शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

नागपुरात केवळ एका सिग्नलवर तब्बल दीड लाख रुपयाचे इंधन जाते वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 11:22 AM

नागपुरात केवळ एका चौकात रेड सिग्नलवर थांबणाऱ्या वाहनांमुळे प्रति तास १लाख ४९ हजार ४७५ रुपयाचे इंधन वाया जाते.

ठळक मुद्देव्हीएनआयटीच्या अभ्यासात झाला उलगडारविनगर चौकातील निरीक्षण

सैयद मोबीनलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चौकाचौकांमध्ये सिग्नलवर थांबणाऱ्या वाहनांमुळे वेळेचे आणि इंधनाचेही नुकसान होते. शिवाय, पर्यावरणावरही त्याचा विपरीत परिणाम होतो. या संदर्भात विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान (व्हीएनआयटी)च्या विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासात आश्चर्यचकित करणारे आकडे पुढे आले आहेत. केवळ एका चौकात रेड सिग्नलवर थांबणाऱ्या वाहनांमुळे प्रति तास १लाख ४९ हजार ४७५ रुपयाचे इंधन वाया जाते. या अनुषंगाने विचार केल्यास दरवर्षी हे नुकसान १३० कोटी ९४ लाख २ हजार ५६८ रुपये इतके होते.व्हीएनआयटीच्या ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख प्रो. डॉ. विश्रुत लांडगे यांच्या मार्गदर्शनात अभिषेक कुमार सिंह, सौरभ पंजाबी, प्राजक्ता देव व शौनक झुलकंठीवार या विद्यार्थ्यांनी रविनगर चौकातील निरीक्षणानुसार आपले आकडे सादर केले. जुलै २०१९ ते मार्च २०२० या काळात केलेल्या या अभ्यासात सकाळी व संध्याकाळी अत्यंत घाईगडबडीच्या वेळेची निवड करण्यात आली होती. नागपूर शहरात ही वेळ सकाळी ८ ते दुपारी १२ व संध्याकाळी दुपारी ४.३० ते ७.३० वाजताची आहे. त्याअनुषंगाने सिग्नलवर वाहने थांबल्यामुळे खर्च होणारा वेळ, इंधनासह पर्यावरणाला होणारे नुकसान मोजण्यात आले. अभ्यासात सर्वात जास्त नुकसान वेळेचे दिसून आले. त्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर इंधन आणि तिसऱ्या क्रमांकावर पर्यावरणाचे नुकसान आले. ही आकडेवारी शहरातील एका चौकाची आहे. जर सर्व लहान मोठ्या चौकांचे निरीक्षण केल्यास ही आकडेवारी विस्मयकारी ठरण्याची शक्यता आहे.वाहनांची वाढती संख्या हे प्रमुख कारण: चौकांमध्ये सिग्नलवर थांबल्यावर वेळ, इंधन आणि पर्यावरणाचे होणाऱ्या नुकसानीचे प्रमुख कारण वाहनांची वाढती संख्या आहे. उड्डाण पुलांची संख्या वाढवण्यात आली तर होणारे हे नुकसान बऱ्यापैकी कमी होऊ शकते. हे अशाप्रकारचे निरीक्षण संशोधन अन्य सिग्नलवरही केले जाईल. खरे तर हा अभ्यास जून २०२० पर्यंत करण्यात येणार होता. मात्र, टाळेबंदीमुळे मार्चमध्येच पूर्ण करण्यात आल्याची माहिती डॉ. विश्रुत लांडगे यांनी दिली.

 

टॅग्स :Petrolपेट्रोल