शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
3
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
4
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
5
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
6
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
7
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
8
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
9
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
10
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
11
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
12
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
13
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
14
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
15
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
16
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
17
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
18
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
19
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर

नागपूर हायकोर्टात ओळखपत्राशिवाय प्रवेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 12:30 AM

अनुचित घटना टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. आता महत्त्वाचे व्यक्ती व वकील वगळता कुणालाही ओळखपत्र पाहिल्याशिवाय व नाव नोंदविल्याशिवाय आत प्रवेश दिला जात नाही. तसेच, संबंधित व्यक्तीची कसून तपासणी केली जाते.

ठळक मुद्देसुरक्षा व्यवस्था कडक : कसून केली जाते तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनुचित घटना टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. आता महत्त्वाचे व्यक्ती व वकील वगळता कुणालाही ओळखपत्र पाहिल्याशिवाय व नाव नोंदविल्याशिवाय आत प्रवेश दिला जात नाही. तसेच, संबंधित व्यक्तीची कसून तपासणी केली जाते.उच्च न्यायालय सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक एच. एम. सय्यद यांनी मंगळवारी काही पत्रकारांशी बोलताना सुरक्षा व्यवस्थेतील सुधारणेची माहिती दिली. पूर्वी केवळ नाव नोंदवून प्रवेश दिला जात होता. त्यामुळे बरेच जण खोटी नावे सांगून आत जात होते. ही त्रुटी लक्षात आल्यानंतर आता केवळ ओळखपत्र पाहूनच आत प्रवेश दिला जातो. कुणासोबत बॅग व अन्य काही साहित्य असल्यास त्याची कसून तपासणी केली जाते. उच्च न्यायालय इमारत व परिसरातील हालचालींचा वेध घेण्यासाठी काही पोलिसांना साध्या वेशात वावरण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. साध्या वेशातील पोलीस लोकांमध्ये मिसळून धोक्यांचा कानोसा घेत असतात.इमारतीबाहेरच्या परिसरात १६ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. सर्व कॅमेरे सुरू असून, त्यावर एक कर्मचारी बारीक लक्ष ठेवून असतो. महत्त्वाचे व्यक्ती व वकील वगळता इतरांच्या वाहनांना परिसरात प्रवेश दिला जात नाही. उच्च न्यायालयाच्या सुरक्षेकरिता रोज किमान ५० पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असतात. इमारतीत प्रवेश करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. त्या प्रत्येक मार्गावर व इमारतीमध्येही ठिकठिकाणी पोलीस तैनात केले जातात, असे सय्यद यांनी सांगितले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर