शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
2
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
5
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
6
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
7
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
8
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
9
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
10
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
11
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
12
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
13
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
14
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
16
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
17
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
18
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
19
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
20
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी

नागपूर-काटोल हायवे होणार चार पदरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 20:31 IST

केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात रस्ते विकासाचे जाळे पसरवण्याचा सपाटा लावला आहे. यात आपले नागपूरही मागे नाही. अनेक मार्ग चारपदरी होत आहेत. नागपूर - काटोल हा महामार्ग सुद्धा आता चार पदरी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

ठळक मुद्दे९६० कोटींचा प्रकल्प : संपूर्ण महामार्ग होणार सिमेंटचा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात रस्ते विकासाचे जाळे पसरवण्याचा सपाटा लावला आहे. यात आपले नागपूरही मागे नाही. अनेक मार्ग चारपदरी होत आहेत. नागपूर - काटोल हा महामार्ग सुद्धा आता चार पदरी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.नागपूर ते काटोल हा एकूण ६० किमीचा मार्ग चार पदरी होणार आहे. केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेतला असून राष्ट्रीय महामार्गाकडे हे काम सोपवण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याचा डीपीआर तयार केला आहे. हा संपूर्ण रस्ता सिमेंटचा होणार असून यावर ९५० कोटी रुपये खर्च येणार आहे.जुना काटोल नाका येथून चार पदरी रस्त्याला सुरुवात होईल. सध्या या कामाच्या निविदा काढण्यात आलेल्या आहेत. जूननंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.गोरेवाडा जंगल सुरक्षित : घरमालक व दुकानदारांमध्ये धास्तीचार पदरी रस्ता हा नियमानुसार ६० मीटरचा असतो. सध्या हा ३० ते ३५ मीटरचा आहे. त्यात वाढ होणार म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूची घरे व दुकाने हटवली जातील, हे निश्चित. परंतु शहरातील दाट वस्तीमधून चार पदरी रस्ता हा ४५ मीटरचा असतो तर मोकळ्या जागेवर तो ६० मीटरचा असतो. तसेच वने हे संरक्षित क्षेत्रात येत असल्याने त्या भागातून रस्ता जात असेल तर तो ३० मीटर इतकाच असतो. आता शहरातील जुना काटोल नाक्यापासून हा रस्ता सुरू होत आहे. दरम्यान गिट्टीखदान मकरधोकडापर्यंत रस्त्याच्या बाजूला घनदाट वस्ती आहे घरे व दुकाने मोठ्या प्रमाणावर आहेत. या भागातून रस्ता ४५ मीटरचा असला तरी अनेक घरे व दुकाने अगदी रस्त्याला लागून असल्याने ते निश्चितच या रस्त्यांमध्ये येतात. फेटरीमध्येही तशीच परिस्थिती आहे. त्यामुळे रस्त्यांवरील घरमालक व दुकानदारांमध्ये धास्ती पसरली आहे. याच रस्त्यावर गोरेवाडा संरक्षित जंगलही येते. परंतु नियमानुसार तेथून ३० मीटरचा रस्ता आताच आहे. त्यामुळे जंगलाचा भाग संरक्षित राहणार आहे.नुकसानभरपाई मिळेलयाबाबत अधिकाऱ्यांना विचारपूस केली असता त्यांनीही ही बाब मान्य केली. काही घरे व दुकाने ही अगदीच रस्त्याला लागून आहेत. त्यामुळे ती जातील. परंतु त्यांना नियमानुसार नुकसानभरपाई मिळणार आहे.कामाच्या निविदा निघाल्यानागपूर-काटोल हा रस्ता चार पदरी करण्याचा निर्णय मंत्रालयाने घेतला आहे. राष्ट्रीय महामार्गाला त्याचे काम मिळाले आहे. निविदा काढण्यात आल्या आहे. सध्या काम प्रोसेसमध्येच आहे. ४५ मीटर राईट आॅफ वे (रस्त्याच्या मध्यभागापासून अंतर) राहील. नुकसानीबाबतचा अद्याप पाहणी झालेली नाही. सध्या केवळ निविदा काढण्यात आलेल्या आहेत.अभिजित जिचकारउपमहाव्यवस्थापक (तकनिकी)राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

 

टॅग्स :highwayमहामार्गnagpurनागपूर