शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

नागपूर विभागात ९९ टक्के पंचनामे पूर्ण : १, ७६,५७३.८१ हेक्टरवर नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 20:37 IST

शेतकऱ्यांच्या पीक हातात आले असताना, परतीच्या पावसाने केलेल्या धुमाकुळीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नागपूर विभागात १,७६,५७३.८१ हेक्टरवर नुकसान झाले असून, नुकसानीच्या पंचनाम्याचे काम ९९ टक्के पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्देशासनाला पाठवायचा आहे १५ नोव्हेंबरपर्यंत नुकसानीचा अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांच्या पीक हातात आले असताना, परतीच्या पावसाने केलेल्या धुमाकुळीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नागपूर विभागात १,७६,५७३.८१ हेक्टरवर नुकसान झाले असून, नुकसानीच्या पंचनाम्याचे काम ९९ टक्के पूर्ण झाले आहे. शासनाला नुकसानीचा अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंत पाठविण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. कापूस, सोयाबीन, धान, ज्वारी यासह फळ पिकांनाही मोठा फटका बसला. कापसाची बोंड गळून पडली. कापलेली सोयाबीन काळवंडली. संत्रा आणि मोसंबी गळून पडली. यावर्षी उशिरा आलेल्या मान्सूनमुळे बराच काळ पेरण्या खोळंबल्या होत्या. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला होता. आता पीक कापणीला आले असताना परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची थट्टाच केली. काळजीवाहू सरकार शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहचले. लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून आंदोलन झाली. शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाकडून पंचनाम्याचे काम वेगाने सुरू झाले. नागपूर विभागात १,७६,५७३.८१ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत नागपूर जिल्ह्यासह इतर पाचही जिल्ह्याचे पंचनामे १०० टक्के आटोपले आहे. बुधवारी प्रशासनाकडे आलेल्या अहवालानुसार १,७५,३७७.२१ हेक्टर क्षेत्रफळाचे पंचनामे पूर्ण झाले आहे. पंचनामे पूर्ण झालेल्या शेतकºयांची संख्या ३,२०,४१९ इतकी आहे.

टॅग्स :agricultureशेतीnagpurनागपूर