शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

नागपुरात आईच्या विरहात युवतीने लावला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 23:32 IST

आईच्या विरहाने अस्वस्थ झालेल्या एका युवतीने गळफास लावून आत्महत्या केली. गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

ठळक मुद्देअजनीतील वसंतनगरात घटना : परिसरात हळहळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आईच्या विरहाने अस्वस्थ झालेल्या एका युवतीने गळफास लावून आत्महत्या केली. गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पल्लवी जगदीश चव्हाण (वय २१) असे मृत युवतीचे नाव असून ती अजनीच्या वसंतनगरात राहत होती. पल्लवीच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर आई, भाऊ करण आणि पल्लवी असे तिघेजण कुटुंबात राहिले. त्यांची आर्थिक स्थिती फारच कमकुवत होती. अशात पल्लवीच्या आईला आजाराने ग्रासले. दोन महिन्यापूर्वी तिचा मृत्यू झाला. वडील आणि आता आई गेल्यानंतर पल्लवी कमालीची व्यथित झाली होती. ती आईच्या विरहात अस्वस्थ राहायची. तिचा भाऊ करण याच्या साथीने जगण्यासाठी ती संघर्ष करू लागली. ती मनीषनगरातील एका चष्म्याच्या दुकानात काम करायची, तर करण बांधकामस्थळी काम करायचा. तो तिला कामावर जाण्यापूर्वी दुकानात सोडून देत होता आणि परत येताना सोबत घेऊन येत होता. आज नेहमीप्रमाणे त्याने पल्लवीला आॅप्टिकलमध्ये सोडून दिले आणि तो कामावर गेला. दुपारी २ च्या सुमारास पल्लवी घरी आली आणि तिने गळफास लावून घेतला. त्यांना ही बाब लक्षात आल्यानंतर करणला कळविण्यात आले. करणने अजनी पोलिसांना माहिती दिली. आई-वडिलांपाठोपाठ बहीणही निघून गेल्यामुळे चव्हाण कुटुंबातील एकटा पडलेला करण मानसिकरीत्या पुरता खचला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे वसंतनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर