शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात एटीएममध्ये सदोष नोटा कशा? नागरिकांचा संतप्त सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 09:45 IST

नोटांवर काही लिहू नये, त्यांच्यावर रंग लागू नये याची काळजी घ्यावी, अशा सूचना वेळोवेळी रिझर्व्ह बँकेच्यावतीने देण्यात येतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून नागपुरातील बऱ्याच एटीएममधूनच अशाप्रकारच्या फाटक्या किंवा सदोष नोटा नागरिकांच्या हाती पडत आहेत.

ठळक मुद्देव्यवहार करण्यात अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रंग लागलेल्या किंवा हाताने लिहिलेल्या नोटा बाजारात कुणी स्वीकारत नाहीत. त्यामुळे नोटांवर काही लिहू नये, त्यांच्यावर रंग लागू नये याची काळजी घ्यावी, अशा सूचना वेळोवेळी रिझर्व्ह बँकेच्यावतीने देण्यात येतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून नागपुरातील बऱ्याच एटीएममधूनच अशाप्रकारच्या फाटक्या किंवा सदोष नोटा नागरिकांच्या हाती पडत आहेत. अशा सदोष नोटांमुळे व्यवहारात अडचणी येत आहेत. बँकांकडूनही अशा नोटा स्वीकारल्या जात नाही. यामुळे ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे एटीएममधून सदोष नोटा पुरवठा करण्यासाठी जबाबदार कोण, असा संताप व्यक्त केला जात आहे.लोकमत प्रतिनिधीने याबाबत सत्यस्थिती जाणून घेण्यासाठी शहरातील विविध बँकांच्या एटीएमवर फेरफटका मारला असता, हा गंभीर प्रकार लक्षात आला. सदर प्रतिनिधीने एका बँकेच्या एटीएममधून १०,००० रुपये काढले. त्यावेळी एटीएममधून दोन हजाराच्या चार आणि पाचशेच्या चार नोटा निघाल्या. यापैकी एक नोट फाटकी तर इतर सर्व नोटांवर पेनाने लिहिलेले होते. या प्रतिनिधीकडून पेट्रोल पंपावरही या नोटा स्वीकारण्यात आल्या नाही तसेच स्टेशनरी शॉप आणि सर्व्हिसिंग सेंटरमध्येही नोटा स्वीकारण्यास नकार देण्यात आला. बँकेत तक्रार केली असता, बँकेनेही नोटा बदलून देण्यास नकार दिला. यानंतर बँकेच्या सूचनेनुसार कामासाठी काढलेले पैसे परत खात्यामध्ये जमा करावे लागले. यातील काही काम कार्ड वापरून करावे लागले आणि जेथे कार्ड वापरणे शक्य नव्हते तेथे मित्राकडून उधारी घेऊन काम करावे लागले. या प्रतिनिधीला आलेला अनुभव अनेक लोकांना येत असून, सामान्य ग्राहकांना अशाप्रकारे मनस्ताप सहन करावा लागत असेल तर यासाठी जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जवळपास सर्वच बँकांच्या एटीएममधून अशाप्रकारे फाटक्या आणि सदोष नोटा मिळत असल्याच्या नक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. नोटाबंदीच्या निर्णयाला आता जवळपास वर्षभर जास्त काळ झाला आहे. २०००, ५०० तसेच २०० आणि ५० च्या नवीन नोटा आल्या आहेत. या नोटांवर काही लिहू नये, रंग लागणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना रिझर्व्ह बँकेने केल्या आहेत. वास्तविक ग्राहकांना एटीएममधून मिळालेल्या नोटांची जबाबदारी संबंधित बँकेने स्वीकारणे आवश्यक आहे. मात्र तक्रार देण्यास गेल्यावर एटीएममधूनच या नोटा काढण्यात आल्या याचा पुरावा बँकेच्या अधिकाऱ्यांकडून विचारला जातो. एटीएममधून निघणारी स्लीप ग्राह्य मानली जात नाही.

सदोष नोटा येण्याचा प्रश्नच नाहीबँकेमध्ये करन्सी चेसींग करून सदोष नोटा वेगळ्या काढल्या जातात आणि चांगल्या नोटांचे बॉक्स एजन्सीकडे सोपविले जातात. एजन्सीच्या कर्मचाऱ्यांचेही काम कॅमेराच्या देखरेखीतच चालते आणि मध्ये या नोटा बदलण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे सदोष नोटा येण्याचा प्रश्नच नाही, असा दावा बँक आॅफ इंडियाचे रिजनल मॅनेजर विजय सिंह यांनी केला. त्यांनी सांगितले की, निवडलेल्या सदोष नोटा पुन्हा करन्सी चेसींग करून रिझर्व्ह बँकेकडे पाठविल्या जातात. अनेक ग्राहक सदोष नोटा बदलविण्यासाठी येतात. मात्र नोटा बदलवून देणे आम्हाला शक्य नाही. मात्र आणलेल्या सदोष नोटा आम्ही ग्राहकांच्या खात्यात जमा करतो, असेही त्यांनी सांगितले. ग्राहकांनी सदोष नोटा आल्यास एटीएमच्या कॅमेरासमोर या नोटा दाखूवन बाहेर पडावे, त्यामुळे त्यांची तक्रार रेकार्ड होईल, असा सल्ला त्यांनी दिला.

मग नोटा कोण बदलवितो?बँकेच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार नोटा एटीएमपर्यंत पोहचविण्याचे काम एजन्सीमार्फत केले जाते. बँकेच्या करन्सी चेसींग विभागात पूर्ण तपासणी करण्यात येते व सदोष नोटा वेगळ्या काढून चांगल्या नोटा एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना सोपविल्या जातात. एजन्सीचे कर्मचारीही संपूर्ण कॅमेराच्या देखरेखीत या नोटा एटीएममध्ये टाकतात. त्यामुळे एटीएमपर्यंत १०० टक्के चांगले नोट जात असतील याची खात्री बाळगायला हरकत नाही. मग एटीएममधून निघणाऱ्या या नोटांवर रंग कोण लावतो आणि लिखाण कसे होते हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. ज्या एजन्सी किंवा लोकांवर या नोटा एटीएमपर्यंत पोहचविण्याचे काम आहे त्यांच्याकडून तर हा प्रकार होत नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक