरा, तकिया, नालसाहब चौक परिसराला भेट देऊन समस्या जाणून घेतली असता येथील महिला व पुरुषांनी कागदावर ‘ओसीडब्ल्यू मुर्दाबाद’ लिहून आपला रोष व्यक्त केला. तक्रारी करूनही दखल घेत नसल्याचा त्यांचा आरोप आहे.तिसऱ्या महिन्यापासून दूषित पाण्याची तक्रारप्रभाग ८ मधील हैदरी रोड, पनईपेठ, तकिया दिवानशा, मोहम्मद अली सराय, तकिया महबूबशा व तकिया मासुमशा या वसाहतीत दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार महानगरपालिकेच्या आयुक्तांपासून ते जलप्रदाय विभागाला तिसºया महिन्यापासून करीत आहे. लोकांच्या सोयीसाठी या भागात आरोग्य शिबिरे भरविण्यात आली. मनपाकडून पाणी शुद्ध करण्यासाठी गोळ्यांचेही वाटप केले.जुल्फेकार अहमद भुट्टोनगरसेवक, प्रभाग ८

 

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर