शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

नागपुरात एटीएममध्ये सदोष नोटा कशा? नागरिकांचा संतप्त सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 09:45 IST

नोटांवर काही लिहू नये, त्यांच्यावर रंग लागू नये याची काळजी घ्यावी, अशा सूचना वेळोवेळी रिझर्व्ह बँकेच्यावतीने देण्यात येतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून नागपुरातील बऱ्याच एटीएममधूनच अशाप्रकारच्या फाटक्या किंवा सदोष नोटा नागरिकांच्या हाती पडत आहेत.

ठळक मुद्देव्यवहार करण्यात अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रंग लागलेल्या किंवा हाताने लिहिलेल्या नोटा बाजारात कुणी स्वीकारत नाहीत. त्यामुळे नोटांवर काही लिहू नये, त्यांच्यावर रंग लागू नये याची काळजी घ्यावी, अशा सूचना वेळोवेळी रिझर्व्ह बँकेच्यावतीने देण्यात येतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून नागपुरातील बऱ्याच एटीएममधूनच अशाप्रकारच्या फाटक्या किंवा सदोष नोटा नागरिकांच्या हाती पडत आहेत. अशा सदोष नोटांमुळे व्यवहारात अडचणी येत आहेत. बँकांकडूनही अशा नोटा स्वीकारल्या जात नाही. यामुळे ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे एटीएममधून सदोष नोटा पुरवठा करण्यासाठी जबाबदार कोण, असा संताप व्यक्त केला जात आहे.लोकमत प्रतिनिधीने याबाबत सत्यस्थिती जाणून घेण्यासाठी शहरातील विविध बँकांच्या एटीएमवर फेरफटका मारला असता, हा गंभीर प्रकार लक्षात आला. सदर प्रतिनिधीने एका बँकेच्या एटीएममधून १०,००० रुपये काढले. त्यावेळी एटीएममधून दोन हजाराच्या चार आणि पाचशेच्या चार नोटा निघाल्या. यापैकी एक नोट फाटकी तर इतर सर्व नोटांवर पेनाने लिहिलेले होते. या प्रतिनिधीकडून पेट्रोल पंपावरही या नोटा स्वीकारण्यात आल्या नाही तसेच स्टेशनरी शॉप आणि सर्व्हिसिंग सेंटरमध्येही नोटा स्वीकारण्यास नकार देण्यात आला. बँकेत तक्रार केली असता, बँकेनेही नोटा बदलून देण्यास नकार दिला. यानंतर बँकेच्या सूचनेनुसार कामासाठी काढलेले पैसे परत खात्यामध्ये जमा करावे लागले. यातील काही काम कार्ड वापरून करावे लागले आणि जेथे कार्ड वापरणे शक्य नव्हते तेथे मित्राकडून उधारी घेऊन काम करावे लागले. या प्रतिनिधीला आलेला अनुभव अनेक लोकांना येत असून, सामान्य ग्राहकांना अशाप्रकारे मनस्ताप सहन करावा लागत असेल तर यासाठी जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जवळपास सर्वच बँकांच्या एटीएममधून अशाप्रकारे फाटक्या आणि सदोष नोटा मिळत असल्याच्या नक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. नोटाबंदीच्या निर्णयाला आता जवळपास वर्षभर जास्त काळ झाला आहे. २०००, ५०० तसेच २०० आणि ५० च्या नवीन नोटा आल्या आहेत. या नोटांवर काही लिहू नये, रंग लागणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना रिझर्व्ह बँकेने केल्या आहेत. वास्तविक ग्राहकांना एटीएममधून मिळालेल्या नोटांची जबाबदारी संबंधित बँकेने स्वीकारणे आवश्यक आहे. मात्र तक्रार देण्यास गेल्यावर एटीएममधूनच या नोटा काढण्यात आल्या याचा पुरावा बँकेच्या अधिकाऱ्यांकडून विचारला जातो. एटीएममधून निघणारी स्लीप ग्राह्य मानली जात नाही.

सदोष नोटा येण्याचा प्रश्नच नाहीबँकेमध्ये करन्सी चेसींग करून सदोष नोटा वेगळ्या काढल्या जातात आणि चांगल्या नोटांचे बॉक्स एजन्सीकडे सोपविले जातात. एजन्सीच्या कर्मचाऱ्यांचेही काम कॅमेराच्या देखरेखीतच चालते आणि मध्ये या नोटा बदलण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे सदोष नोटा येण्याचा प्रश्नच नाही, असा दावा बँक आॅफ इंडियाचे रिजनल मॅनेजर विजय सिंह यांनी केला. त्यांनी सांगितले की, निवडलेल्या सदोष नोटा पुन्हा करन्सी चेसींग करून रिझर्व्ह बँकेकडे पाठविल्या जातात. अनेक ग्राहक सदोष नोटा बदलविण्यासाठी येतात. मात्र नोटा बदलवून देणे आम्हाला शक्य नाही. मात्र आणलेल्या सदोष नोटा आम्ही ग्राहकांच्या खात्यात जमा करतो, असेही त्यांनी सांगितले. ग्राहकांनी सदोष नोटा आल्यास एटीएमच्या कॅमेरासमोर या नोटा दाखूवन बाहेर पडावे, त्यामुळे त्यांची तक्रार रेकार्ड होईल, असा सल्ला त्यांनी दिला.

मग नोटा कोण बदलवितो?बँकेच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार नोटा एटीएमपर्यंत पोहचविण्याचे काम एजन्सीमार्फत केले जाते. बँकेच्या करन्सी चेसींग विभागात पूर्ण तपासणी करण्यात येते व सदोष नोटा वेगळ्या काढून चांगल्या नोटा एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना सोपविल्या जातात. एजन्सीचे कर्मचारीही संपूर्ण कॅमेराच्या देखरेखीत या नोटा एटीएममध्ये टाकतात. त्यामुळे एटीएमपर्यंत १०० टक्के चांगले नोट जात असतील याची खात्री बाळगायला हरकत नाही. मग एटीएममधून निघणाऱ्या या नोटांवर रंग कोण लावतो आणि लिखाण कसे होते हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. ज्या एजन्सी किंवा लोकांवर या नोटा एटीएमपर्यंत पोहचविण्याचे काम आहे त्यांच्याकडून तर हा प्रकार होत नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक