शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

Nagpur: तुम्ही घेत असलेली मिठाई आरोग्याला अपायकारक तर नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 21:54 IST

Nagpur: तुम्ही खरेदी करीत असलेली मिठाई आरोग्याला अपायकारक आहे का, बेस्ट बिफोरचे बोर्ड तपासून मिठाई खरेदी केली का आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी खरंच तपासणी करतात काय, असे अनेकविध गंभीर प्रश्न दिवाळी सणाच्या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

- मोरेश्वर मानापुरेनागपूर - दिवाळी सणात मिठाईची सर्वाधिक विक्री होते. त्याचा फायदा घेत विक्रेते दुध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये सर्रास भेसळ करतात. त्यामुळे तुम्ही खरेदी करीत असलेली मिठाई आरोग्याला अपायकारक आहे का, बेस्ट बिफोरचे बोर्ड तपासून मिठाई खरेदी केली का आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी खरंच तपासणी करतात काय, असे अनेकविध गंभीर प्रश्न दिवाळी सणाच्या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

ग्राहकांना शुद्ध अन्न उपलब्ध करून देण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागाची आहे. अपुरे अधिकारी आणि कर्मचारी असल्याचे कारण सांगून अनेकजण कार्यालयात कागदपत्रांमध्ये रमतात. वरिष्ठांनी प्रत्येक अधिकाऱ्याला कारवाईचे टारगेट देऊन तपासणीसाठी कार्यालयाबाहेर घालवावे, अशी मागणी ग्राहक पंचायतचे गजानन पांडे यांनी केली आहे.

मिठाईच्या दुकानात प्रत्येक मिठाईवर 'बेस्ट बीफोर'चा बोर्ड असणे आवश्यक आहे. बोर्ड न लावलेल्या विक्रेत्यांवर विभागाचे अधिकारी दक्षतेने कारवाई करीत नाही. आर्थिक व्यवहारामुळे कारवाई होत नसल्याने विक्रेत्यांमध्ये अधिकाऱ्यांची भीती राहिली नाही. ह्यबेस्ट बीफोरह्णचे बोर्ड असो वा मिठाईच्या दुकानात नियमांप्रमाणे ठेवली जाणारी स्वच्छता, ती बाब अंतर्भूत नसल्याने आवडीपोटी खाल्ली जाणारी मिठाई ही आरोग्यासाठी अपायकारक आहे. नागरिकांनी दिवाळीमध्ये मिठाई खरेदी करतांना बेस्ट बीफोरचे बोर्ड आहे की नाही, याची खात्री करावी. जर बेस्ट बीफोरच्या तारखेनंतरही संबधित दुकानदार ती मिठाई विकत असेल तर त्या संदर्भात एक जागरूक नागरिक म्हणून अन्न व औषध प्रशासनाकडे तातडीने तक्रार करणे गरजेचे आहे.

शिळ्या मिठाईमुळे विषबाधेची शक्यताशिळ्या मिठाईमुळे विषबाधेची शक्यता जास्त असते. मिठाई विक्रेत्यांची तपासणी करण्यात येत असल्याचा अधिकाऱ्यांचा दावा आहे. पण किती विक्रेत्यांवर कारवाई केली, याचा डाटा विभागाकडे उपलब्ध नाही. नियमांचे उल्लंघन न करणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

शहरात मिठाईची एक हजार दुकानेसध्या नागपुरात मिठाईची १ हजार दुकाने असल्याचा अंदाज आहे. त्या तुलनेत अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याचा वरिष्ठांचा दावा आहे. त्यामुळे सर्व दुकानांची तपासणी करणे अधिकाऱ्यांना शक्य होत नाही. याच कारणानी बऱ्याच दुकानातून शिळी मिठाई विकली जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

दिवाळीत अन्न विक्रेत्यांकडून भेसळ केली जाते, ही बाब काही अंशी खरी आहे. प्रत्येक दुकानावर अन्न व औषध प्रशासन विभागाचे लक्ष आहे. सणांमध्ये तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.अन्न सुरक्षा अधिकारी.

टॅग्स :nagpurनागपूरfoodअन्न