शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

नागपुरात केवळ एका सिग्नलवर तब्बल दीड लाख रुपयाचे इंधन जाते वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 11:35 IST

नागपुरात केवळ एका चौकात रेड सिग्नलवर थांबणाऱ्या वाहनांमुळे प्रति तास १लाख ४९ हजार ४७५ रुपयाचे इंधन वाया जाते.

ठळक मुद्देव्हीएनआयटीच्या अभ्यासात झाला उलगडारविनगर चौकातील निरीक्षण

सैयद मोबीनलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चौकाचौकांमध्ये सिग्नलवर थांबणाऱ्या वाहनांमुळे वेळेचे आणि इंधनाचेही नुकसान होते. शिवाय, पर्यावरणावरही त्याचा विपरीत परिणाम होतो. या संदर्भात विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान (व्हीएनआयटी)च्या विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासात आश्चर्यचकित करणारे आकडे पुढे आले आहेत. केवळ एका चौकात रेड सिग्नलवर थांबणाऱ्या वाहनांमुळे प्रति तास १लाख ४९ हजार ४७५ रुपयाचे इंधन वाया जाते. या अनुषंगाने विचार केल्यास दरवर्षी हे नुकसान १३० कोटी ९४ लाख २ हजार ५६८ रुपये इतके होते.व्हीएनआयटीच्या ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख प्रो. डॉ. विश्रुत लांडगे यांच्या मार्गदर्शनात अभिषेक कुमार सिंह, सौरभ पंजाबी, प्राजक्ता देव व शौनक झुलकंठीवार या विद्यार्थ्यांनी रविनगर चौकातील निरीक्षणानुसार आपले आकडे सादर केले. जुलै २०१९ ते मार्च २०२० या काळात केलेल्या या अभ्यासात सकाळी व संध्याकाळी अत्यंत घाईगडबडीच्या वेळेची निवड करण्यात आली होती. नागपूर शहरात ही वेळ सकाळी ८ ते दुपारी १२ व संध्याकाळी दुपारी ४.३० ते ७.३० वाजताची आहे. त्याअनुषंगाने सिग्नलवर वाहने थांबल्यामुळे खर्च होणारा वेळ, इंधनासह पर्यावरणाला होणारे नुकसान मोजण्यात आले. अभ्यासात सर्वात जास्त नुकसान वेळेचे दिसून आले. त्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर इंधन आणि तिसऱ्या क्रमांकावर पर्यावरणाचे नुकसान आले. ही आकडेवारी शहरातील एका चौकाची आहे. जर सर्व लहान मोठ्या चौकांचे निरीक्षण केल्यास ही आकडेवारी विस्मयकारी ठरण्याची शक्यता आहे.वाहनांची वाढती संख्या हे प्रमुख कारण: चौकांमध्ये सिग्नलवर थांबल्यावर वेळ, इंधन आणि पर्यावरणाचे होणाऱ्या नुकसानीचे प्रमुख कारण वाहनांची वाढती संख्या आहे. उड्डाण पुलांची संख्या वाढवण्यात आली तर होणारे हे नुकसान बऱ्यापैकी कमी होऊ शकते. हे अशाप्रकारचे निरीक्षण संशोधन अन्य सिग्नलवरही केले जाईल. खरे तर हा अभ्यास जून २०२० पर्यंत करण्यात येणार होता. मात्र, टाळेबंदीमुळे मार्चमध्येच पूर्ण करण्यात आल्याची माहिती डॉ. विश्रुत लांडगे यांनी दिली.

 

टॅग्स :Petrolपेट्रोल