शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर उच्च न्यायालय इमारत : दगडांमधली कविता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 23:48 IST

नागपूर हे देशाच्या मध्यभागी असलेले औद्योगिक व व्यापारी शहर म्हणून प्रसिद्ध आहे. पूर्वी ही मध्य प्रदेशची राजधानी होती. पुढे महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर उपराजधानी करण्यात आली. शहराला न्यायदानाचा समृद्ध वारसा लाभला आहे आणि ज्या इमारतीत हे कार्य चालले ती इमारत न्यायदानाच्या पवित्र कार्याची साक्षीदार राहिली आहे.

ठळक मुद्देन्यायदानाचा समृद्ध वारसा : इंग्रजांनी केली होती निर्मितीवारसा नागपूरचा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर हे देशाच्या मध्यभागी असलेले औद्योगिक व व्यापारी शहर म्हणून प्रसिद्ध आहे. पूर्वी ही मध्य प्रदेशची राजधानी होती. पुढे महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर उपराजधानी करण्यात आली. शहराला न्यायदानाचा समृद्ध वारसा लाभला आहे आणि ज्या इमारतीत हे कार्य चालले ती इमारत न्यायदानाच्या पवित्र कार्याची साक्षीदार राहिली आहे.नागपूरला ९ जानेवारी १९३६ मध्ये पूर्णकालीन न्यायालयाची स्थापना झाली व त्यावेळी मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सर गिल्बर्ट स्टोन यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी सध्या विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात असलेल्या इमारतीत न्यायालयाचे कार्य चालायचे. आता त्या इमारतीत पुरातत्त्व विभागाचे कार्य चालते. वर्तमानात असलेल्या हायकोर्ट इमारतीचा शिलान्यास जानेवारी १९३७ साली सर हाईड गोवन यांच्याहस्ते करण्यात आला. तत्कालीन वास्तुशिल्पी एच.ए.एन. मेड यांनी या इमारतीची रचना तयार केली. त्यावेळी ४०० बाय २३० फूट परिसर असलेली दोन मजली इमारत ७.३७ लाख रुपयात बांधण्यात आली. मूळ डिझाईनमध्ये डोम जमिनीपासून १०९ फूट उंच आहे व उर्वरीत बांधकाम ५२ फूट उंच आहे. वालुका दगडांपासून इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. समोरचा भाग अशलर दगडांनी बांधला असून त्यास विटांच्या जोडणीप्रमाणे रचना करण्यात आली आहे. कॉरीडोर आणि कार्यालयांचे फ्लोरींग सिकोसा आणि शहाबादी दगडांनी करण्यात आले आहे. ६ जानेवारी १९४० साली तत्कालीन व्हाईसरॉय यांच्याहस्ते इमारतीचे उद््घाटन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी इमारतीचे वर्णन करताना ‘दगडांमधली कविता’ असे वर्णन केले होते. पूर्व आणि पश्चिम भागात सुनियोजित उद्यानाची निर्मिती करण्यात आली होती.नागपूर उच्च न्यायालय म्हणून न्यायदानाचे काम १९५६ ला राज्यांच्या पुनर्गठनापर्यंत सुरू होते. नोव्हेंबर १९५६ साली राज्य पुनर्गठनाचा प्रस्ताव पारित झाला आणि विदर्भातील मराठी भाषिक जिल्ह्यांसह महाराष्ट्राची रचना तयार झाली. नागपूर उच्च न्यायालयाचा वारसा पुढे नवनिर्मित हिंदी भाषिक मध्य प्रदेश उच्च न्यायालयाकडे चालत गेला. १९५६ पासून मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ म्हणून याच इमारतीमध्ये कार्य सुरू झाले. १९६० साली महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर चार न्यायाधीशांच्या नियुक्तीसह नागपूर खंडपीठाची शक्ती वाढविण्यात आली. १९८३ साली न्यायालयाच्या इमारतीचा उत्तर आणि दक्षिण भागात विस्तार करण्यात आला. दक्षिण विंगमध्ये जनहित याचिका आदी सार्वजनिक उपयोग तसेच शासकीय, केंद्र शासनाचे स्थायी न्यायालय, पॅनल सल्लागार अशा न्यायालयीन कामकाजाकरीता निर्धारीत करण्यात आले. उत्तर विंगमध्ये अतिरिक्त न्यायालय, न्यायमूर्तींचे चेंबर्स, लायब्ररी व कार्यालयीन उपयोगासाठी प्रस्तावित करण्यात आले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर