शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

काँग्रेसच्या तिकीटसाठी नागपूर जिल्ह्यातही चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 21:23 IST

शहरासोबतच जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे तिकीट मिळविण्यासाठी इच्छुकांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. यापूर्वी विधानसभा लढलेल्यांसह फे्रश चेहऱ्यांनीही यावेळी आपली दावेदारी सादर केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ग्रामीणमधील एकाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला आघाडी मिळाली नाही. असे असतानाही विधानसभा लढण्यासाठी इच्छुकांमध्ये उत्साह कायम आहे.

ठळक मुद्देजिल्हा व प्रदेश काँग्रेसकडे अर्ज सादर : उमरेडमध्ये सर्वाधिक इच्छुक

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शहरासोबतच जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे तिकीट मिळविण्यासाठी इच्छुकांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. यापूर्वी विधानसभा लढलेल्यांसह फे्रश चेहऱ्यांनीही यावेळी आपली दावेदारी सादर केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ग्रामीणमधील एकाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला आघाडी मिळाली नाही. असे असतानाही विधानसभा लढण्यासाठी इच्छुकांमध्ये उत्साह कायम आहे.प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार, इच्छुक उमेदवारांना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या गणेशपेठ येथील कार्यालयातून अर्ज घ्यायचे होते. त्यानुसार सुमारे ३० इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. यापैकी काहींनी भरलेले अर्ज जिल्हा काँग्रेस समितीकडे सादर केले, तर काहींनी प्रदेश काँग्रेसकडे सादर केले आहेत. उमरेड मतदारसंघासाठी गेल्यावेळी लढलेले डॉ. संजय मेश्राम यांच्यासह काँग्रेसमध्ये दाखल झालेले राजू पारवे यांनी अर्ज सादर करीत उमेदवारीवर दावा केला आहे. याशिवाय महादेव नगराळे, नत्थू लोखंडे, राहुल घरडे, प्रमोद घरडे, राजेश मेश्राम, गजानन जांभुळकर, विश्वनाथ मेंढे, जॉनी मेश्राम, प्रशांत वासुदेव ढाकणे, यशवंत नत्थूजी मेश्राम यांनीही अर्ज दाखल केले आहेत. उमरेडमध्ये इच्छुकांची मोठी रांग आहे.कामठी मतदारसंघात प्रदेश पदाधिकारी हुकूमचंद आमधरे, आबिद ताजी, प्रसन्ना तिडके, जि.प. सदस्य नाना कंभाले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तापेश्वर वैद्य, महादेव जीभकाटे, विनोद मिसाळ, आशिष चव्हाण, फिरोज अहमद अन्सारी यांनी अर्ज भरले आहेत. रामटेकसाठी पर्यटक मित्र व काँग्रेसच्या पर्यटन सेलचे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे यांनी दावा केला आहे. डॉ. अमोल देशमुख यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीकडून अर्ज घेतलेला नाही. तर माजी सभापती सुरेश कुंभरे, दीपक पालीवाल, गज्जू यादव, सचिन किरपान यांनी अर्ज घेतले आहेत. हिंगणा विधानसभा मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता. मात्र, यावेळी तो काँग्रेसला मिळावा, अशी मागणी आहे. या मतदारसंघातून गेल्यावेळी लढलेल्या युवक काँग्रेसच्या माजी अध्यक्ष कुंदा राऊत यांच्यासह बाबा आष्टनकर यांनी दावा केला आहे. सावनेरसाठी आ. सुनील केदार यांनीही अर्ज केला आहे.मुळकांचे ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी गेल्या दोन-तीन वर्षांपासून रामटेक मतदारसंघात तयारी चालविली आहे.मात्र, त्यांनी या मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज घेतलेला नसून, ते ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत आहे. राज्यातील जिल्हाध्यक्षांवर जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील निवडणुकांची जबाबदारी असते. त्यामुळे मी स्वत: दावेदारी सादर केली तर इतर मतदारसंघाकडे दुर्लक्ष होऊ शकते. जिल्हाध्यक्षांनी लढावे किंवा नाही याबाबत पक्षस्तरावर निर्णय होईल. त्यानुसार आपण निर्णय घेऊ. सद्यस्थितीत पक्ष बळकट करणे हेच आपले लक्ष्य आहे, असे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. विशेष म्हणजे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनीही अर्ज घेतलेला नाही.

टॅग्स :congressकाँग्रेसvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक