शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

नागपूर-काटोल हायवे होणार चार पदरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 20:31 IST

केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात रस्ते विकासाचे जाळे पसरवण्याचा सपाटा लावला आहे. यात आपले नागपूरही मागे नाही. अनेक मार्ग चारपदरी होत आहेत. नागपूर - काटोल हा महामार्ग सुद्धा आता चार पदरी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

ठळक मुद्दे९६० कोटींचा प्रकल्प : संपूर्ण महामार्ग होणार सिमेंटचा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात रस्ते विकासाचे जाळे पसरवण्याचा सपाटा लावला आहे. यात आपले नागपूरही मागे नाही. अनेक मार्ग चारपदरी होत आहेत. नागपूर - काटोल हा महामार्ग सुद्धा आता चार पदरी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.नागपूर ते काटोल हा एकूण ६० किमीचा मार्ग चार पदरी होणार आहे. केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेतला असून राष्ट्रीय महामार्गाकडे हे काम सोपवण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याचा डीपीआर तयार केला आहे. हा संपूर्ण रस्ता सिमेंटचा होणार असून यावर ९५० कोटी रुपये खर्च येणार आहे.जुना काटोल नाका येथून चार पदरी रस्त्याला सुरुवात होईल. सध्या या कामाच्या निविदा काढण्यात आलेल्या आहेत. जूननंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.गोरेवाडा जंगल सुरक्षित : घरमालक व दुकानदारांमध्ये धास्तीचार पदरी रस्ता हा नियमानुसार ६० मीटरचा असतो. सध्या हा ३० ते ३५ मीटरचा आहे. त्यात वाढ होणार म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूची घरे व दुकाने हटवली जातील, हे निश्चित. परंतु शहरातील दाट वस्तीमधून चार पदरी रस्ता हा ४५ मीटरचा असतो तर मोकळ्या जागेवर तो ६० मीटरचा असतो. तसेच वने हे संरक्षित क्षेत्रात येत असल्याने त्या भागातून रस्ता जात असेल तर तो ३० मीटर इतकाच असतो. आता शहरातील जुना काटोल नाक्यापासून हा रस्ता सुरू होत आहे. दरम्यान गिट्टीखदान मकरधोकडापर्यंत रस्त्याच्या बाजूला घनदाट वस्ती आहे घरे व दुकाने मोठ्या प्रमाणावर आहेत. या भागातून रस्ता ४५ मीटरचा असला तरी अनेक घरे व दुकाने अगदी रस्त्याला लागून असल्याने ते निश्चितच या रस्त्यांमध्ये येतात. फेटरीमध्येही तशीच परिस्थिती आहे. त्यामुळे रस्त्यांवरील घरमालक व दुकानदारांमध्ये धास्ती पसरली आहे. याच रस्त्यावर गोरेवाडा संरक्षित जंगलही येते. परंतु नियमानुसार तेथून ३० मीटरचा रस्ता आताच आहे. त्यामुळे जंगलाचा भाग संरक्षित राहणार आहे.नुकसानभरपाई मिळेलयाबाबत अधिकाऱ्यांना विचारपूस केली असता त्यांनीही ही बाब मान्य केली. काही घरे व दुकाने ही अगदीच रस्त्याला लागून आहेत. त्यामुळे ती जातील. परंतु त्यांना नियमानुसार नुकसानभरपाई मिळणार आहे.कामाच्या निविदा निघाल्यानागपूर-काटोल हा रस्ता चार पदरी करण्याचा निर्णय मंत्रालयाने घेतला आहे. राष्ट्रीय महामार्गाला त्याचे काम मिळाले आहे. निविदा काढण्यात आल्या आहे. सध्या काम प्रोसेसमध्येच आहे. ४५ मीटर राईट आॅफ वे (रस्त्याच्या मध्यभागापासून अंतर) राहील. नुकसानीबाबतचा अद्याप पाहणी झालेली नाही. सध्या केवळ निविदा काढण्यात आलेल्या आहेत.अभिजित जिचकारउपमहाव्यवस्थापक (तकनिकी)राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

 

टॅग्स :highwayमहामार्गnagpurनागपूर