नागपूर विभागात ३,९९६ गावांची आणेवारी ५० पैशाखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:10 IST2021-01-03T04:10:21+5:302021-01-03T04:10:21+5:30

नागपूर विभागामध्ये ६२ तालुके असून त्यापैकी ३२ तालुक्यांमधील गावांमध्ये ५० टक्क्यांच्या आत आणेवारी दाखविण्यात आली आहे. यातील अनेक तालुके ...

In Nagpur division, 3,996 villages are under 50 paise in November | नागपूर विभागात ३,९९६ गावांची आणेवारी ५० पैशाखाली

नागपूर विभागात ३,९९६ गावांची आणेवारी ५० पैशाखाली

नागपूर विभागामध्ये ६२ तालुके असून त्यापैकी ३२ तालुक्यांमधील गावांमध्ये ५० टक्क्यांच्या आत आणेवारी दाखविण्यात आली आहे. यातील अनेक तालुके अंशत: आहेत. नागपूर जिल्ह्यात दोन तालुके ५० टक्क्यांखाली दिसत असले तरी दोन्ही तालुके मिळून गावे मात्र २८ दाखविली आहेत. असाच प्रकार गोंदिया, भंडारा जिल्ह्यांतही घडला आहे. परिणामत: आणेवारी काढताना अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

सध्याची पीक परिस्थिती

विभागातील सर्वच जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर जिल्ह्यांत पुराचा तडाखा बसला होता. यामुळे अर्थातच नुकसान मोठे आहे. सध्या तूर, कपाशीवर कीड आहे. कपाशीवर सर्वत्र बोंड अळीचा प्रदुर्भाव आहे. भाजीपाला पिकावरही कीड असून तुरीच्या शेंगा गळत आहेत.

...

दुष्काळाच्या घोषणेत अडसर

महसूल विभागाच्या या आकडेवारीमुळे दुष्काळाची घोषणा करण्यात अडसर आहे. अनेक तालुक्यांत अंशत: गावांचा समावेश झाल्याने संपृूर्ण तालुक्यावर अन्याय होऊ शकतो.

...

शासनाकडून अपेक्षित मदत

आणेवारी कमी आलेल्या गावांना शेतसारा माफ होऊ शकतो, वीज बिलात ३३ टक्के सवलत, उचल केलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन होऊ शकते, तसेच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे शु्ुल्क माफ होऊ शकते.

...

घोषित मदत अल्पच

वर्षभरात शेतकऱ्यांपर्यंत कर्ज पुनर्गठन वगळता अन्य मदत पुरेशी पोहोचली नाही. पीक विमा तसेच पूरग्रस्त निधीचीही रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे मागणी आणि प्रतीक्षा सुरूच आहे.

...

अशी आहे स्थिती

गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ यापूर्वीच जाहीर झाला आहे. वर्धा जिल्ह्यात कपाशीचा पेरा कमी करून सोयाबीनमध्ये वाढ झाली असली तरी पावसाचा मोठा फटका बसला. शेंगा न भरल्याने उतारी आली नाही. गोंदिया जिल्ह्यात गोंदिया, तिरोडातील शेतकऱ्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला होता.

...

विभागातील गावांची पैसेवारी

जिल्हा - ५० आतील - ५० वरील

(कंसात तालुक्यांची संख्या दर्शविण्यात आली आहे)

भंडारा - (३) ६३६ - (४)२०८

चंद्रपूर - (१०) १५११ - (२) ३४५

गडचिरोली - (१२) १३३७ - (२) १५६ - ०.६३

वर्धा - (३) ४६३ - (५)८७५

गोंदिया - (२)२१- (६) ८९९

नागपूर - (२ अंशत:) २८ - (११) १७६१

एकूण - (३२) ३९९६ - (३०) ४२४४

...

Web Title: In Nagpur division, 3,996 villages are under 50 paise in November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.