शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

नागपूर विभागात ९९ टक्के पंचनामे पूर्ण : १, ७६,५७३.८१ हेक्टरवर नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 20:37 IST

शेतकऱ्यांच्या पीक हातात आले असताना, परतीच्या पावसाने केलेल्या धुमाकुळीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नागपूर विभागात १,७६,५७३.८१ हेक्टरवर नुकसान झाले असून, नुकसानीच्या पंचनाम्याचे काम ९९ टक्के पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्देशासनाला पाठवायचा आहे १५ नोव्हेंबरपर्यंत नुकसानीचा अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांच्या पीक हातात आले असताना, परतीच्या पावसाने केलेल्या धुमाकुळीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नागपूर विभागात १,७६,५७३.८१ हेक्टरवर नुकसान झाले असून, नुकसानीच्या पंचनाम्याचे काम ९९ टक्के पूर्ण झाले आहे. शासनाला नुकसानीचा अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंत पाठविण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. कापूस, सोयाबीन, धान, ज्वारी यासह फळ पिकांनाही मोठा फटका बसला. कापसाची बोंड गळून पडली. कापलेली सोयाबीन काळवंडली. संत्रा आणि मोसंबी गळून पडली. यावर्षी उशिरा आलेल्या मान्सूनमुळे बराच काळ पेरण्या खोळंबल्या होत्या. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला होता. आता पीक कापणीला आले असताना परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची थट्टाच केली. काळजीवाहू सरकार शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहचले. लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून आंदोलन झाली. शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाकडून पंचनाम्याचे काम वेगाने सुरू झाले. नागपूर विभागात १,७६,५७३.८१ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत नागपूर जिल्ह्यासह इतर पाचही जिल्ह्याचे पंचनामे १०० टक्के आटोपले आहे. बुधवारी प्रशासनाकडे आलेल्या अहवालानुसार १,७५,३७७.२१ हेक्टर क्षेत्रफळाचे पंचनामे पूर्ण झाले आहे. पंचनामे पूर्ण झालेल्या शेतकºयांची संख्या ३,२०,४१९ इतकी आहे.

टॅग्स :agricultureशेतीnagpurनागपूर