शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

नागपूर उच्च न्यायालय इमारत : दगडांमधली कविता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 23:48 IST

नागपूर हे देशाच्या मध्यभागी असलेले औद्योगिक व व्यापारी शहर म्हणून प्रसिद्ध आहे. पूर्वी ही मध्य प्रदेशची राजधानी होती. पुढे महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर उपराजधानी करण्यात आली. शहराला न्यायदानाचा समृद्ध वारसा लाभला आहे आणि ज्या इमारतीत हे कार्य चालले ती इमारत न्यायदानाच्या पवित्र कार्याची साक्षीदार राहिली आहे.

ठळक मुद्देन्यायदानाचा समृद्ध वारसा : इंग्रजांनी केली होती निर्मितीवारसा नागपूरचा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर हे देशाच्या मध्यभागी असलेले औद्योगिक व व्यापारी शहर म्हणून प्रसिद्ध आहे. पूर्वी ही मध्य प्रदेशची राजधानी होती. पुढे महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर उपराजधानी करण्यात आली. शहराला न्यायदानाचा समृद्ध वारसा लाभला आहे आणि ज्या इमारतीत हे कार्य चालले ती इमारत न्यायदानाच्या पवित्र कार्याची साक्षीदार राहिली आहे.नागपूरला ९ जानेवारी १९३६ मध्ये पूर्णकालीन न्यायालयाची स्थापना झाली व त्यावेळी मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सर गिल्बर्ट स्टोन यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी सध्या विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात असलेल्या इमारतीत न्यायालयाचे कार्य चालायचे. आता त्या इमारतीत पुरातत्त्व विभागाचे कार्य चालते. वर्तमानात असलेल्या हायकोर्ट इमारतीचा शिलान्यास जानेवारी १९३७ साली सर हाईड गोवन यांच्याहस्ते करण्यात आला. तत्कालीन वास्तुशिल्पी एच.ए.एन. मेड यांनी या इमारतीची रचना तयार केली. त्यावेळी ४०० बाय २३० फूट परिसर असलेली दोन मजली इमारत ७.३७ लाख रुपयात बांधण्यात आली. मूळ डिझाईनमध्ये डोम जमिनीपासून १०९ फूट उंच आहे व उर्वरीत बांधकाम ५२ फूट उंच आहे. वालुका दगडांपासून इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. समोरचा भाग अशलर दगडांनी बांधला असून त्यास विटांच्या जोडणीप्रमाणे रचना करण्यात आली आहे. कॉरीडोर आणि कार्यालयांचे फ्लोरींग सिकोसा आणि शहाबादी दगडांनी करण्यात आले आहे. ६ जानेवारी १९४० साली तत्कालीन व्हाईसरॉय यांच्याहस्ते इमारतीचे उद््घाटन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी इमारतीचे वर्णन करताना ‘दगडांमधली कविता’ असे वर्णन केले होते. पूर्व आणि पश्चिम भागात सुनियोजित उद्यानाची निर्मिती करण्यात आली होती.नागपूर उच्च न्यायालय म्हणून न्यायदानाचे काम १९५६ ला राज्यांच्या पुनर्गठनापर्यंत सुरू होते. नोव्हेंबर १९५६ साली राज्य पुनर्गठनाचा प्रस्ताव पारित झाला आणि विदर्भातील मराठी भाषिक जिल्ह्यांसह महाराष्ट्राची रचना तयार झाली. नागपूर उच्च न्यायालयाचा वारसा पुढे नवनिर्मित हिंदी भाषिक मध्य प्रदेश उच्च न्यायालयाकडे चालत गेला. १९५६ पासून मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ म्हणून याच इमारतीमध्ये कार्य सुरू झाले. १९६० साली महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर चार न्यायाधीशांच्या नियुक्तीसह नागपूर खंडपीठाची शक्ती वाढविण्यात आली. १९८३ साली न्यायालयाच्या इमारतीचा उत्तर आणि दक्षिण भागात विस्तार करण्यात आला. दक्षिण विंगमध्ये जनहित याचिका आदी सार्वजनिक उपयोग तसेच शासकीय, केंद्र शासनाचे स्थायी न्यायालय, पॅनल सल्लागार अशा न्यायालयीन कामकाजाकरीता निर्धारीत करण्यात आले. उत्तर विंगमध्ये अतिरिक्त न्यायालय, न्यायमूर्तींचे चेंबर्स, लायब्ररी व कार्यालयीन उपयोगासाठी प्रस्तावित करण्यात आले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर