शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Nagpur: गर्लफ्रेण्डने दगाबाजी केली अन् तो आता हत्येच्या गुन्ह्यात आरोपी बनला, त्यांचे जमले, त्यांचे ठरले अन् ... :

By नरेश डोंगरे | Updated: June 10, 2023 22:13 IST

Nagpur: तारुण्याच्या उंबरठ्यावर आल्यानंतर ‘तिचे-त्याचे सूत जमले’ अन् त्यांची प्रेमकथा सुुरू झाली. मात्र, काही दिवसांनंतर तिने दगाबाजी केली. दुसरा निवडला अन् लग्नही केले. त्यामुळे तो कावराबावरा झाला. मजनूसारखा वागू लागला अन् आता हत्येसारख्या गंभीर गुन्ह्याचा आरोपी बनला.

- नरेश डोंगरे

नागपूर : तारुण्याच्या उंबरठ्यावर आल्यानंतर ‘तिचे-त्याचे सूत जमले’ अन् त्यांची प्रेमकथा सुुरू झाली. मात्र, काही दिवसांनंतर तिने दगाबाजी केली. दुसरा निवडला अन् लग्नही केले. त्यामुळे तो कावराबावरा झाला. मजनूसारखा वागू लागला अन् आता हत्येसारख्या गंभीर गुन्ह्याचा आरोपी बनला. किरकोळ कारणावरून शुक्रवारी पहाटे रेल्वेस्थानकावर हत्या करणाऱ्या आरोपीच्या चाैकशीतून एक भलतीच प्रेमकथा पुढे आली आहे.

दिनेश धोंडिबा सदाफुले (वय ३२) पुण्यातील वारजे माळवाडी, रामनगर येथील रहिवासी आहे. घरची स्थिती ठिकठाक असणारा दिनेश सध्या रेल्वे पोलिसांच्या कोठडीत आहे. त्याने सोबत राहणाऱ्याने आई-बहिणीवरून घाणेरड्या शिव्या दिल्याने जितेंद्र उर्फ टोपी (रा. बलोद, छत्तीसगड) याची सिमेंटच्या फळीने ठेचून हत्या केली. रेल्वेच्या पोलिस निरीक्षक मनीषा काशिद यांनी त्याला न्यायालयात हजर करून त्याची १३ जूनपर्यंत पोलिस कोठडी मिळवली. दरम्यान, पुण्यासारख्या शहरात घर, आईवडील आणि अन्य कुटुंबीय असताना दिनेश इकडे कशाला आला, अनाथासारखा का राहत होता, ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता दिनेशची प्रेमकथा पुढे आली.

दिनेशची घरची स्थिती ठिकठाक होती. तो मिळेल ते काम करून छानछोकीने राहत होता. एका तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले अन् त्यांची प्रेमकथा बहरली. त्या दोघांनी ‘जिना मरना तेरे संग’ असे 'कसमे-वादे'ही केले. तिच्या प्रेमात दिनेश पुरता गुंतला असताना अचानक तिने दगाबाजी केली. दुसरा निवडला अन् त्याच्याशी लग्नही केले. प्रेयसीच्या या पवित्र्यामुळे दिनेश सैरभैर झाला. तिच्या विरहात चार वर्षांपासून वेड्यासारखा वागू लागला. घर सोडून बेवारस सारखा कुठेही फिरू लागला. पोट भरण्यासाठी कोणतेही काम करायचे अन् कुठेही झोपायचे, असे त्याचे सुरू झाले. याच अवस्थेत तो चार महिन्यांपूर्वी भटकत भटकत नागपुरात आला. कॉटन मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना रात्रंदिवस काम अन् पोटभरेल एवढी मजुरीही मिळते. त्यामुळे छोटे मोठे काम करून पोट भरायचे आणि बाजुच्या रेल्वेस्थानकावर कोणत्याही फलाटावर झोपायचे, असा त्याचा दिनक्रम बनला. त्याचा ना कुणी दोस्त होता ना कुणी दुष्मन. मात्र, गुरुवारी रात्री दारूच्या नशेत कुठल्याशा किरकोळ कारणावरून त्याच्याच सारखा बेवारस जीवन जगणाऱ्या जितेंद्रसोबत वाद झाला. अत्यंत घाणेरड्या शिव्या दिल्या अन् त्यामुळे रागाच्या भरात त्याने बाजुला पडून असलेल्या सिमेंटच्या फळीने दगडाने ठेचून झोपेत असलेल्या जितेंद्रची हत्या केली अन् आता पोलीस कोठडीत पोहचला.

तो आता भलत्याच 'मोड'वरप्रेमभंग झाल्यानंतर माणूस कसा दिशाहिन होऊन वागतो अन् नंतर त्याचे काय होते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा या प्रकरणातून आला आहे. हातून एवढा गंभीर गुन्हा घडल्याने तो आता भलत्याच 'मोड'वर गेला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर